शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

आनंदी जीवनात संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:57 IST

संक्रांतीचा सण हा पावन पर्व असला तरी वर्षभर आपण आनंदी आहोत किंवा नाही हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. महर्षी महेश योगीजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानव समूहाला आनंदमय जीवन जगण्याचाच संदेश दिला. त्यामुळे आनंदी जीवनात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रेरणादायी विचार महर्षी विद्या मंदिर शाळेच्या प्राचार्य श्रुती ओहळे यांनी केले.

ठळक मुद्देप्राचार्य श्रुती ओहळे यांचे विचार

भंडारा : संक्रांतीचा सण हा पावन पर्व असला तरी वर्षभर आपण आनंदी आहोत किंवा नाही हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. महर्षी महेश योगीजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानव समूहाला आनंदमय जीवन जगण्याचाच संदेश दिला. त्यामुळे आनंदी जीवनात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रेरणादायी विचार महर्षी विद्या मंदिर शाळेच्या प्राचार्य श्रुती ओहळे यांनी केले.मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर लोकमततर्फे गुड बोला गोड बोला अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत बोलताना प्राचार्य ओहळे म्हणाल्या की, मानवी जीवनात संवादाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मनुष्याच्या बोलीत कडूपणा असेल तर ते कधीही कुणी खपवून घेत नाही. मनुष्य जीवन एकदाच मिळत असल्याने आपल्या बोलण्यातून किंवा संवादातून कुणाचेही मन न दुखवता जीवन जगणे हीच खरी कला आहे. यातूनच आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा मिळू शकते. नैराश्य किंवा हीन भावना आपल्यामध्ये कधीही न आणता सदैव सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महर्षींनी सांगितलेल्या ध्यान, योग, साधना या महत्वपूर्ण माध्यमांचा वापर प्रत्येकाने आपल्या जीवनात केला पाहिजे. बोलण्यातून कुणाला धीर मिळत असेल तर ती अत्यंत चांगली बाब आहे. परिणामी त्या व्यक्तीची समस्या ही क्षणात सुटू शकते. गोड बोलण्यातून माणसे जोडण्याची कला फक्त मनुष्याला अवगत असल्याने त्याचा सकारात्मक वापर व्हायला हवा.मकरसंक्रांतीच्या पर्वावर सूर्य तेजोमयाकडे जात असताना आपले विचारही तेवढेच गतीमान व उद्देशपूर्ण असले पाहिजे. मेहनत, चिकाटी, उत्साह व सत्यता हे गुण अंगीकारून प्रत्येकाने विकासाकडे वाटचाल करावी असेही प्राचार्य ओहळे म्हणाल्या.