शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

दूषित पाणी पुरवठ्याने बळावले आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 22:10 IST

भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : लिकेज शोधूनही सापडेना, वाढीव पाणीपुरवठा योजेनेचे कामही सुरू होईना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.हाकेच्या अंतरावर बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रातून पावणेदोन लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहराला पाणी पुरवठा नगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो.शहरात १० हजारांच्या वर घरगुती नळधारक असून ३०० च्या वर सार्वजनिक नळजोडणी आहेत. दिवसेंगणिक नळधारकांची संख्याही वाढत असताना दूषित पाण्याच्या समस्येवर अजूनपर्यंत कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही.‘फॉल्ट’ शोधूनही सापडत नसल्याने पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे भंडारा शहरातील नळाच्या उपयोगीतेवर असलेल्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यात त्वचेचे व पोटाचे विकार बळावले आहेत.शुद्ध पाण्याचा गोरखधंदादूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेकांनी पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी विकत घेण्याकडे कल वाढविला आहे. अनेकांनी नळाचे पाणी पिणे बंद केले आहे. मात्र बाहेरील वापरासाठी नळाचे पाणी वापरले जाते. परिणामी त्वचेचे आजार होत असल्याची बाब समोर येत आहे. दुसरीकडे भंडारा शहरात ठिकठिकाणी पाच रुपयात २० लिटर पाणी देण्याचे केंद्र सुरु झाल्याने व दुसरीकडे पालिका तर्फे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने शुद्ध पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या व्यवसायाला कुणाचीही सक्ती नसली तरी पालिका प्रशासनाची जबाबदारी शुद्ध पाणी पुरवठ्याची असताना याबाबत पालिका प्रशासन धीरगंभीर दिसत नाही.ठिकठिकाणी येते काळेकुट्ट पाणीशहरातील बहुतांश भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यात काही ठिकाणी काळेकुट्ट पाणी तर काही ठिकाणी फेसाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. काही वॉर्डात तर रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाबही समोर आली आहे. याबाबत नागरिकांनी स्वत: पालिका कार्यालयात जाऊन अधिकाºयांसह पदाधिकाऱ्यांना ही बाब कळविली आहे. मात्र यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही.