शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
5
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
6
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
7
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
8
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
9
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
10
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
11
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
12
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
13
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
14
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
15
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
16
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
17
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
18
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
19
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
20
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."

घरकूल व शिधापत्रिकेसाठी वेगवेगळे नियम कसे?

By admin | Updated: June 7, 2014 23:46 IST

राज्य शासनाकडून बीपीएलधारक लाभार्थ्यांची योजनासाठी निवड करताना भेदभाव केला जात आहे. त्यामुळे नागरिकात अन्याय होत असल्याची भावना आहे. घरकुल लाभार्थ्यांची निवड करताना

करडी (पालोरा) : राज्य शासनाकडून बीपीएलधारक लाभार्थ्यांची योजनासाठी निवड करताना भेदभाव केला जात आहे. त्यामुळे नागरिकात अन्याय होत असल्याची भावना आहे. घरकुल लाभार्थ्यांची निवड करताना सन २00२ च्या बीपीएल यादीतील लाभार्थ्यांची निवड ग्राह्य मानली जाते. मात्र राशनकार्डसाठी १९९७ च्या बीपीएल यादीचाच विचार केला जातो. यासंबंधाने प्रशासन राज्य शासनाच्या धोरणाचा हवाला देत आहे.राज्यातील नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी, जीवनमान उंचावण्यासाठी शासन अनेक योजना राबविते. योजनाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन काम करते. कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचाव्या हा त्यामागचा हेतू असतो. योजना राबविताना ध्येयधोरण आखले जातात. सोबतच अटी, नियम लावले जातात. मात्र काही योजना राबविताना शासनाकडून भेदभाव केला जात आहे.अन्न, वस्त्र, निवारा यापासून कुणीही वंचित राहू नये याकरिता शासनाने बीपीएल कुटुंबाकरिता राशनकार्डवर अन्नधान्य वाटप योजना आखली. काळ व वेळ बदलली असताना शासनाचे जुनेच धोरण सुरू असल्याने  नागरिकात असंतोषाची भावना आहे. राशनकार्ड व अन्नधान्याच्या पुरवठय़ासाठी आजही सन १९७७ ची बीपीएल यादी व त्यातीलल नावे ग्राह्य मानली जात आहेत. सदर यादी तयार होऊन १७ वर्षाचा कालावधी लोटला आहे.  मध्यंतरीच्या काळात सन २00२ मध्ये नव्याने  बीपीएल यादी तयार झाली. सर्व योजनांसाठी लागू झाली. मात्र अन्न पुरवठा विभाग या यादीलाच मानायला तयार नाही ही अवस्था आहे. महसूल विभागाच्या मार्फत राबविल्या जाणार्‍या योजनांसाठी सन २00२ची यादी ग्राह्य मानली जात असेल तर मुक्त अन्नधान्यासाठीच अडचण का? शासनच भेदभाव करीत नाही का? घरकुलासाठी  सन २00२ ची यादी तर अन्नधान्यासाठी सन १९९७ ची यादी असा प्रकार होत असल्याने नागरिकात असंतोष आहे.शासन इतर योजनांसाठी सन २00२ ची बीपीएल यादी ग्राह्य धरायला सांगते. मात्र राशनकार्ड व अन्नधान्यासाठी सन १९९७ ची यादी ग्राह्य मानते. यासाठी प्रशासनाची चूक नाही. शासनाचे धोरण जबाबदार आहे. १२ वर्षानंतरही नागरिकांची अडचण होत असली तरी आमचा नाईलाज आहे, अशी माहिती मोहाडी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी लोकमतला दिली. सन २00२ ची यादी चुकीची असल्याचे शासन मानत असेल तर इतर योजनांसाठीही ती यादी लागू करु नये. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता सन २00२ ची यादी ग्राह्य मानण्याची गरज असल्याचे मत जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत इलमे, महादेव बुरडे यांनी व्यक्त केले.  (वार्ताहर)