शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

मिनी मंत्रालयाच्या व्हरांड्यात महत्त्वपूर्ण दस्तावेज असुरक्षित

By admin | Updated: December 27, 2014 01:07 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पायऱ्यांच्या खाली अडगळीत ठिकाणी अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पायऱ्यांच्या खाली अडगळीत ठिकाणी अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे. हे दस्तावेज चोरीला गेले तर महत्वाची माहिती शोधूनही सापडणार नाही. हे दस्तावेज असुरक्षित आहेत. याकडे कुणाचेचे लक्ष जात नाही. याला काय म्हणावे, हा खरा प्रश्न आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेले ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती स्तरावरील सात आरोग्य केंद्रांचा कारभार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधील महत्वपूर्ण दस्तावेज दि.२२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत आणण्यात आले. हे दस्तावेज जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा आवारात ठेवण्यात आले. जिल्हा परिषदेला चार प्रवेशद्वार आहेत. पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण दिशेला हे प्रवेशद्वार आहेत. आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पश्चिम दिशेला असलेल्या प्रवेशद्वारा शेजारी वाहनांमार्फत आणण्यात आले. येथे मजूरांनी दस्तावेज अस्तव्यस्त पध्दतीने ठेवून दिले. दस्तावेजांचे गठ्ठे विखूरलेले असतांना तेथील बहुतांश कागदपत्रे फाटले तर काही चुरडले. पश्चिम द्वारावर प्रथम खोली ही आरोग्य विभागाच्या संगणक कक्षाची आहे. त्यानंतर साथरोग सर्वेक्षण विभाग आहे. यांच्यापुढे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कक्षासह आरोग्य विभागासंबधीत कार्यालय तळमजल्यावर आहे. या कक्षांच्या समोर असलेल्या व्हरांड्यात दस्तावेजांचा ढीग लावलेला आहे. पहिल्या माळ्यावर जाण्यासाठी रस्ता देखील खुला नाही. शेजारीच जिल्हा परिषदेला वीज पुरवठा करणारे संयत्र आहे. स्पार्कींग झाल्यास महत्वपूर्ण दस्तावेज जळून खाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता त्यांना ही परिस्थिती दिसून आली. दस्तावेजांची पाहणी करुन काही कागदपत्रे हातात घेतली मात्र कुणीही हटकले नाही. याच परिसरात काही नागरिक आवागमन करित असतांना त्यांनाही विचारपूस केली असता ‘सध्या गुलाबी थंडी पडत असल्यामुळे शेकोट्या पेटविण्यासाठी दस्तावेजाचा वापर करण्यासाठी आले असावे’ अशी उपहासात्मक भाष्य केले.पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वारासमोरच लाकडी साहित्य तथा लोखंडी पत्रे ठेवलेले आढळून आले. मुख्य प्रवेशद्वाराकडून न जाता पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वाराकडून अनेक कर्मचारी तसेच नागरिक आवागमन करतात. त्यांना अडथळा किंवा इजा होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संगणक कक्षात दुपारच्या सत्रात आरोग्य विभागाची बैठक सुरु होती. त्यामुळे व्हरांड्यात असलेल्या दस्तावेजांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. नागरिक त्या दस्तावेजांची पाहणी करीत होते. मात्र कुणीही दस्तावेजाविषयी ‘ब्र’ काढला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद दस्तावेजांच्या सुरक्षेसाठी किती गंभीर आहेत, याची कल्पना येते. हे येथे उल्लेखनीय.