शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

उत्पादनात दोष असल्यास ग्राहक मंचकडे धाव घ्या

By admin | Updated: December 24, 2014 22:55 IST

वस्तू अथवा सेवेत गुणदोष किंवा उत्पादन दोष असल्यास ग्राहकांनी जागरूक राहून ग्राहक मंचाकडे दावा दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले.

भंडारा : वस्तू अथवा सेवेत गुणदोष किंवा उत्पादन दोष असल्यास ग्राहकांनी जागरूक राहून ग्राहक मंचाकडे दावा दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने पोलीस कल्याण बहुउद्देशिय सभागृह येथे आज आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होत्या. उद्घाटन जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्षा गीता बडवाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक संघटनेचे वैद्यकीय प्रतिनिधी डॉ.नितीन तुरस्कर, सदस्य छाया कावळे, प्रेमराज मोहोकार, डॉ.कुकडे, राजकुमार बालपांडे, कडव, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ.खोडे म्हणाल्या, अनेकदा ग्राहकांची फसवणूक होऊन सुद्धा ते ग्राहक संरक्षण कायद्याबाबत अज्ञानामुळे ग्राहक मंचाकडे दावा दाखल करीत नाहीत. म्हणून ग्राहकांनी या कायद्याबाबत माहिती करून घ्यावी. दाव्याबाबत राज्यात टोल फ्री क्र. १८००२२२२६२ ही हेल्प लाईन सुरु करण्यात आली आहे. या सेवेद्वारे ग्राहकांना मोफत सल्ला उपलब्ध करून देण्यात येतो. या सुविधांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी गीता बडवाईक म्हणाल्या, ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकोपयोगी हित जोपासण्यासाठी आहे. त्यात त्यांच्या हिताबाबत तरतूदी नमूद आहे. ग्राहक मंचात काम करताना वेगवेगळ्या बाबींवर दावे दाखल करण्यात येतात. त्यांची तपासणी करून त्यावर निर्णय देण्यासाठी तक्रारकर्त्यांनी विस्तृत माहिती देणे आवश्यक असते. त्यात त्रुट्या असल्यास तज्ज्ञांशी विचार विमर्श करून कायद्यामधील तरतूदीनुसार निर्णय द्यावा लागतो. त्यामुळे कधी कधी निर्णय देण्यास वेळ लागतो. तसेच रिक्त पदांमुळे कामाचा व्याप वाढून आदेश पारित करण्यास विलंब लागत असतो. ग्राहक मंचात जिल्हास्तरावर २० हजार रुपयापर्यंतचे दावे दाखल करता येतात, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविकात अनिल बन्सोड यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत माहिती व मार्गदर्शन करताना सुसंवाद, संघटन व संयम हा या कायद्याचा महत्वाचा हिस्सा आहे. तसेच ग्राहक संरक्षण परिषदांच्या सदस्यांनी या बाबत ग्रामीण स्तरावर जनजागृती करणे आवश्यक आहे. तेव्हाच सामान्य ग्राहकांचे हित जोपासले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी शाहीर कार्तिक मेश्राम यांनी जागो ग्राहक जागो या विषयावर कलापथक सादर करून उपस्थितांना या कायद्याबाबत माहिती करून दिली. छाया कावळे यांनी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे या कायद्याविषयी तसेच ग्राहक चळवळीच्या इतिहासाबाबत माहिती दिली. यावेळी डॉ.नितीन तुरस्कर यांचे मार्गदर्शन केले. ग्राहक दिनानिमित्त वीज वितरण कंपनी, वजन व मापे कार्यालय, नगरपरिषद, आरोग्य विभाग, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गॅस वितरण कंपनी, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांनी प्रदर्शनी लावल्या होत्या. मान्यवरांनी प्रदर्शनीची पाहणी केली. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)