शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

'ट्राय'च्या निर्णयात सुधारणा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:17 IST

टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयामुळे केबल ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देनिवेदन : जिल्हा केबल ओनर वेल्फेअर असोसिएशनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयामुळे केबल ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ट्रायचा निर्णय रद्द करण्यात यावा किंवा त्यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा केबल ओनर वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.केबल चालकांचा व्यवसाय शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसतानाही सुरळीत सुरू असताना ट्रायचा निर्णय घेण्यात आला.आजपर्यंत प्रती महिना २०० रूपये २५० रूपये मासिक वर्गणी जवळपास ४०० चॅनल ग्राहकांना केबल चालकांकडून देण्यात येत आहे. यात काही चॅनल मोफत तर काही चॅनल रोखीचा समावेश आहे. मात्र ट्रायने लागू केलेल्या नवीन निर्णयामुळे ग्राहकांना महिनाकाठी जवळपास हजार रूपये मोजावे लागतील. त्यामुळे केबल चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.सध्या स्थितीत ग्राहकांनाकडून २०० ते २५० रूपये तर ग्रामीण भागात १५० रूपयापेक्षा अधिकची रक्कम देण्यास तयार होत नाही. २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयात शहरी व ग्रामीण असा कुठलाही फरक न ठेवता सर्व ग्राहकांना सरसकट दर लागू करण्यात आलेले आहे. केबची मासीक वर्गणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने अनेक केबलधारक जोडणी बंद करण्याच्या तयारीत आहे. यामुळे केबल चालकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.चॅनलचे दर कमीत कमी ५० पैसे व अधिकाधिक पाच रूपये ठेवण्याची गरज आहे. नवीन दराचा निर्णय रद्द करून त्यात सुधारणा करण्यात यावी जेणे करून जुन्या नियमानुसार म्हणजेच डिजिटल अ‍ॅन्ड्रेसेबल केबल टिव्ही सिस्टम (डीएएस) प्रमाणे केबल ग्राहकांची विभागणी चार भागात केली आहे. यात मोठी शहरे, मध्यम शहरे, लहान शहरे, ग्रामीण भाग अशा प्रकारची विभागणी ट्रायच्या नवीन दरवाढीच्या निर्णयात करण्याची गरज असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत प्रधानमंत्री, सूचना व प्रसारन मंत्रालय, खासदार प्रफुल पटेल, खासदार मधुकर कुकडे यांना पाठविण्यात आले आहे.शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे, शैलेश जांभुळकर, सुनिल वलके, संजय भुरे, राजेश डोकरीमारे, अनिल चौधरी, दामु पडोळे, संजय चौधरी, सुभाष वंजारी, शरद भांडारकर, अमर उजवणे, जाबीर मालाधरी आदींचा समावेश होता.