शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांच्या रबी पिकांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST

शेतकऱ्यांच्याच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही. खरीप व रबी हंगामातील शेतपिक अस्मानी व सुल्तानी संकटाने धोक्यात आले. ...

शेतकऱ्यांच्याच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही. खरीप व रबी हंगामातील शेतपिक अस्मानी व सुल्तानी संकटाने धोक्यात आले. तर उरल्यासुरल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारून फस्त करीत आहे. अशा संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त झाले आहेत. तब्बल शेकडो एकरातील पीक नष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांनी लावलेले पीक वन्यप्राण्यांकडून फस्त केल्या जात आहे. ते जनावरांसाठी लावलेला चारा, गहू, हरभरा, वाटाणा, भाजीपाला व रबीमध्ये उन्हाळी धानाची टाकलेले पऱ्हे वन्यप्राणी डुक्कर, सांबर, हरीण, नीलगाय या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहेत. तर दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष व शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्हे पुढे येत आहेत.

शेतकरी आपल्या शेतामध्ये रात्रंदिवस राबून शेतीतून उत्पन्न काढून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रात्रंदिवस झटत असतो. परंतु रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांकडून शेती पिकांचे होणारे नुकसान हे भयावह आहे. अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांनी अक्षरश: शेतामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. वन कायद्यामुळे शिकार करणाऱ्यांना मोठी शिक्षा असल्यामुळे आज शेतकरी शिकार करीत नाही. त्यामुळे वन्य प्राणी सरळ जंगलातून शेतामध्ये येतात आणि रात्रभर चरून जंगलात परत जातात. रात्रीच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.

यासाठी कायद्यामध्ये तरतूद करून या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी व नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे. जर याकडे संबंधितांनी लक्ष दिले नाही, तर पुढे मानव-वन्यजीव संघर्ष व शेतकरी -अधिकाऱ्यांशी संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्ह याठिकाणी दिसत आहेत.