शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

घरकूल व शिधापत्रिकेसाठी वेगवेगळे नियम कसे?

By admin | Updated: June 7, 2014 23:46 IST

राज्य शासनाकडून बीपीएलधारक लाभार्थ्यांची योजनासाठी निवड करताना भेदभाव केला जात आहे. त्यामुळे नागरिकात अन्याय होत असल्याची भावना आहे. घरकुल लाभार्थ्यांची निवड करताना

करडी (पालोरा) : राज्य शासनाकडून बीपीएलधारक लाभार्थ्यांची योजनासाठी निवड करताना भेदभाव केला जात आहे. त्यामुळे नागरिकात अन्याय होत असल्याची भावना आहे. घरकुल लाभार्थ्यांची निवड करताना सन २00२ च्या बीपीएल यादीतील लाभार्थ्यांची निवड ग्राह्य मानली जाते. मात्र राशनकार्डसाठी १९९७ च्या बीपीएल यादीचाच विचार केला जातो. यासंबंधाने प्रशासन राज्य शासनाच्या धोरणाचा हवाला देत आहे.राज्यातील नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी, जीवनमान उंचावण्यासाठी शासन अनेक योजना राबविते. योजनाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन काम करते. कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचाव्या हा त्यामागचा हेतू असतो. योजना राबविताना ध्येयधोरण आखले जातात. सोबतच अटी, नियम लावले जातात. मात्र काही योजना राबविताना शासनाकडून भेदभाव केला जात आहे.अन्न, वस्त्र, निवारा यापासून कुणीही वंचित राहू नये याकरिता शासनाने बीपीएल कुटुंबाकरिता राशनकार्डवर अन्नधान्य वाटप योजना आखली. काळ व वेळ बदलली असताना शासनाचे जुनेच धोरण सुरू असल्याने  नागरिकात असंतोषाची भावना आहे. राशनकार्ड व अन्नधान्याच्या पुरवठय़ासाठी आजही सन १९७७ ची बीपीएल यादी व त्यातीलल नावे ग्राह्य मानली जात आहेत. सदर यादी तयार होऊन १७ वर्षाचा कालावधी लोटला आहे.  मध्यंतरीच्या काळात सन २00२ मध्ये नव्याने  बीपीएल यादी तयार झाली. सर्व योजनांसाठी लागू झाली. मात्र अन्न पुरवठा विभाग या यादीलाच मानायला तयार नाही ही अवस्था आहे. महसूल विभागाच्या मार्फत राबविल्या जाणार्‍या योजनांसाठी सन २00२ची यादी ग्राह्य मानली जात असेल तर मुक्त अन्नधान्यासाठीच अडचण का? शासनच भेदभाव करीत नाही का? घरकुलासाठी  सन २00२ ची यादी तर अन्नधान्यासाठी सन १९९७ ची यादी असा प्रकार होत असल्याने नागरिकात असंतोष आहे.शासन इतर योजनांसाठी सन २00२ ची बीपीएल यादी ग्राह्य धरायला सांगते. मात्र राशनकार्ड व अन्नधान्यासाठी सन १९९७ ची यादी ग्राह्य मानते. यासाठी प्रशासनाची चूक नाही. शासनाचे धोरण जबाबदार आहे. १२ वर्षानंतरही नागरिकांची अडचण होत असली तरी आमचा नाईलाज आहे, अशी माहिती मोहाडी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी लोकमतला दिली. सन २00२ ची यादी चुकीची असल्याचे शासन मानत असेल तर इतर योजनांसाठीही ती यादी लागू करु नये. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता सन २00२ ची यादी ग्राह्य मानण्याची गरज असल्याचे मत जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत इलमे, महादेव बुरडे यांनी व्यक्त केले.  (वार्ताहर)