शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

विना रॉयल्टी गौण खनिजांची मध्यप्रदेशातून आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

चुल्हाड ( सिहोरा ) : बपेरा आंतरराज्य सीमेवरून मध्यप्रदेशातील विना रॉयल्टी गौण खनिजांची बेधडक आयात सुरू झाली आहे. ...

चुल्हाड ( सिहोरा ) : बपेरा आंतरराज्य सीमेवरून मध्यप्रदेशातील विना रॉयल्टी गौण खनिजांची बेधडक आयात सुरू झाली आहे. पोलीस, वन आणि महसूल विभागाची यंत्रणा कार्यरत असताना कारवाई शून्य आहे. राजरोस सुरू असणाऱ्या या अवैध व्यवसायाला कारवाईचा फार्स देण्यात येत आहे. यामुळे कारवाईच्या नावावर वसुलीत वाढ झाली आहे.

सिहोरा परिसरातील गावांचे हाकेच्या अंतरावर मध्यप्रदेशातील गावे आहेत. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यातील सीमा बावणथडी नदीच्या पात्राने विभागण्यात आली आहेत. नदीचे पात्र घाट लिलाव करताना महसूल विभाग सीमांकन करीत आहे. नदी पात्रात रेतीचा अनधिकृत उपसा करताना ट्रक व ट्रॅक्टर आढळून आल्यास दोन्ही राज्याचे वन, महसूल आणि पोलीस विभागाची यंत्रणा कारवाई करीत आहे. मजेशीर बाब म्हणजे नदी पात्रात मध्यप्रदेशातील हद्दीत वाहन कारवाई करताना दिसून आल्यास महाराष्ट्राच्या हद्दीत वाहने पळविली जात आहेत. बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी मंजूर करण्यात आली आहे. याच चौकीनजीक वन विभागाचे सहायक वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय आहे. या सीमेपासून अवघ्या एक किमी अंतरावर महसूल विभागाचे तलाठी कार्यालय आहे. तिन्ही महत्त्वपूर्ण विभाग आंतरराज्यीय सीमेवर कार्यरत असताना बेधडक गौण खनिजांची आयात केली जात आहे. सीमेवर एकही वाहनांची तपासणी केली जात नाही. ट्रक आणि ट्रॅक्टरने विना रॉयल्टी गौण खनिज आयात करण्यात येत असताना आलबेल प्रकार ठेवण्यात येत आहे. दरम्यान मध्यप्रदेशातून विना रॉयल्टी गौण खनिज, नद्यांचे काठावरील रेतीचे डम्पिंग यार्ड, मध्यप्रदेशातून मोहफुल आयात करण्यात येत असताना महसूल, वन आणि पोलीस विभागाने कधी धाडसी कारवाई केली नाही. कारवाईच्या नावावर कर्मचारी अवैध वसुली करीत आहेत. यामुळे अवैध व्यवसाय फोफावला आहे. मध्यप्रदेशातील स्वस्त दरात विना रॉयल्टीचे विटा, गिट्टी, रेती व बांधकाम साहित्य उपलब्ध होत आहे. स्थानिक व्यावसायिकांचे व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर आले आहेत. यामुळे व्यावसायिकांत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

बॉक्स

सिहोरा परिसरात तलाठ्यांना कार्यालयात शोधले जात आहे. खरीप हंगामातील धान निघाल्याने शेतकरी सात-बारा दस्तऐवजाकरिता तलाठी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. तलाठी शोधूनही सापडत नाहीत. यासंदर्भात तहसील कार्यालयात संपर्क साधला जात आहे. तलाठी फिरत्या पथकात असल्याचे सांगितले जात आहेत. फिरत्या पथकावर रेती चोरी, गौण खनिज चोरी थांबविणे, वाहनावर दंडात्मक कारवाई करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे अशी जबाबदारी आहे.