शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

एलोरा पेपर मिलच्या दोनशे कामगारांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST

तुमसर: एलोरा पेपर मिल कारखान्यातील सुमारे २०० स्थायी व अस्थायी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर येण्यास कारखाना प्रबंधकाने ...

तुमसर: एलोरा पेपर मिल कारखान्यातील सुमारे २०० स्थायी व अस्थायी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर येण्यास कारखाना प्रबंधकाने मनाई केली. दुसरीकडे कारखान्यात बाहेरील कंत्राटी कामगारांना बोलावून कामे सुरू आहेत. येथे शासनाची परवानगी न घेता कारखान्यातून साहित्य बाहेर नेणे सुरू असून कारखान्यातील यंत्र काढून नेणे सुरू आहे. याची चौकशी करून कामगारांना न्याय मिळावा याकरिता कामगारांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले.

एलोरा पेपर मिल हा मागील ४५ वर्षांपासून कारखाना सुरू असून आंतरराष्ट्रीय दर्जाचा कागद येथे तयार होते. या कारखान्यात सुमारे २०० कामगार स्थायी व अस्थायी कार्यरत आहेत परंतु येथील कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कामावर येण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांच्या उपासमारीचे संकट ओढावले आहे. कारखान्यात नियमित कायमस्वरूपी काम करणाऱ्या कामगारांना अचानक कामावरून बंद करणे काम कारखाना बंद पडण्याची पूर्वसूचना शासनाने देणे कारखाना बंद पडण्याची पूर्वपरवानगी न घेणे व कारखाना औद्योगिक अधिनियम १९४७ च्या कलम २२(२) नियमांचेही उल्लंघन ठरणारे आहे, असा आरोप राष्ट्रीय मजदूर मंचने लावला आहे. कारखाना व्यवस्थापनाने कारखाना बंद करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे परंतु कारखाना व्यवस्थापकांनी औद्योगिक नियमांचे पालन केले नाही. हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ९ ऑगस्टपासून राष्ट्रीय मजदूर मंचच्या नेतृत्वात कामगारांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले. कामगारांनी सर्व कामगारांचे थकीत वेतन व चालू वेतन देणे, ११ कामगारांचे दिनांक १८ जुलै २०२१ चे टरमिशन पत्र परत घेणे, कारखाना पूर्व सुरू करणे, कारखान्यातील मशीन तोडफोड न करता कायमस्वरूपी कामगारांना कामावर घेणे आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.

कंपनी व्यवस्थापन येथे शासनाची परवानगी न घेता कारखान्यातून साहित्य बाहेर काढून स्थायी व अस्थायी कामगारांना डावलून बाहेरील कंत्राटी कामगारांना बोलावून कामे करत आहे. कारखान्यातील यंत्र काढून त्यांची तोडफोड करणे याठिकाणी सुरू आहे. कंपनी व्यवस्थापनाने २२ जुलै २०२१ ला कामगारांना येथे तोंडी सूचना देऊन स्थायी व अस्थायी कामगारांना दिनांक २३ जुलैपासून कारखाना बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे कामगारांनी कामावर येऊ नये, असे सांगण्यात आले. कामगार प्रतिनिधी व नोंदणीकृत कामगार संघटनेला कोणतीही नोटीस न देता व शासनाची पूर्वपरवानगी न घेता कारखान्याचे कामकाज बंद करण्यात आले आहे. हे औद्योगिक नियमाच्या विरोधात आहे. कामगारांचे वर्ष २०१८, २०१९,२०२० व २०२१ या वर्षाचे वेतन थकीत आहे येथील कारखाना प्रबंधक जबरदस्तीने कामगारांचे राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. असा आरोप राष्ट्रीय मजदूर मंचाने लावला आहे.संघटनेचे प्रतिनिधी व व्यवस्थापक यांच्यात झालेल्या चर्चेत कामगारांची कोणतीही बाजू ऐकून घेण्याच्या तयारीत नाही. कामगारांत असंतोष आहे. धरणे आंदोलनस्थळी माजी आ. चरण वाघमारे यांनी भेट देऊन कामगारांशी चर्चा केली.

बॉक्स

कारखान्याकडे ११४ एकर जमीन

एलोरा पेपर मिल मोहाडी तालुक्यातील देवापुर येथे असून १९७६ पासून हा कारखाना मागील ४५ वर्षांपासून सुरू आहे. शासनाकडून या कारखान्याला सुमारे शंभर एकर जमीन भाडेतत्त्वावर देण्यात आल्याची माहिती आहे. हा कारखाना नियमांनुसार विक्री करता येत नाही. कारखाना विक्री करण्याकरता शासनाची नक्कीच पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. सुमारे २०० कामगार येथे स्थायी व अस्थायी असून त्यांचे वेतन व इतर देणी आवश्यक आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.