शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

अल्पशा निधीत घरकुल बांधायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:42 IST

पालांदूर : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत लाखनी तालुक्यात सुमारे दोन हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे. ...

पालांदूर : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत लाखनी तालुक्यात सुमारे दोन हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे. घरकुलाची अनुदानित राशी केवळ एक लाख ३५ हजार रुपये असून, जीवघेण्या महागाईत एवढ्या रकमेत घर बांधणे अशक्य आहे. प्रशासनामार्फत लाभार्थ्यांची भेट घेऊन वास्तव स्थिती अभ्यासित घरकुल निधी दुप्पट करण्याची मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष दामाजी खंडाईत यांनी शासनासह प्रशासनाला केली आहे.

गरजू लाभार्थ्यांना ग्रामपंचायत शिफारसीनुसार घरकुल देण्यात आले. गरजूंनी मिळालेल्या निधीत गरज या नात्याने बांधकाम हातात घेतले. बांधकामापूर्वीच अल्पशा निधी लाभार्थ्यांना मिळाला. लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या साहित्याची झालेली दरवाढ अभ्यासता तोंडात बोटे घालण्याची वेळ आली. नियोजित असलेल्या घरकुलाच्या राशीत घराचे अर्धे बांधकामसुद्धा होणे कठीण असल्याचे पुढे आले आहे. घर पाडून बांधणे गरजेचे झाल्याने कर्जाचा डोंगर उभा करावा लागला. कित्येक घरकुल लाभार्थी बचत गटाच्या मार्फत कर्ज उचलून कर्जदार झाले आहेत. वितभर पोट भरणे जिथे अशक्य आहे, तिथे कर्जाची परतफेड करणे तारेवरची कसरत झाली आहे.

घर बांधकामासाठी लोखंड, सिमेंट, मजुरी यांचा खर्च किमान दोन पट महाग आहे. नियोजित निधीत वाढ झाल्याशिवाय गरिबांना घरकुल पूर्णत्वाला जाईल अशी शक्यता फारच कमी आहे. घरकुलाला मजुरीचा खर्च सुमारे ८० हजार रुपयांपर्यंत सांगितला जातो. लोखंड ५८ रुपयांच्या घरात प्रती किलोचा दर असल्याने व सिमेंट ३०० रुपयांच्या पुढे असल्याने आर्थिक संकट आहे. शासनाने प्रत्यक्ष दिलेल्या घरकुलाच्या क्षेत्रफळाचा विचार करीत बांधकाम विभागाच्या नियमानुसार निधीची तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दामाजी खंडाईत यांनी केली आहे.

प्रत्येक घरकुलाला दोन ब्रास रेती मोफत देण्याचे धोरण असतानासुद्धा लाभार्थ्यांना रेती मोफत मिळालेली नाही. तालुका स्तरावरून घरकुल लाभार्थ्यांची यादी पाहता त्यांना धोरणानुसार मोफत रेती देणे आवश्यक असतानासुद्धा कृती शून्य आहे. ''सबका साथ, सबका विकास''चा नारा देणाऱ्या सरकारने घरकुल लाभार्थ्यांचा निधी दुप्पट करण्याची नितांत गरज आहे.

दुकानदारांची उधारी डोक्यावर!

घरकुल लाभार्थींनी स्वतःची ओळख पुढे करून उधारीवर लोखंड, सिमेंट खरेदी केले. घरकुलाचे बिल निघतील तेव्हा उधारी पूर्ण देण्याचा शब्द दिला. मात्र, अपेक्षित वेळी घरकुलाचा निधी आलाच नसल्याने घरकुलाची उधारी लाभार्थ्याच्या डोक्यावर बसली आहे. काहींनी तर स्वतःकडील तुटपुंजी असलेली रक्कम खर्च करूनही घरकुल पूर्णत्वाला गेलेले नाही. शासनाने घरकुल दिले खरे, मात्र अपुऱ्या निधीने लाभार्थी कर्जबाजारी झाला.