शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांच्या रबी पिकांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST

शेतकऱ्यांच्याच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही. खरीप व रबी हंगामातील शेतपिक अस्मानी व सुल्तानी संकटाने धोक्यात आले. ...

शेतकऱ्यांच्याच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही. खरीप व रबी हंगामातील शेतपिक अस्मानी व सुल्तानी संकटाने धोक्यात आले. तर उरल्यासुरल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारून फस्त करीत आहे. अशा संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त झाले आहेत. तब्बल शेकडो एकरातील पीक नष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांनी लावलेले पीक वन्यप्राण्यांकडून फस्त केल्या जात आहे. ते जनावरांसाठी लावलेला चारा, गहू, हरभरा, वाटाणा, भाजीपाला व रबीमध्ये उन्हाळी धानाची टाकलेले पऱ्हे वन्यप्राणी डुक्कर, सांबर, हरीण, नीलगाय या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहेत. तर दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष व शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये संघर्ष होण्याची चिन्हे पुढे येत आहेत.

शेतकरी आपल्या शेतामध्ये रात्रंदिवस राबून शेतीतून उत्पन्न काढून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रात्रंदिवस झटत असतो. परंतु रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांकडून शेती पिकांचे होणारे नुकसान हे भयावह आहे. अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांनी अक्षरश: शेतामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. वन कायद्यामुळे शिकार करणाऱ्यांना मोठी शिक्षा असल्यामुळे आज शेतकरी शिकार करीत नाही. त्यामुळे वन्य प्राणी सरळ जंगलातून शेतामध्ये येतात आणि रात्रभर चरून जंगलात परत जातात. रात्रीच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.

यासाठी कायद्यामध्ये तरतूद करून या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी व नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे. जर याकडे संबंधितांनी लक्ष दिले नाही, तर पुढे मानव-वन्यजीव संघर्ष व शेतकरी -अधिकाऱ्यांशी संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्ह याठिकाणी दिसत आहेत.