शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल व शिधापत्रिकेसाठी वेगवेगळे नियम कसे?

By admin | Updated: June 7, 2014 23:46 IST

राज्य शासनाकडून बीपीएलधारक लाभार्थ्यांची योजनासाठी निवड करताना भेदभाव केला जात आहे. त्यामुळे नागरिकात अन्याय होत असल्याची भावना आहे. घरकुल लाभार्थ्यांची निवड करताना

करडी (पालोरा) : राज्य शासनाकडून बीपीएलधारक लाभार्थ्यांची योजनासाठी निवड करताना भेदभाव केला जात आहे. त्यामुळे नागरिकात अन्याय होत असल्याची भावना आहे. घरकुल लाभार्थ्यांची निवड करताना सन २00२ च्या बीपीएल यादीतील लाभार्थ्यांची निवड ग्राह्य मानली जाते. मात्र राशनकार्डसाठी १९९७ च्या बीपीएल यादीचाच विचार केला जातो. यासंबंधाने प्रशासन राज्य शासनाच्या धोरणाचा हवाला देत आहे.राज्यातील नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी, जीवनमान उंचावण्यासाठी शासन अनेक योजना राबविते. योजनाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन काम करते. कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचाव्या हा त्यामागचा हेतू असतो. योजना राबविताना ध्येयधोरण आखले जातात. सोबतच अटी, नियम लावले जातात. मात्र काही योजना राबविताना शासनाकडून भेदभाव केला जात आहे.अन्न, वस्त्र, निवारा यापासून कुणीही वंचित राहू नये याकरिता शासनाने बीपीएल कुटुंबाकरिता राशनकार्डवर अन्नधान्य वाटप योजना आखली. काळ व वेळ बदलली असताना शासनाचे जुनेच धोरण सुरू असल्याने  नागरिकात असंतोषाची भावना आहे. राशनकार्ड व अन्नधान्याच्या पुरवठय़ासाठी आजही सन १९७७ ची बीपीएल यादी व त्यातीलल नावे ग्राह्य मानली जात आहेत. सदर यादी तयार होऊन १७ वर्षाचा कालावधी लोटला आहे.  मध्यंतरीच्या काळात सन २00२ मध्ये नव्याने  बीपीएल यादी तयार झाली. सर्व योजनांसाठी लागू झाली. मात्र अन्न पुरवठा विभाग या यादीलाच मानायला तयार नाही ही अवस्था आहे. महसूल विभागाच्या मार्फत राबविल्या जाणार्‍या योजनांसाठी सन २00२ची यादी ग्राह्य मानली जात असेल तर मुक्त अन्नधान्यासाठीच अडचण का? शासनच भेदभाव करीत नाही का? घरकुलासाठी  सन २00२ ची यादी तर अन्नधान्यासाठी सन १९९७ ची यादी असा प्रकार होत असल्याने नागरिकात असंतोष आहे.शासन इतर योजनांसाठी सन २00२ ची बीपीएल यादी ग्राह्य धरायला सांगते. मात्र राशनकार्ड व अन्नधान्यासाठी सन १९९७ ची यादी ग्राह्य मानते. यासाठी प्रशासनाची चूक नाही. शासनाचे धोरण जबाबदार आहे. १२ वर्षानंतरही नागरिकांची अडचण होत असली तरी आमचा नाईलाज आहे, अशी माहिती मोहाडी तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी लोकमतला दिली. सन २00२ ची यादी चुकीची असल्याचे शासन मानत असेल तर इतर योजनांसाठीही ती यादी लागू करु नये. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता सन २00२ ची यादी ग्राह्य मानण्याची गरज असल्याचे मत जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत इलमे, महादेव बुरडे यांनी व्यक्त केले.  (वार्ताहर)