शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमार संस्थेची लीज माफ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:44 IST

मत्स्य व्यवसाय करणारा ढिवर, कहार समाज हा झोपडीत जन्माला येतो आणि झोपडीतच मरण पावतो. स्वातंत्र्याला साठ वर्षापेक्षा जास्त वर्ष लोटले तरी आजही हा समाज अशिक्षितपणामुळे पारंपारिक मासेमारीच्या व्यवसाय करून जीवन जगत आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : १६० मच्छिमार संघटनांचे १८.३० लाखांची लीज धनादेशाद्वारे केली परत, साकोली येथे धनादेश वितरण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : मत्स्य व्यवसाय करणारा ढिवर, कहार समाज हा झोपडीत जन्माला येतो आणि झोपडीतच मरण पावतो. स्वातंत्र्याला साठ वर्षापेक्षा जास्त वर्ष लोटले तरी आजही हा समाज अशिक्षितपणामुळे पारंपारिक मासेमारीच्या व्यवसाय करून जीवन जगत आहे. मात्र भाजप सरकारचे या समाजाकडे दुर्लक्ष असल्यामुळे तलावांच्या लीजमध्ये दिवसेंदिवस सात ते आठ पटीने वाढ होत आहे. शासनातर्फे ही लीज माफ झाली पाहिजे मात्र शासन याकडे दुर्लक्ष करते. मात्र येत्या काळात मच्छीमार संस्थेची लीज कायमस्वरूप्ी माफ करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीचे उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय व तलाव बचाव संघर्ष समिती भंडारा- गोंदिया व जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने मंगलमुर्ती सभागृह साकोली येथे धनादेश वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर खासदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, संचालक प्रशांत पवार, जिल्हा परीषद सभापती रेखा वासनिक, सभापती प्रेमदास वनवे, जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होमराज कापगते, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, मंदा गणवीर, मदन रामटेके, प्रा. संजय केवट, चुन्नीलाल वासनिक उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, मागील वर्षी पाऊस अत्यल्प प्रमाणात आला. त्यामुळे तलावात पाणीच साचले नाही. यावर्षीही समाधानकारक पाऊस आला नाही. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात जमा झालेले पाणी दिवाळीपूर्वीच अर्ध्यापेक्षा कमी होते. त्यामुळे मासेमार बांधवांवर उपासमारीची वेळ येत आहे. कारण लीज ही पाण्याची दिली जाते. रिकाम्या तलावाची नाही. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषद भंडारातर्फे काही निर्णय घेतला की मागील वर्षी ज्या मच्छिमार संस्थाकडून शासनाने जी लीज घेतली होती ती लीज यावर्षी न घेता मागील वर्षाची संपूर्ण लीजची रक्कम त्या संस्थांना परत करायची हा निर्णय झाला.या कार्यक्रमाप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर, मोहाडी, भंडारा व पौनी तालुक्यातील एकूण १६० मच्छीमार संघटनांचे १८ लाख ३० हजार रूपयेची लीज धनादेशाद्वारे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परत करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव वलथरे यांनी केले. कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातील मासेमार समाजबांधव उपस्थित होते.