शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:03 IST

शेतकºयांच्या आत्महत्या, पाण्याचा गंभीर प्रश्न, चाºयाचा प्रश्न यासारख्या जिल्ह्यातील ज्वलंत समस्या नागरिकांपुढे आ वासून उभ्या असताना शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देभंडाºयात पत्रपरिषद : प्रफुल पटेल यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकºयांच्या आत्महत्या, पाण्याचा गंभीर प्रश्न, चाºयाचा प्रश्न यासारख्या जिल्ह्यातील ज्वलंत समस्या नागरिकांपुढे आ वासून उभ्या असताना शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सद्यस्थितीत जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून कुठलाही वर्ग सुखी व समाधानी नाही. याला शासन जबाबदार आहे असा आरोप खासदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केला.दुपारी १२ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी स्कॉलरशिप, आपादग्रस्त शेतकºयांना मदत, कर्जमाफीचा सरसकट लाभ ही बाब सर्वसामान्यांसह सर्वांनाच संभ्रमात घालणारी आहे. पिक विम्याची स्थिती फार वाईट असताना खासगी कंपन्याही शेतकºयांचे ऐकत नाही. मागील दोन वर्षांपासून शेतकºयांना पिक विम्याचा किती लाभ मिळाला याची आकडेवारी पाहिल्यास हे समजून येईल. दुष्काळाच्या स्थितीबाबत बोलताना पटेल म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. कृषीपंपांना नियमित वीज नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे भविष्यात चारा व पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवणार आहे. प्रकल्पामध्ये पाण्याचा साठाच नसल्याने सिंचनाला पाणी तरी कुठून द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशा स्थितीत सत्तेतील पदाधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस न बरसल्यास जिल्ह्यात दुष्काळी स्थितीला अजून हातभार लागणार आहे. पालिकेत विरोधकांची भूमिका जोरदार वठवू अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. जिल्हा महिला रुग्णालयाच्या मुद्यावर प्रशासनातील मंत्री, अधिकारी बोलायला तयार नाहीत. अच्छे दिनाच्या नावावर सर्वसामान्यांची गळचेपी होत असल्याचाही घणाघाती आरोप खा.पटेल यांनी लावला.पत्रकार परिषदेला माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, ज्येष्ठ नेते धनंजय दलाल, सभापती नरेश डहारे आदी उपस्थित होते.