शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

विविधांगी कलागुण जोपासणारे बहुरुपी उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:02 IST

प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. त्यांच्यात सुप्त कलागुण असतात.

ठळक मुद्देउपजिवीकेसाठी दाहीदिशा : समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नाची गरज

शिवशंकर बावनकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. त्यांच्यात सुप्त कलागुण असतात. त्या सुप्त गुणातून इतरांची मने जिंकून आपल्या कलेतून समाज प्रबोधन करणारा बहुरुपी कलावंतांचा समाज अनादिकालापासून उपेक्षित जीवन जगणारी एक जमात बहुरुपी म्हणून ओळखली जाते.आपल्या कलेतून समाजप्रबोधन करण्याचे काम हा समाज करत आहे. मात्र आज या समाजाची अवस्था दयनीय असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळते.वंशपरंपरेनुसार बहुरुपी विविध प्रकारचे सोंग घेऊन आपली कला प्रदर्शित करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. साकोली तालुक्यात चारगाव व परिसरात अनेक बहुरुपी कुटुंब वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील कर्ते पुरुष विविध रुपे धारण करून अनेक भूमिका वठवितात. त्यात स्त्री पोशाख परिधान करून कुमारिका, गृहिणी, पोलीस, डॉक्टर, शंकर पार्वती, हनुमान, राम सीता, श्रीकृष्ण अशी विविध रुपे धारण करून लोकांचे मनोरंजनातून समाजप्रबोधन करतात. त्या माध्यमातून मिळणाºया अत्यल्प मिळकतीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दिवसाकाठी मिळणाºया अल्पश: मिळकतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलवतानाच विविध सोंग धारण करण्यासाठी लागणाºया सामानांची तजवीज त्यांना करावी लागते.वंशरंपरेने चालत आलेल्या आणि अवगत झालेल्या कलेच्या आधाराशिवाय त्यांच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. विशेष बाब म्हणजे या समाजात महिलांना बहुरुप्याचे सोंग करण्यास मनाई असल्यामुळे फक्त पुरुषच सोंग घेऊन कला प्रदर्शित करतात. या समाजाचा भटक्या जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या समाजाकडे स्वत:ची शेती नाही. कोणतेही दुसरे काम नाही. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांनाही फारसे शिकविण्यात येत आहे. कसेबसे शिक्षण घेतलेच तर शिक्षणानंतर नोकरी नाही. अशा परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. परिसरात कोणतेच काम उपलब्ध नसते. तेव्हा या समाजातील पुरुष मंडळी अनेक मोठ्या शहरांमध्ये जाऊन आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. त्यानंतरच्या कालावधीत गावाकडेच मिळेल ते काम करून आपली उपजिविका करताना दिसून येतात. शासनाने यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.