शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

नवोदयच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:41 IST

१७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला नवोदय विद्यालय लाभले. आधी भंडारा येथे समस्यांच्या विळख्यात असलेले नवोदय आता मोहाडी येथील माविमं इमारतीत हलविण्यात आले. येथे तरी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, अशी आशा होती. मात्र नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप, विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. याबाबतची माहिती पालकांनी सोमवारी दुपारी १ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत पालकांचा आरोप : मोहाडी येथे विद्यार्थी नेवूनही समस्या मात्र कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला नवोदय विद्यालय लाभले. आधी भंडारा येथे समस्यांच्या विळख्यात असलेले नवोदय आता मोहाडी येथील माविमं इमारतीत हलविण्यात आले. येथे तरी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, अशी आशा होती. मात्र नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप, विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. याबाबतची माहिती पालकांनी सोमवारी दुपारी १ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.पालक म्हणाले, २३ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने बघेल, अशी आशा होती. पालकांनीही या आंदोलनासाठी खूप संघर्ष केले. विशेष म्हणजे नवोदय विद्यालय माविमं इमारतीत पोलीस बंदोबस्तात हलविले याचे नेमके कारण अजुनपर्यंत पालक व संघर्ष समितीला कळले नाही. स्थानांतरणाच्या वेळी या इमारतीत पूर्ण सोयीसुविधा आहेत काय, अशी विचारणा जिल्हा प्रशासनासह मुख्याध्यापक अंबोरे यांना विचारण्यात आले होते. या इमारतीच्या सभोवतालचा परिसर स्वत: पालकांनी पुढाकार घेवून स्वच्छ केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना समस्याबाबत तीन वेळा निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाºयांसोबत चर्चाही करण्यात आली. मात्र पालकांच्या पदरी निराशाच पडली. यावर्षी मुलांना शालेय गणवेश व जोडे मिळालेले नाहीत. मुलांची आरोग्य तपासणीही झालेली नाही. मुलांच्या कक्षामध्ये पुरूष शिक्षका ऐवजी महिला शिक्षकाची नियुक्ती आहे. दीड वर्षांपासून मुख्याध्यापकांनी शालेय समिती स्थापन केली नाही. माविमंच्या इमारत परिसरात महिनाभरात चार विषारी सापही निघाले. स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय व संगणक कक्षाची सोय अजुनपर्यंत झालेली नाही. २२ विद्यार्थ्यांसाठी दोन शौचालय व तीन स्रानगृह आहे. आंघोळीकरिता गरम पाण्याची सोय लवकर करण्यात येईल ही मागणीही अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. परिणामी सदर नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांसाठी शाप की वरदान, असा टोलाही यावेळी पालकांनी लवला.पत्रकार परिषदेला भाऊ कातोरे, उमेश मोहतुरे, भगवान ढेंगे, प्रवीण उदापुरे, यशवंत भोयर, रोहित साठवणे, संजय मते, शशिकांत गजभिये, यशवंत टिचकुले, उषा कातोरे, शालिनी झोडे, विलास मोथरकर, योगिता लांजेवार, मंगेश वंजारी यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.