शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विविधांगी कलागुण जोपासणारे बहुरुपी उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:02 IST

प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. त्यांच्यात सुप्त कलागुण असतात.

ठळक मुद्देउपजिवीकेसाठी दाहीदिशा : समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नाची गरज

शिवशंकर बावनकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. त्यांच्यात सुप्त कलागुण असतात. त्या सुप्त गुणातून इतरांची मने जिंकून आपल्या कलेतून समाज प्रबोधन करणारा बहुरुपी कलावंतांचा समाज अनादिकालापासून उपेक्षित जीवन जगणारी एक जमात बहुरुपी म्हणून ओळखली जाते.आपल्या कलेतून समाजप्रबोधन करण्याचे काम हा समाज करत आहे. मात्र आज या समाजाची अवस्था दयनीय असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळते.वंशपरंपरेनुसार बहुरुपी विविध प्रकारचे सोंग घेऊन आपली कला प्रदर्शित करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. साकोली तालुक्यात चारगाव व परिसरात अनेक बहुरुपी कुटुंब वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील कर्ते पुरुष विविध रुपे धारण करून अनेक भूमिका वठवितात. त्यात स्त्री पोशाख परिधान करून कुमारिका, गृहिणी, पोलीस, डॉक्टर, शंकर पार्वती, हनुमान, राम सीता, श्रीकृष्ण अशी विविध रुपे धारण करून लोकांचे मनोरंजनातून समाजप्रबोधन करतात. त्या माध्यमातून मिळणाºया अत्यल्प मिळकतीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दिवसाकाठी मिळणाºया अल्पश: मिळकतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलवतानाच विविध सोंग धारण करण्यासाठी लागणाºया सामानांची तजवीज त्यांना करावी लागते.वंशरंपरेने चालत आलेल्या आणि अवगत झालेल्या कलेच्या आधाराशिवाय त्यांच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. विशेष बाब म्हणजे या समाजात महिलांना बहुरुप्याचे सोंग करण्यास मनाई असल्यामुळे फक्त पुरुषच सोंग घेऊन कला प्रदर्शित करतात. या समाजाचा भटक्या जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या समाजाकडे स्वत:ची शेती नाही. कोणतेही दुसरे काम नाही. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांनाही फारसे शिकविण्यात येत आहे. कसेबसे शिक्षण घेतलेच तर शिक्षणानंतर नोकरी नाही. अशा परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. परिसरात कोणतेच काम उपलब्ध नसते. तेव्हा या समाजातील पुरुष मंडळी अनेक मोठ्या शहरांमध्ये जाऊन आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. त्यानंतरच्या कालावधीत गावाकडेच मिळेल ते काम करून आपली उपजिविका करताना दिसून येतात. शासनाने यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.