शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मागासवर्गीयांच्या विकासाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 7, 2014 23:26 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी जो ७००० हजार कोटी रूपयांचा निधी दिला होता. तो निधी अनुसूचित जाती जमाती

भंडारा : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत आघाडी सरकारने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी जो ७००० हजार कोटी रूपयांचा निधी दिला होता. तो निधी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या विकासासाठी खर्च न करता इतरत्र वळवून मागासवर्गीय समाजावर अन्याय केला. सदर निधी नियमबाह्यपणे इतरत्र वळविण्याचे कारण काय, असा प्रश्न आहे. याबाबत विचारवंत नागरिकांनी सम्यक विचार करून आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारणे गरजेचे आहे, असे आवाहन केले आहे.मागासवर्गीय समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन अर्थसंकल्पात निधीची तरतूद करीत असतो. एवढेच नव्हे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक ४६ नुसार राज्य हे दुर्बल वर्ग, विशेषत: अनु सूचित जाती जमाती यांचे विशेष काळजीपुर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील तसेच सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील असे घटनेमध्ये तरतूद केली आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजाला घटनादत्त हक्क मिळणे काळाची गरज आहे.योजना आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती, उपाययोजनेचा निधी नॉन, लॅटसेबल व नॉन डायव्हटेबल असतो तरीपण राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी तरतूद केलेला निधी इतरत्र वळवून मागासवर्गीय समाजावर फामोठा अन्याय केलाआहे. अखर्चित निधी समर्पित होत नाही तर तो निधी दरवर्षी संग्रहित होतो. त्यामुळे हा संपूर्ण निधी एस.सी. एस.टी. जातीच्या व्यक्ती व कुटुंब यांचे समग्र कल्याण तसेच त्यांचे वस्तीत पायाभूत सुविधावरच खर्च करण्याचे बंधन आहे. त्यामुळे हा निधी इतरत्र कोठेही वळविता येत नसताना एस.सी., एस.टी. समाजाच्या विकासाचा सात हजार कोटी रूपयांचा निधी राज्य सरकारने इतरत्र वळविला ही फार मोठी गंभीर वंचिताजनक बाब आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताधारी एस.सी., एस.टी. समाजाचा युज अ‍ॅन्ड थ्रो सारखा उपयोग करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनुसूचित जाती मागासवर्गीय समाजाचा तब्बल सात हजार कोटी रूपयांचा अनुशेष आहे. या समाजाच्या लोकसंख्येनुसार जो निधी द्यायला पाहिजे होता तो निधी राज्य सरकारने दिलेला नाही. तो निधी अखर्चित राहिला आहे. त्यामुळे तो निधी लॉप्स व समर्पित होत नसल्यामुळे तो निधी कॅरिफारवर्ड व्हायला पाहिजे एवढेच नव्हे तर आरक्षण धोरणानुसार सेवामधील पदाचा अनुशेष काढला जातो, त्याप्रमाणे एस.सी., एस.टी. समाजाच्या विकासाचा अनुशेष काढायला पाहिजे परंतू तसे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने करण्याचा प्रयत्न केला नाही हे त्यातील वास्तव आहे. (नगर प्रतिनिधी)