शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मने बदलली.. अन् मतेही..!

By admin | Updated: May 19, 2014 23:18 IST

केंद्रातील संपुआ सरकारने राबविलेल्या विविध योजना कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही संपुआ सरकारच्या काळात झालेले घोटाळे, वाढलेली महागाई,

कार्यकर्त्यांची निवडणूक : आघाडीसाठी धोक्याची घंटा, नेत्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ

भंडारा : केंद्रातील संपुआ सरकारने राबविलेल्या विविध योजना कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही संपुआ सरकारच्या काळात झालेले घोटाळे, वाढलेली महागाई, भ्रष्टाचाराचा झालेला कहर यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. हा असंतोष संघटीत करण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चोखपणे बजावण्यात आले. आक्रमक प्रचार अन् मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार या दोन मुद्यांवर संपूर्ण देश ढवळून निघाला आणि वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशा स्वरूपात ईव्हीएममधून मते बाहेर पडली. ‘रोम वॉज नॉट ब्युल्ट इन अ डे’ या म्हणीप्रमाणे ही सारी किमया एका दिवसात झाली नाही. लोकांची मने हळूहळू बदली व या बदललेल्या मनांवर जात-पात, धर्म, विचारधारा यासोबतच कुठल्याही स्थानिक मुद्यांचा प्रभाव पडला नाही. मते बदलली, मते बनली, मते ठाम राहिली व चमत्कार घडला याला भंडारा लोकसभा मतदारसंघ अपवाद राहिलेला नाही. भंडारा लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपचे नाना पटोले यांनी मिळविलेला लाखांहून अधिक मताधिक्याचा विजय हा केवळ अशा बदललेल्या मनांचा परिणाम आहे. ही मने फक्त नाना पटोलेंसाठी निश्चितच बदलली नाहीत तर मोदींसाठी झालेले हे मन परिवर्तन आहे, हे आता सर्वच मान्य करीत आहेत. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांच्यासारखा मातब्बर नेता रिंगणात होता, मोदींच्या विरोधात असलेले मुस्लिम व दलित मतांची मोट बांधून फायदा उचलण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता, तो मोदी लाटेपुढे सपेशल फेल ठरला. प्रतिष्ठा पणाला लावूनही ‘घडी’ नीट बसली नाही, कारण लाटच मोठी होती. नानासाठी कुणबी समाजात एकजूट झाली, परंतु मिळालेले मताधिक्य हे केवळ कुणबी एकजुटीचे नाही, हे ही ुनिकालावरुन मान्यच करावे लागेल. या निवडणुकीत ‘मोदी’ लाट होती, हे निकालच सांगतात, मात्र या लाटेमागील कार्यकारणभाव लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकांना आता गृहीत धरता येणार नाही. आज ते तुमच्या सोबत असले तरी ईव्हीएमपर्यंत त्यांचे मते बदलू शकतात, हे विसरता येणार नाही. लोक बोलत नाहीत करून दाखवितात याचे प्रत्यंतर या निमित्ताने समोर आले आहे. निवडणुकीत मोठी हवा निर्माण करण्याचा आव आणलेल्या ‘आप’ला मतदारांनी सपेशल नाकारले आहे. भंडार्‍यात ‘आप’ मिडीयावर गाजले. परंतु ते ‘सोशल’ झाले नाहीत. लोकांना आता सत्य समजते, उमजते व ते प्रगटही होते, हे निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभेत आता ‘पब्लिक फर्स्ट’ हेच लक्षात ठेवणे आवश्यक आहे, यात शंका नाही. हा निकाल म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना ‘ठेच’ आहे. आता ती लागली. फक्त पुढे शहाणा कोण होतो, यावरच सारे काही अवलंबून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)