शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांच्या रबी पिकांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST

शेतकऱ्यांच्याच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही. खरीप व रबी हंगामातील शेतपिक अस्मानी व सुल्तानी संकटाने धोक्यात आले. ...

शेतकऱ्यांच्याच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही. खरीप व रबी हंगामातील शेतपिक अस्मानी व सुल्तानी संकटाने धोक्यात आले. तर उरल्यासुरल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारून फस्त करीत आहे. अशा संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त झाले आहेत. तब्बल शेकडो एकरातील पीक नष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांनी लावलेले पीक वन्यप्राण्यांकडून फस्त केल्या जात आहे. ते जनावरांसाठी लावलेला चारा, गहू, हरभरा, वाटाणा, भाजीपाला व रबीमध्ये उन्हाळी धानाची टाकलेले पऱ्हे वन्यप्राणी डुक्कर, सांबर, हरीण, नीलगाय या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहेत. तर दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष व शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्हे पुढे येत आहेत.

शेतकरी आपल्या शेतामध्ये रात्रंदिवस राबून शेतीतून उत्पन्न काढून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रात्रंदिवस झटत असतो. परंतु रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांकडून शेती पिकांचे होणारे नुकसान हे भयावह आहे. अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांनी अक्षरश: शेतामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. वन कायद्यामुळे शिकार करणाऱ्यांना मोठी शिक्षा असल्यामुळे आज शेतकरी शिकार करीत नाही. त्यामुळे वन्य प्राणी सरळ जंगलातून शेतामध्ये येतात आणि रात्रभर चरून जंगलात परत जातात. रात्रीच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.

यासाठी कायद्यामध्ये तरतूद करून या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी व नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे. जर याकडे संबंधितांनी लक्ष दिले नाही, तर पुढे मानव-वन्यजीव संघर्ष व शेतकरी -अधिकाऱ्यांशी संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्ह याठिकाणी दिसत आहेत.