शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

संविधान वाचवायचे असेल तर सत्तापरिवर्तन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:45 IST

केंद्र सरकार ही जनतेच्या कसोटीवर सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. निवडणुकीपुरते खोटे आश्वासन देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. ज्या राज्यघटनेवर देश चालतो ते संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांचे आवाहन : वरठी येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : केंद्र सरकार ही जनतेच्या कसोटीवर सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. निवडणुकीपुरते खोटे आश्वासन देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. ज्या राज्यघटनेवर देश चालतो ते संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वसामान्य लोकांच्या हिताचे व हक्काचे रक्षण आणि सामान अधिकार ही संविधानाची देणं आहे. आपण यावेळी सतर्क राहिले नाही तर संविधान केव्हा बदलेल, याची शाश्वती नाही. संविधान वाचवायचे असेल तर सत्ता परिवर्तन करावे लागेल. धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन झाल्याशिवाय सर्वांना अधिकार मिळणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.वरठी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा भुरे, हरिभाऊ भाजीपाले, कल्याणी भुरे, वरठीच्या सरपंच श्वेता येळणे, संगीता सुखानी व राजू कारेमोरे उपस्थित होते.यावेळी खा.प्रफुल पटेल म्हणाले, भाजपचे सरकार हे खोटारडे सरकार असल्याचे उदाहरणे दिली. सामान्य लोकांच्या खिशाला हात घालणारे हे सरकार असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारने सामान्य लोकांच्या कल्याणकारी योजना बंद करून नोकरी व व्यवसाय डबघाईस नेला. चुकीच्या धोरणामुळे उद्यागधंदे बंद झाल्याचा आरोपही त्यांनी केला.