शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नवोदयच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:41 IST

१७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला नवोदय विद्यालय लाभले. आधी भंडारा येथे समस्यांच्या विळख्यात असलेले नवोदय आता मोहाडी येथील माविमं इमारतीत हलविण्यात आले. येथे तरी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, अशी आशा होती. मात्र नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप, विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. याबाबतची माहिती पालकांनी सोमवारी दुपारी १ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत पालकांचा आरोप : मोहाडी येथे विद्यार्थी नेवूनही समस्या मात्र कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला नवोदय विद्यालय लाभले. आधी भंडारा येथे समस्यांच्या विळख्यात असलेले नवोदय आता मोहाडी येथील माविमं इमारतीत हलविण्यात आले. येथे तरी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, अशी आशा होती. मात्र नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप, विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. याबाबतची माहिती पालकांनी सोमवारी दुपारी १ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.पालक म्हणाले, २३ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने बघेल, अशी आशा होती. पालकांनीही या आंदोलनासाठी खूप संघर्ष केले. विशेष म्हणजे नवोदय विद्यालय माविमं इमारतीत पोलीस बंदोबस्तात हलविले याचे नेमके कारण अजुनपर्यंत पालक व संघर्ष समितीला कळले नाही. स्थानांतरणाच्या वेळी या इमारतीत पूर्ण सोयीसुविधा आहेत काय, अशी विचारणा जिल्हा प्रशासनासह मुख्याध्यापक अंबोरे यांना विचारण्यात आले होते. या इमारतीच्या सभोवतालचा परिसर स्वत: पालकांनी पुढाकार घेवून स्वच्छ केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना समस्याबाबत तीन वेळा निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाºयांसोबत चर्चाही करण्यात आली. मात्र पालकांच्या पदरी निराशाच पडली. यावर्षी मुलांना शालेय गणवेश व जोडे मिळालेले नाहीत. मुलांची आरोग्य तपासणीही झालेली नाही. मुलांच्या कक्षामध्ये पुरूष शिक्षका ऐवजी महिला शिक्षकाची नियुक्ती आहे. दीड वर्षांपासून मुख्याध्यापकांनी शालेय समिती स्थापन केली नाही. माविमंच्या इमारत परिसरात महिनाभरात चार विषारी सापही निघाले. स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय व संगणक कक्षाची सोय अजुनपर्यंत झालेली नाही. २२ विद्यार्थ्यांसाठी दोन शौचालय व तीन स्रानगृह आहे. आंघोळीकरिता गरम पाण्याची सोय लवकर करण्यात येईल ही मागणीही अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. परिणामी सदर नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांसाठी शाप की वरदान, असा टोलाही यावेळी पालकांनी लवला.पत्रकार परिषदेला भाऊ कातोरे, उमेश मोहतुरे, भगवान ढेंगे, प्रवीण उदापुरे, यशवंत भोयर, रोहित साठवणे, संजय मते, शशिकांत गजभिये, यशवंत टिचकुले, उषा कातोरे, शालिनी झोडे, विलास मोथरकर, योगिता लांजेवार, मंगेश वंजारी यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.