शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

चांगले काम केले तर त्याची नोंद होतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:38 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. पदक प्राप्त होण्यामागील त्यांच्या कामाचा ...

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. पदक प्राप्त होण्यामागील त्यांच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. वसंत उत्तमराव जाधव १ ऑक्टोबर २००२ रोजी महाराष्ट्र पोलीस दलात रूजू झाले. नांदेड येथे २००४ पर्यंत ते प्रोबेशनरी डीवायएसपी होते. त्यानंतर त्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून २००५ मध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे नियुक्ती झाली. या काळात त्यांनी बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात बांगलादेशी व्यक्तींना हुडकून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये अपर पोलीस अधीक्षक असताना त्यांनी रासायनिक पदार्थांपासून दूध तयार करणारी टोळी हुडकून काढली. या कामगिरीबद्दल त्यांना यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कारही मिळाला आहे.

कोल्हापूर ते मुंबई नीती ट्रॅव्हल्समध्ये गोळीबार करून दरोडा टाकण्यात आला होता. या आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास लावून आरोपींना कारागृहात डांबले. बाभळी धरण प्रकरण त्यांनी योग्यरीत्या हाताळले. भंडारा येथे अपर पोलीस अधीक्षक असताना त्यांनी मुरमाडी येथील तीन बालिकांच्या मृत्यूचे प्रकरण योग्यरीत्या हाताळले. एवढेच नाही तर २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे असताना सुरेश पुजारी टोळीचा बीमोड करीत त्यांच्यावर मोक्का लावला. याच काळात तेथे स्टेट बँकेत दरोडा पडला होता. त्याचाही छडा लावण्यात यश आले. या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपतींनी २६ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक जाधव यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित केले आहे.

बॉक्स

माझ्या कक्षासमोर कुणी ताटकळत नाही

भंडारा जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख म्हणून आपण सूत्रे हाती घेतली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत विश्वासाचे वातावरण निर्माण केले. आपल्याला भेटायला येणाऱ्यांसाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. कधीही कुणीही भेटू शकतो. एवढेच नाही तर कुणालाही कक्षासमोर ताटकळत राहावे लागत नाही. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न असतो, असे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.

बॉक्स

कर्मचाऱ्यांची प्रकरणे निकाली काढली

पोलीस दलातील अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित होती. आपण रूजू होताच ही प्रकरणे प्राधान्याने निकाली काढली, असे पोलीस अधीक्षक जाधव यांनी सांगितले. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या तत्काळ सोडविण्याचा आपला प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले.