शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

विविधांगी कलागुण जोपासणारे बहुरुपी उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:02 IST

प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. त्यांच्यात सुप्त कलागुण असतात.

ठळक मुद्देउपजिवीकेसाठी दाहीदिशा : समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नाची गरज

शिवशंकर बावनकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. त्यांच्यात सुप्त कलागुण असतात. त्या सुप्त गुणातून इतरांची मने जिंकून आपल्या कलेतून समाज प्रबोधन करणारा बहुरुपी कलावंतांचा समाज अनादिकालापासून उपेक्षित जीवन जगणारी एक जमात बहुरुपी म्हणून ओळखली जाते.आपल्या कलेतून समाजप्रबोधन करण्याचे काम हा समाज करत आहे. मात्र आज या समाजाची अवस्था दयनीय असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळते.वंशपरंपरेनुसार बहुरुपी विविध प्रकारचे सोंग घेऊन आपली कला प्रदर्शित करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. साकोली तालुक्यात चारगाव व परिसरात अनेक बहुरुपी कुटुंब वास्तव्यास आहेत. या कुटुंबातील कर्ते पुरुष विविध रुपे धारण करून अनेक भूमिका वठवितात. त्यात स्त्री पोशाख परिधान करून कुमारिका, गृहिणी, पोलीस, डॉक्टर, शंकर पार्वती, हनुमान, राम सीता, श्रीकृष्ण अशी विविध रुपे धारण करून लोकांचे मनोरंजनातून समाजप्रबोधन करतात. त्या माध्यमातून मिळणाºया अत्यल्प मिळकतीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दिवसाकाठी मिळणाºया अल्पश: मिळकतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलवतानाच विविध सोंग धारण करण्यासाठी लागणाºया सामानांची तजवीज त्यांना करावी लागते.वंशरंपरेने चालत आलेल्या आणि अवगत झालेल्या कलेच्या आधाराशिवाय त्यांच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. विशेष बाब म्हणजे या समाजात महिलांना बहुरुप्याचे सोंग करण्यास मनाई असल्यामुळे फक्त पुरुषच सोंग घेऊन कला प्रदर्शित करतात. या समाजाचा भटक्या जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या समाजाकडे स्वत:ची शेती नाही. कोणतेही दुसरे काम नाही. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांनाही फारसे शिकविण्यात येत आहे. कसेबसे शिक्षण घेतलेच तर शिक्षणानंतर नोकरी नाही. अशा परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. परिसरात कोणतेच काम उपलब्ध नसते. तेव्हा या समाजातील पुरुष मंडळी अनेक मोठ्या शहरांमध्ये जाऊन आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. त्यानंतरच्या कालावधीत गावाकडेच मिळेल ते काम करून आपली उपजिविका करताना दिसून येतात. शासनाने यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.