शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

शिक्षण सेवकांवर उपासमारीचे संकट

By admin | Updated: December 1, 2014 22:49 IST

राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शासनाने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांच्या सेवा संपुष्टात आणल्या.

भंडारा : राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शासनाने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांच्या सेवा संपुष्टात आणल्या. यामुळे ते आर्थिक विवंचनेत सापडले असुन आता जीवन जगायचे कसे असा गंभीर प्रश्न बेरोजगार झालेल्या शिक्षण सेवकांसमोर आवासुन उभा ठाकला आहे. नविन सरकारने शिक्षण सेवकांच्या सेवा नियमित करुन शिक्षण सेवकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सेवामुक्त शिक्षण सेवकांनी केली आहे.पुरोगामी विचार सरणीच्या महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सरकारच्या सत्ताधाऱ्यांनी सन २००० मध्ये राज्यात आर्थिक नादारीचे कारण समोर करुन शिक्षण सेवक योजना अंमलात आणली. त्यानुसार शासकिय व खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानीत शाळांमधील रिक्त पदे भरतांना सहाय्यक शिक्षक ऐवजी शिक्षण सेवक असे पदाचे नविन नामाभिधान करण्यात आले व रिक्त पदांवर नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना अतिशय अल्प मानधन अदा करण्यात येत होते. तरिपण सेवेत कायम होवू या आशेने शिक्षण सेवक आपले ज्ञानदानाचे कार्य विश्वासपूर्वक विहित कालावधीत पार पाडत होते. परंतू पाणी कुठे मुरले कोणास ठाऊक, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी सेवकांच्या सेवा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेवून तसे आदेश निर्गमित केल्याने राज्यातील शिक्षण सेवकांच्या सेवा संपुष्टात आणल्यामुळे आर्थिक विंवचनेमुळे सेवामुक्त झालेल्या शिक्षण सेवकांचे भावी स्वप्न दुभंगले आहे. शिक्षन सेवक बेरोजगार झाल्याने त्यांचेवर हातावर आूणन पानावर खाण्याची वेळ आली आहे. सत्ताधाऱ्याच्या मनमानी मारक धोरणाचा शिक्षण सेवकांच्या जीवनमानावर जबरदस्त फटका बसला असून विपरीत परिणाम होत आहे. सत्ताधाऱ्याच्या दुर्लक्षामुळे शिक्षण सेवकांचे जीवन उध्वस्त झाले असून आता पुढील जीवन जगायचे कसे असा पोटतिकडीचा प्रश्न शेकडो शिक्षण सेवकांसमोर आवासुन उभा ठाकला आहे. (शहर प्रतिनिधी)