शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास दुसरा कसा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:23 IST

भंडारा : जिल्ह्यात २१ जूनपासून पुन्हा जोमाने लसीकरणाला प्रारंभ झाला. मात्र जानेवारी महिन्यात व त्यानंतर पहिली लस घेतलेल्या काहींना ...

भंडारा : जिल्ह्यात २१ जूनपासून पुन्हा जोमाने लसीकरणाला प्रारंभ झाला. मात्र जानेवारी महिन्यात व त्यानंतर पहिली लस घेतलेल्या काहींना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळाले नाही. परिणामी दुसरा डोस घेणार कसा, असा तांत्रिक प्रश्न उपस्थित होत आहे. ही समस्या काहींबाबत असली तरी त्यांचा वेळ नाहक वाया जात आहे. याकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लक्ष १० हजार ६०४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात ३ लक्ष ५,५६८ नागरिकांनी पहिला डोस तर दुसरा डोस १ लक्ष ५,०३६ नागरिकांनी घेतली आहे. जिल्ह्यातील १४२ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. मंगळवारी म्हणजेच २९ जून रोजी दुपारी ४ वाजतापर्यंत १० हजार १३५ जणांचे लसीकरण झाले होते. मात्र यापूर्वी ज्यांनी पहिलीच घेतली त्यापैकी काहींना प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले नाही तर दुसरे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्नही अशा व्यक्तींसमोर निर्माण होत आहे. या संदर्भात मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. नंबरची लिंकिंग वेळेवर न झाल्याने किंवा ऑनलाईन माध्यमात लसीकरण ‘ॲप्रव्हूड’ न झाल्यामुळे प्रमाणपत्र तयार होत नाही. बहुदा मोबाईल नंबर योग्य किंवा चुकीचा असल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

मोबाईल नंबर कोणाचा हेच आठवत नाही

लसीकरण करताना मी स्वतःचा की अन्य दुसऱ्याचा मोबाईल नंबर दिला होता, हेच मला नीट आठवत नाही. त्यामुळे माझे प्रमाणपत्र आले नसावे, असे मला वाटत आहे. मोबाईल नंबरच आठवत नाही.

बॉक्स

लसीकरणावेळी ही घ्या काळजी

जिल्ह्यात १४२ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. लसीकरणप्रसंगी आधार नंबर तथा मोबाईल क्रमांक योग्यप्रमाणे द्यावा जेणेकरून प्रमाणपत्र तयार होताना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. तांत्रिक अडचण उद्भवल्यास तिथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांशी विचारपूस करून घ्यावी, कुठेही बाधा उत्पन्न झाल्यास त्याचे केंद्रावरच निराकरण करण्यात येत असते. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उइके म्हणाले, अशी जर तांत्रिक समस्या उद्भवत असेल तर त्यांना त्याच वेळी योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. त्यांना पुढे लसीकरणाबाबत समस्या येणार नाहीत.