शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:03 IST

शेतकºयांच्या आत्महत्या, पाण्याचा गंभीर प्रश्न, चाºयाचा प्रश्न यासारख्या जिल्ह्यातील ज्वलंत समस्या नागरिकांपुढे आ वासून उभ्या असताना शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देभंडाºयात पत्रपरिषद : प्रफुल पटेल यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकºयांच्या आत्महत्या, पाण्याचा गंभीर प्रश्न, चाºयाचा प्रश्न यासारख्या जिल्ह्यातील ज्वलंत समस्या नागरिकांपुढे आ वासून उभ्या असताना शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सद्यस्थितीत जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून कुठलाही वर्ग सुखी व समाधानी नाही. याला शासन जबाबदार आहे असा आरोप खासदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केला.दुपारी १२ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी स्कॉलरशिप, आपादग्रस्त शेतकºयांना मदत, कर्जमाफीचा सरसकट लाभ ही बाब सर्वसामान्यांसह सर्वांनाच संभ्रमात घालणारी आहे. पिक विम्याची स्थिती फार वाईट असताना खासगी कंपन्याही शेतकºयांचे ऐकत नाही. मागील दोन वर्षांपासून शेतकºयांना पिक विम्याचा किती लाभ मिळाला याची आकडेवारी पाहिल्यास हे समजून येईल. दुष्काळाच्या स्थितीबाबत बोलताना पटेल म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. कृषीपंपांना नियमित वीज नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे भविष्यात चारा व पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवणार आहे. प्रकल्पामध्ये पाण्याचा साठाच नसल्याने सिंचनाला पाणी तरी कुठून द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशा स्थितीत सत्तेतील पदाधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस न बरसल्यास जिल्ह्यात दुष्काळी स्थितीला अजून हातभार लागणार आहे. पालिकेत विरोधकांची भूमिका जोरदार वठवू अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. जिल्हा महिला रुग्णालयाच्या मुद्यावर प्रशासनातील मंत्री, अधिकारी बोलायला तयार नाहीत. अच्छे दिनाच्या नावावर सर्वसामान्यांची गळचेपी होत असल्याचाही घणाघाती आरोप खा.पटेल यांनी लावला.पत्रकार परिषदेला माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, ज्येष्ठ नेते धनंजय दलाल, सभापती नरेश डहारे आदी उपस्थित होते.