शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

आजही जपले जाते पाटा-वरवंट्याचे महत्त्व

By admin | Updated: January 21, 2016 00:53 IST

'तिखट-मिरची पाट्यावरची' अशी म्हण आजही तेवढीच महत्वाची आहे,जेवढी आधी होती. सध्याच्या युगात मिक्सर ग्रार्इंडरचा उपयोग घरोघरी होत चालला तरी खवैये लोकांना पाट्यावर तयार केलेले तिखट जास्त आवडते.

तिखट मिरची पाट्यावरची : मिक्सर ग्रार्इंडरच्या युगात ग्रामीणांमध्ये आजही केला जातो उपयोगभंडारा : 'तिखट-मिरची पाट्यावरची' अशी म्हण आजही तेवढीच महत्वाची आहे,जेवढी आधी होती. सध्याच्या युगात मिक्सर ग्रार्इंडरचा उपयोग घरोघरी होत चालला तरी खवैये लोकांना पाट्यावर तयार केलेले तिखट जास्त आवडते. आदी काळापासूनच अन्न, वस्त्र, निवारा या तीन मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. त्यात अन्न ही प्रथम सर्व महत्वाची गरज. शरीराला टिकवून ठेवायचे असेल तर मनुष्य अन्नाशिवाय राहू शकत नाही. अन्नाविना जगू शकत नाही. अन्न ही मनुष्याची नित्याची गरज. मग अन्न कसे असावे, काय असावे, त्यात काय समाविष्ट असावे, यालाही तेवढेच महत्व असते. भात किंवा भाकर व पोळीचा उपयोग पोट भरण्यासाठी केला जातो. परंतु त्याचबरोबर शरीराला पोषकता व तोंडाला स्वाद आदीचा विचार करीत त्यासोबत भाजी तेवढीच महत्वाची असते. मग भाजीमध्ये स्वाद किंवा गरज म्हणून मीठमिरची, हळद, कांदा, लसून, तेल वगैरे पदार्थांचे फार महत्व असते. यात काही पदार्थ सरळ भाजीत टाकता येत नाही. त्यामुळे त्यांना पिसने, मिक्स करणे आवश्यक असते. या गरजेमुळे पाटा-वरवंटा जन्माला आला.मनुष्याने दगडाचा उपयोग पाटा-वरंवटासाठी करणे सुरू केले. त्याचा उपयोग आजही महत्वपूर्ण ठरत आहे. कालांतराने तिखट बनविण्याचे अनेक उपकरण, साधन तयार केले गेले. मशीनचा उपयोग होऊ लागला. एवढेच नाही तर आयते तिखट बाजारात उपलब्ध होऊ लागले.परंतु तरीसुध्दा पाटा-वरवंटा याचे महत्व मुळीच कमी झाले नाही. सामान्यत: भाजीमध्ये लाल तिखट जास्त वापरला जातो.त्याचे पावडर बाजारात सर्वत्र उपलब्ध असते. परंतु ग्रामीण भागात राहणारे लोक रोज लाल मिरच्या आवश्यक प्रमाणात घेऊन त्यासोबत लसून, आले, धनिया, तेजपान, काळी मिर्च, शेंगदाने, जिरे इत्यादी मसाल्याच्या वस्तू पाट्यावर पिसून त्याचे ओले तिखट मसाले तयार करून भाजीत टाकणे पसंद करतात. विशेषकरून मासांहार करणारे लोक; मटन, चिकन, अंडी, मासोळी बनवताना पात्यावर तयार केलेले ओले रसयुक्त तिखट मसाल्यांना जास्त पसंती देतात. अशा तिखटामुळे भाजीला विशेष चव येते, असे त्यांचे म्हणणे असते. वाढत्या शहरीकरणामुळे व विलासी जीवनशैलीमुळे अनेक महिला पाट्यावर तिखट तयार करण्याला टाळतात. त्यामुळे ते लोक जास्त करून मिक्सर ग्रार्इंडर मशीनचा अधिक उपयोग करतात. परंतु शहरातसुध्दा अनेक लोक पाटा-वरवंटा आपल्या घरी ठेवून त्याचा वेळोवेळी उपयोग करतात. (नगर प्रतिनिधी)