शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

मांगलीत शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

By admin | Updated: December 6, 2015 00:32 IST

तालुक्यातील मांगली (बांध) व परिसरातील २१ गावातील पिडीत शेतकऱ्यांच्या सहकार्याने गावातील सरपंच, उपसरपंच, प्रगत शेतकरी ...

२१ गावांतील सरपंचाचा पुढाकार : दुष्काळ घोषित करून कर्जमाफीची मागणीलाखनी : तालुक्यातील मांगली (बांध) व परिसरातील २१ गावातील पिडीत शेतकऱ्यांच्या सहकार्याने गावातील सरपंच, उपसरपंच, प्रगत शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या नेतृत्वात आजपासून १० शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रारंभ केला आहे.उपोषण मंडपाला जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, पं.स. उपसभापती विजय कापसे, सुनिल गिऱ्हेपुंजे, पं.स. सदस्य खुशाल गिदमारे यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला आहे. मांगली (बांध) परिसरातील किटाडी, मांगली, केसलवाडा, मचारणा, न्याहारवाणी, गुरढा, ढिवरखेडा, मेंगापूर, खैरी, पहाडी, खराशी, रेंगोडा, कनेरी, गोंडेगाव, निमगाव, देवरी, जेवनाळा, कवडशी, हमेशा, मुरमाडी अशा २१ गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील धानपिकांवर अनेक रोगांनी व किडीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण धानपिक नष्ट होऊन उत्पन्न मिळाले नाही. परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राष्ट्रीय बँक, सोसायटी व खासगी सावकारांकडून घेतलेले कर्जफेड करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपोषणकर्त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून मागण्या समोर ठेवल्या आहे. यात आणेवारी जाहीर करावी, पाच एकरच्या वरील शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करावे, परिसरात दुष्काळ जाहीर करावा, रोहयो कामे त्वरीत सुरु करावे, सन २०१३-१४ च्या ओल्या दुष्काळाची थकबाकी अनुदान त्वरीत द्यावा अशा मागण्यांचा समावेश आहे. निवेदन प्रगत शेतकरी मोहन खोब्रागडे यांच्या नेतृत्वात बाबूराव ठवकर, ज्ञानेश्वर मोहतुरे, घनश्याम धरमसारे, भाऊराव फटे, प्रमिला मडावी, पुरुषोत्तम सेलोकर, पुरणदास बडोले, भोजराम राऊत, मोहन झलके अशा १० शेतकऱ्यांनी सरपंच जितेंद्र बोरकर, नरेश गरपडे, गिरीधारी भांडारकर, जतमाला राघोर्ते, प्रशांत मासूरकर, बारसराव गरपडे, दिपक राहटे, प्रमोद राहटे, पुरुषोत्तम पुस्तोडे यांनी उपोषणात सहभाग दिला. (तालुका प्रतिनिधी)