शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

दूषित पाणी पुरवठ्याने बळावले आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 22:10 IST

भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : लिकेज शोधूनही सापडेना, वाढीव पाणीपुरवठा योजेनेचे कामही सुरू होईना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.हाकेच्या अंतरावर बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रातून पावणेदोन लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहराला पाणी पुरवठा नगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो.शहरात १० हजारांच्या वर घरगुती नळधारक असून ३०० च्या वर सार्वजनिक नळजोडणी आहेत. दिवसेंगणिक नळधारकांची संख्याही वाढत असताना दूषित पाण्याच्या समस्येवर अजूनपर्यंत कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही.‘फॉल्ट’ शोधूनही सापडत नसल्याने पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे भंडारा शहरातील नळाच्या उपयोगीतेवर असलेल्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यात त्वचेचे व पोटाचे विकार बळावले आहेत.शुद्ध पाण्याचा गोरखधंदादूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेकांनी पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी विकत घेण्याकडे कल वाढविला आहे. अनेकांनी नळाचे पाणी पिणे बंद केले आहे. मात्र बाहेरील वापरासाठी नळाचे पाणी वापरले जाते. परिणामी त्वचेचे आजार होत असल्याची बाब समोर येत आहे. दुसरीकडे भंडारा शहरात ठिकठिकाणी पाच रुपयात २० लिटर पाणी देण्याचे केंद्र सुरु झाल्याने व दुसरीकडे पालिका तर्फे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने शुद्ध पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या व्यवसायाला कुणाचीही सक्ती नसली तरी पालिका प्रशासनाची जबाबदारी शुद्ध पाणी पुरवठ्याची असताना याबाबत पालिका प्रशासन धीरगंभीर दिसत नाही.ठिकठिकाणी येते काळेकुट्ट पाणीशहरातील बहुतांश भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यात काही ठिकाणी काळेकुट्ट पाणी तर काही ठिकाणी फेसाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. काही वॉर्डात तर रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाबही समोर आली आहे. याबाबत नागरिकांनी स्वत: पालिका कार्यालयात जाऊन अधिकाºयांसह पदाधिकाऱ्यांना ही बाब कळविली आहे. मात्र यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही.