शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

दूषित पाणी पुरवठ्याने बळावले आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 22:10 IST

भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : लिकेज शोधूनही सापडेना, वाढीव पाणीपुरवठा योजेनेचे कामही सुरू होईना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.हाकेच्या अंतरावर बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रातून पावणेदोन लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहराला पाणी पुरवठा नगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो.शहरात १० हजारांच्या वर घरगुती नळधारक असून ३०० च्या वर सार्वजनिक नळजोडणी आहेत. दिवसेंगणिक नळधारकांची संख्याही वाढत असताना दूषित पाण्याच्या समस्येवर अजूनपर्यंत कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही.‘फॉल्ट’ शोधूनही सापडत नसल्याने पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे भंडारा शहरातील नळाच्या उपयोगीतेवर असलेल्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यात त्वचेचे व पोटाचे विकार बळावले आहेत.शुद्ध पाण्याचा गोरखधंदादूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेकांनी पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी विकत घेण्याकडे कल वाढविला आहे. अनेकांनी नळाचे पाणी पिणे बंद केले आहे. मात्र बाहेरील वापरासाठी नळाचे पाणी वापरले जाते. परिणामी त्वचेचे आजार होत असल्याची बाब समोर येत आहे. दुसरीकडे भंडारा शहरात ठिकठिकाणी पाच रुपयात २० लिटर पाणी देण्याचे केंद्र सुरु झाल्याने व दुसरीकडे पालिका तर्फे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने शुद्ध पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या व्यवसायाला कुणाचीही सक्ती नसली तरी पालिका प्रशासनाची जबाबदारी शुद्ध पाणी पुरवठ्याची असताना याबाबत पालिका प्रशासन धीरगंभीर दिसत नाही.ठिकठिकाणी येते काळेकुट्ट पाणीशहरातील बहुतांश भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यात काही ठिकाणी काळेकुट्ट पाणी तर काही ठिकाणी फेसाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. काही वॉर्डात तर रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाबही समोर आली आहे. याबाबत नागरिकांनी स्वत: पालिका कार्यालयात जाऊन अधिकाºयांसह पदाधिकाऱ्यांना ही बाब कळविली आहे. मात्र यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही.