शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
5
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
6
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
7
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
8
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
9
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
10
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
11
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
12
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
13
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
14
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
15
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
16
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
17
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
18
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
19
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

विज्ञानाच्या साह्याने मानवाने साधली प्रगती

By admin | Updated: February 2, 2017 00:18 IST

मानवापासून कितीतरी दूरवर असलेले ग्रहगोल मानवाचे आयुष्य नियंत्रित करीत नाहीत.

संतोष टकले : विश्वाचे अंतरंग व मानवी प्रगती विषयावर व्याख्यानभंडारा : मानवापासून कितीतरी दूरवर असलेले ग्रहगोल मानवाचे आयुष्य नियंत्रित करीत नाहीत. मानवाने बुध्दी आणि विज्ञानाच्या सहाय्याने स्वत:ची प्रगती करुन दूरवरचा पल्ला गाठला असल्याचे प्रतिपादन भाभा संशोधन केंद्राचे अणुशास्त्रज्ञ डॉ. संतोष टकले यांनी केले. ते भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह भंडारा येथे विश्वाचे अंतरंग व मानवी प्रगती या विषयावर भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र मुंबईचे अणुशास्त्रज्ञ डॉ. संतोष टकले यांच्या स्लाईड शो व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक रंजना वैद्य या होत्या. याप्रसंगी सूर्यमाला, पृथ्वीची उत्पत्ती या विषयीची माहिती स्लाईड शोद्वारा सांगताना डॉ. टकले पुढे म्हणाले, विश्वाची उत्पत्ती १३.८ अब्ज वर्षापुर्वी झाली आहे. तर २५ लाख वर्षापुर्वी मानवाची पृथ्वीवर उत्पत्ती झाली. मानवाने कार्यकारणभावाच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती केली. विज्ञानाच्या नवनवीन शोध संशोधनाच्या माध्यमाने मनुष्य आज जगावर अधिराज्य गाजवित आहे. मात्र भारतात आजही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार झालेला नाही. भारतीयांनी विज्ञानाची सृष्टी तेवढी घेतली पण दृष्टी घेतली नाही. आजही जाती धर्माच्या कर्मकांडात येथील पिढी अडकली आहे. गॅलिलीओ यांनी ४०० वर्षापूर्वी सूर्यकेंद्री सिध्दांत मांडला होता पण त्याला धर्मसत्तेने पाखंडी ठरवून अंधार कोठडीत डांबले. आयुष्याच्या शवेटी तो आंधळा झाला होता. कालांतराने जगाला सूर्यकेंद्री सिध्दांत मान्य करावा लागला.याप्रसंगी डॉ. टकले यांनी विद्यार्थ्यांच्या शंकाचे समाधान करुन विश्वनिर्मितीचे रहस्य सांगून आकाशगंगेचे दर्शन घडविले. या कार्यक्रमाचे संचालन मअंनिसचे प्रा. नरेश आंबिलकर यांनी केले. आभार छाया कावळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सतीश घोरपडे, अनंत कावळे, डॉ. आंबेडकर वसतीगृहाचे कर्मचारी व विद्यार्थीनींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)