शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

रेल्वेत आता जास्तीचे सामान न्याल तर भरावा लागेल दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 21:30 IST

Bhandara News मर्यादेपेक्षा जास्त सामान रेल्वेतून नेल्यास प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे. जर कोणाला जास्त सामान न्यायचे असेल तर त्याला पार्सल ऑफिसमधून सामान बुक करावे लागणार आहे.

ठळक मुद्देरेल्वेने काढले नवीन नियम पार्सल ऑफिसमध्ये करावी लागेल बुकिंग

भंडारा : रेल्वेने प्रवास करत असाल आणि जास्त सामान नेले तर ते तुम्हाला महागात पडणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त सामान रेल्वेतून नेल्यास प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे. जर कोणाला जास्त सामान न्यायचे असेल तर त्याला पार्सल ऑफिसमधून सामान बुक करावे लागते.

रेल्वेने जाहीर केलेल्या नियमानुसार, विहित मर्यादेपेक्षा जास्त मालाची ने-आण केल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते. रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत रि हँडलवरून ट्वीट करून लोकांना प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. प्रवासादरम्यान सामान रेल्वेने नेण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जास्त वजन घेऊन गेल्यास दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे आता रेल्वेतून प्रवास करताना सामानाच्या मर्यादेचे पालन करावे लागणार आहे.

जास्तीच्या सामानासाठी मोजावे लागणार पैसे

स्लीपर क्लासमधील प्रवासी जर ८० किलो सामान घेऊन जात असेल तर याचा अर्थ तो ४० किलो जास्त सामान घेऊन जात आहे.

जर तो ५०० किलोमीटरपर्यंत प्रवास करणार असेल तर त्याला १०९ रुपये दंड भरावा लागेल.

४० किलो स्लीपर क्लाससाठी

रेल्वेच्या डब्यानुसार सामानाचे वजन वेगळे ठरवण्यात आले आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ४० किलो वजनाच्या सामानासह प्रवासी स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकतो.

५० किलो २ टायर एसीसाठी

२ टायरसाठी ५० किलो वजन मर्यादा ठरविण्यात आली आहे. विहित मर्यादेपेक्षा जास्त मर्यादेच्या सामानाची वाहतूक करणाऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

७० किलो फर्स्ट क्लास एसीसाठी

ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवासी ४० ते ७० किलो सामान घेऊन जाऊ शकतो. फर्स्ट क्लास एसीबद्दल बोलायचे झाले तर त्यात ७० किलोपर्यंत सामान नेण्याची सूट आहे.

रेल्वेने प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे अतिरिक्त सामान घेऊन ट्रेनने प्रवास करू नका. जर तुमच्याकडे जास्त सामान असेल तर पार्सल ऑफिसमध्ये जाऊन सामान बुक करा.

- एक कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे