शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

संविधान वाचवायचे असेल तर सत्तापरिवर्तन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:45 IST

केंद्र सरकार ही जनतेच्या कसोटीवर सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. निवडणुकीपुरते खोटे आश्वासन देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. ज्या राज्यघटनेवर देश चालतो ते संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांचे आवाहन : वरठी येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : केंद्र सरकार ही जनतेच्या कसोटीवर सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. निवडणुकीपुरते खोटे आश्वासन देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. ज्या राज्यघटनेवर देश चालतो ते संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वसामान्य लोकांच्या हिताचे व हक्काचे रक्षण आणि सामान अधिकार ही संविधानाची देणं आहे. आपण यावेळी सतर्क राहिले नाही तर संविधान केव्हा बदलेल, याची शाश्वती नाही. संविधान वाचवायचे असेल तर सत्ता परिवर्तन करावे लागेल. धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन झाल्याशिवाय सर्वांना अधिकार मिळणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.वरठी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा भुरे, हरिभाऊ भाजीपाले, कल्याणी भुरे, वरठीच्या सरपंच श्वेता येळणे, संगीता सुखानी व राजू कारेमोरे उपस्थित होते.यावेळी खा.प्रफुल पटेल म्हणाले, भाजपचे सरकार हे खोटारडे सरकार असल्याचे उदाहरणे दिली. सामान्य लोकांच्या खिशाला हात घालणारे हे सरकार असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारने सामान्य लोकांच्या कल्याणकारी योजना बंद करून नोकरी व व्यवसाय डबघाईस नेला. चुकीच्या धोरणामुळे उद्यागधंदे बंद झाल्याचा आरोपही त्यांनी केला.