शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी जीवनात संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:57 IST

संक्रांतीचा सण हा पावन पर्व असला तरी वर्षभर आपण आनंदी आहोत किंवा नाही हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. महर्षी महेश योगीजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानव समूहाला आनंदमय जीवन जगण्याचाच संदेश दिला. त्यामुळे आनंदी जीवनात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रेरणादायी विचार महर्षी विद्या मंदिर शाळेच्या प्राचार्य श्रुती ओहळे यांनी केले.

ठळक मुद्देप्राचार्य श्रुती ओहळे यांचे विचार

भंडारा : संक्रांतीचा सण हा पावन पर्व असला तरी वर्षभर आपण आनंदी आहोत किंवा नाही हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. महर्षी महेश योगीजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानव समूहाला आनंदमय जीवन जगण्याचाच संदेश दिला. त्यामुळे आनंदी जीवनात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रेरणादायी विचार महर्षी विद्या मंदिर शाळेच्या प्राचार्य श्रुती ओहळे यांनी केले.मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर लोकमततर्फे गुड बोला गोड बोला अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत बोलताना प्राचार्य ओहळे म्हणाल्या की, मानवी जीवनात संवादाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मनुष्याच्या बोलीत कडूपणा असेल तर ते कधीही कुणी खपवून घेत नाही. मनुष्य जीवन एकदाच मिळत असल्याने आपल्या बोलण्यातून किंवा संवादातून कुणाचेही मन न दुखवता जीवन जगणे हीच खरी कला आहे. यातूनच आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा मिळू शकते. नैराश्य किंवा हीन भावना आपल्यामध्ये कधीही न आणता सदैव सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महर्षींनी सांगितलेल्या ध्यान, योग, साधना या महत्वपूर्ण माध्यमांचा वापर प्रत्येकाने आपल्या जीवनात केला पाहिजे. बोलण्यातून कुणाला धीर मिळत असेल तर ती अत्यंत चांगली बाब आहे. परिणामी त्या व्यक्तीची समस्या ही क्षणात सुटू शकते. गोड बोलण्यातून माणसे जोडण्याची कला फक्त मनुष्याला अवगत असल्याने त्याचा सकारात्मक वापर व्हायला हवा.मकरसंक्रांतीच्या पर्वावर सूर्य तेजोमयाकडे जात असताना आपले विचारही तेवढेच गतीमान व उद्देशपूर्ण असले पाहिजे. मेहनत, चिकाटी, उत्साह व सत्यता हे गुण अंगीकारून प्रत्येकाने विकासाकडे वाटचाल करावी असेही प्राचार्य ओहळे म्हणाल्या.