शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

चांगले काम केले तर त्याची नोंद होतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:38 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. पदक प्राप्त होण्यामागील त्यांच्या कामाचा ...

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. पदक प्राप्त होण्यामागील त्यांच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. वसंत उत्तमराव जाधव १ ऑक्टोबर २००२ रोजी महाराष्ट्र पोलीस दलात रूजू झाले. नांदेड येथे २००४ पर्यंत ते प्रोबेशनरी डीवायएसपी होते. त्यानंतर त्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून २००५ मध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे नियुक्ती झाली. या काळात त्यांनी बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात बांगलादेशी व्यक्तींना हुडकून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये अपर पोलीस अधीक्षक असताना त्यांनी रासायनिक पदार्थांपासून दूध तयार करणारी टोळी हुडकून काढली. या कामगिरीबद्दल त्यांना यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कारही मिळाला आहे.

कोल्हापूर ते मुंबई नीती ट्रॅव्हल्समध्ये गोळीबार करून दरोडा टाकण्यात आला होता. या आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास लावून आरोपींना कारागृहात डांबले. बाभळी धरण प्रकरण त्यांनी योग्यरीत्या हाताळले. भंडारा येथे अपर पोलीस अधीक्षक असताना त्यांनी मुरमाडी येथील तीन बालिकांच्या मृत्यूचे प्रकरण योग्यरीत्या हाताळले. एवढेच नाही तर २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे असताना सुरेश पुजारी टोळीचा बीमोड करीत त्यांच्यावर मोक्का लावला. याच काळात तेथे स्टेट बँकेत दरोडा पडला होता. त्याचाही छडा लावण्यात यश आले. या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपतींनी २६ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक जाधव यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित केले आहे.

बॉक्स

माझ्या कक्षासमोर कुणी ताटकळत नाही

भंडारा जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख म्हणून आपण सूत्रे हाती घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत विश्वासाचे वातावरण निर्माण केले. आपल्याला भेटायला येणाऱ्यांसाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. कधीही कुणीही भेटू शकतो. एवढेच नाही तर कुणालाही कक्षासमोर ताटकळत राहावे लागत नाही. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न असतो, असे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.

बॉक्स

कर्मचाऱ्यांची प्रकरणे निकाली काढली

पोलीस दलातील अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित होती. आपण रूजू होताच ही प्रकरणे प्राधान्याने निकाली काढली, असे पोलीस अधीक्षक जाधव यांनी सांगितले. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या तत्काळ सोडविण्याचा आपला प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले.