शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चांगले काम केले तर त्याची नोंद होतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:38 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. पदक प्राप्त होण्यामागील त्यांच्या कामाचा ...

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. पदक प्राप्त होण्यामागील त्यांच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. वसंत उत्तमराव जाधव १ ऑक्टोबर २००२ रोजी महाराष्ट्र पोलीस दलात रूजू झाले. नांदेड येथे २००४ पर्यंत ते प्रोबेशनरी डीवायएसपी होते. त्यानंतर त्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून २००५ मध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे नियुक्ती झाली. या काळात त्यांनी बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात बांगलादेशी व्यक्तींना हुडकून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये अपर पोलीस अधीक्षक असताना त्यांनी रासायनिक पदार्थांपासून दूध तयार करणारी टोळी हुडकून काढली. या कामगिरीबद्दल त्यांना यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कारही मिळाला आहे.

कोल्हापूर ते मुंबई नीती ट्रॅव्हल्समध्ये गोळीबार करून दरोडा टाकण्यात आला होता. या आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास लावून आरोपींना कारागृहात डांबले. बाभळी धरण प्रकरण त्यांनी योग्यरीत्या हाताळले. भंडारा येथे अपर पोलीस अधीक्षक असताना त्यांनी मुरमाडी येथील तीन बालिकांच्या मृत्यूचे प्रकरण योग्यरीत्या हाताळले. एवढेच नाही तर २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे असताना सुरेश पुजारी टोळीचा बीमोड करीत त्यांच्यावर मोक्का लावला. याच काळात तेथे स्टेट बँकेत दरोडा पडला होता. त्याचाही छडा लावण्यात यश आले. या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपतींनी २६ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक जाधव यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित केले आहे.

बॉक्स

माझ्या कक्षासमोर कुणी ताटकळत नाही

भंडारा जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख म्हणून आपण सूत्रे हाती घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत विश्वासाचे वातावरण निर्माण केले. आपल्याला भेटायला येणाऱ्यांसाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. कधीही कुणीही भेटू शकतो. एवढेच नाही तर कुणालाही कक्षासमोर ताटकळत राहावे लागत नाही. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न असतो, असे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.

बॉक्स

कर्मचाऱ्यांची प्रकरणे निकाली काढली

पोलीस दलातील अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित होती. आपण रूजू होताच ही प्रकरणे प्राधान्याने निकाली काढली, असे पोलीस अधीक्षक जाधव यांनी सांगितले. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या तत्काळ सोडविण्याचा आपला प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले.