शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:52 IST

जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ही लस संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देलस पूर्णपणे सुरक्षित : गोवर-रुबेला मोहिमेत ८३ टक्के लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ही लस संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.२७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील १३२४ शाळांमधून २ लाख २१ हजार ३३४ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. या मोहीमेची टक्केवारी ८३ आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून २७ डिसेंबर पर्यंत २ लाख ६५ हजार ८४२ विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. गोवर-रुबेला लस पूर्णपणे सुरक्षित असून या पूर्वी २२ राज्यांमध्ये १३ कोटी बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.भंडारा तालुक्यात ४९ हजार ७५३, मोहाडी २८ हजार ८६७, तुमसर ४० हजार ६९७, लाखनी २६ हजार ३९९, साकोली २५ हजार ६, लाखांदूर १९ हजार ५८७ आणि पवनी तालुक्यात ३१ हजार २५ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील १४२८ शाळा आणि १४२७ अंगणवाडी केंद्रातील बालकांना लस देण्याची मोहीम जिल्ह्यात सुरु आहे. या मोहीमेदरम्यान काही ठिकाणी बालकांना किरकोळ स्वरुपाचा त्रास झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.आराध्याच्या मृत्यूचे कारण अहवालानंतरच कळेललाखनी तालुक्यातील लाखोरी येथील आराध्या रणजित वाघाये (११ महिने) हिचा मृत्यू झाला. गोवर-रुबेला लस दिल्यानेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मात्र तिचा नेमका मृत्यू कशाने झाला हे वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके यांनी दिली. लसीकरणादरम्यान १७० बालकांना सौम्य स्वरुपाच्या प्रतिक्रिया उद्भवल्या होत्या. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आले. दहा लाभार्थ्यांना मध्यम प्रतिक्रिया उद्भवल्याने नागपुरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आल्याचे डॉ.उईके यांनी सांगितले.