शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

सुसंवाद असल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:50 IST

धकाधकीच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावात असतो. अशावेळी सुसंवाद असल्यास त्यातून सकारात्मक उर्जा मिळते. चांगले आणि गोड बोलण्यातून आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबातही पोषक वातावरण निर्मिती होते, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देएलसीबीचे रवींद्र मानकर म्हणतात

भंडारा : धकाधकीच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावात असतो. अशावेळी सुसंवाद असल्यास त्यातून सकारात्मक उर्जा मिळते. चांगले आणि गोड बोलण्यातून आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबातही पोषक वातावरण निर्मिती होते, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी सांगितले.प्रत्येकाच्या मागे कामाचा व्याप असतो. या कामाच्या ओझ्यामुळे साहाजिकच चिडचीड निर्माण होते. त्यातून विविध समस्या निर्माण होऊ शकतात. यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने चांगले आणि गोड बोलणे आवश्यक आहे. दिवसभरात आपल्याला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाशी सहानुभूतीपूर्वक व्यवहार करून त्याच्याशी गोड बोलले आणि त्याच्या तक्रारीचे निरसन केले तर सुसंवाद निर्माण होऊ शकतो. तसेच या वृत्तीने झटपट कामही निकाली काढण्यास मदत होते. काम करताना कोणताही ताण तणाव राहत नाही. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने ही कला आत्मसात करून तणावमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. इतरांशी प्रेमाने बोलून सुसंवाद साधल्यास आपल्या कार्यालयातच नव्हे तर समाजातही पोषक वातावरणाची निर्मिती होते. शिवाय गोड बोलण्याचा सर्वाधिक फायदा आपल्या आरोग्याला होतो. यासाठी प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करण्याची गरज असल्याचे रवींद्र मानकर यांनी सांगितले.पैसा संपत्तीच्या मोहात मनुष्य आपली सामाजिक बांधीलकी विसरत चालला आहे. त्यातूनच गुन्हेगारी वाढत आहे. या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सुसंवाद साधणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर म्हणाले.