शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

तालुक्यात गौण खनिजांचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:57 IST

भंडाराचे रस्त्याचे बांधकामाचे कंत्राट एका कंपनीला मिळाले आहे. यात सदर कंपनी रस्त्याच्या कामात गौणखनिजांचे सर्रास उत्खनन करून वाहनांना ४ ब्रास परिमाणाचे वाहतूक पासेस देऊन ६ ब्रास गौण खनिजांचे वहन करीत आहे. हा सर्व प्रकार तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनाला माहित असुनही प्रशासकीय अधिकारी मात्र बघ्यांची भूमिका घेत आहेत.

ठळक मुद्देमहसूल प्रशासन मात्र सुस्त : कोट्यवधींचा महसूल पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भंडाराचे रस्त्याचे बांधकामाचे कंत्राट एका कंपनीला मिळाले आहे. यात सदर कंपनी रस्त्याच्या कामात गौणखनिजांचे सर्रास उत्खनन करून वाहनांना ४ ब्रास परिमाणाचे वाहतूक पासेस देऊन ६ ब्रास गौण खनिजांचे वहन करीत आहे. हा सर्व प्रकार तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनाला माहित असुनही प्रशासकीय अधिकारी मात्र बघ्यांची भूमिका घेत आहेत.१५ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम पोहरकर हे त्यांच्या वाहनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मानेगाव वरून लाखनीकडे येत असताना सदर कंपनीचे टिप्पर क्रमांक एमएच ३६ एए ११२२ हे वाहन गौण खनिज घेवून मानेगाव कडून लाखनीकडे जात होते. परंतु सदर वाहनात अतिरिक्त गौणखनिज क्षमतेपेक्षा जास्त असल्याने सदर वाहनातील गिट्टी चालत्या वाहनातून रस्त्यावर पडत होती. त्यामुळे पोहरकराना वाहन चालवताना अपघात होता होता थोडक्यात बचावले. त्यामुळे पोहरकरांनी सदर वाहन थांबवून वाहनाच्या चालकास विचारपूस केली असता त्यांना सदर वाहनात ४ ब्रास रॉयल्टी व त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात गौण खनिज आढळले. त्यांनी ही बाब लाखनीचे तहसीलदार विराणी यांना फोन करून निदर्शनास आणून दिली त्यांनी लगेच आपल्या विभागाचे कर्मचारी पाठवून सदर वाहन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे येथे अडवून ठेवले आता संबंधित विभाग या कंपनीच्या अवैध उत्खननावर काय कार्यवाही करतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.क्षमतेपेक्षा अधिक खनिजाची वाहतूकशिवालय कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. या कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ता बांधकामाचे काम मिळाले आहे. सदर कामात कंपनीचे जवळपास ३० टिप्पर लागलेले असून अहोरात्र या वाहनाद्वारे उत्खनन करून वहन केल्या जात आहे. एका टिप्परद्वारे एकवेळेला २ ब्रास अतिरिक्त गौण खनिज, एका वाहनांची एकाच फेरीत रोजचे जवळपास ६० ब्रास अतिरिक्त गौणखनिज या कंपनीद्वारे काढल्या जात आहे. हा प्रकार मागील दोन-तीन महिन्यापासून सुरू आहे. नैसर्गीक संपदेला धोका निर्माण होत असून शासनाच्या कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे.