शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:06 IST

वैनगंगा सहकारी साखर कारखाना देव्हाडा येथील कामगारांना थकीत वेतनाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आल्याने आता लवकरच सर्व कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे, अशी माहिती कामगार मजदूर संघ देव्हाडाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेद्वारे दिली असून कामगारांनी भ्रमीत होऊ नये, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देप्रकरण सर्वोच्च न्यायालयात : संघटनेची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : वैनगंगा सहकारी साखर कारखाना देव्हाडा येथील कामगारांना थकीत वेतनाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आल्याने आता लवकरच सर्व कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे, अशी माहिती कामगार मजदूर संघ देव्हाडाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेद्वारे दिली असून कामगारांनी भ्रमीत होऊ नये, असे आवाहन केले आहे.पूर्वीच्या वैनगंगा सहकारी साखर कारखान्यात २६० स्थायी व १५० अस्थायी कामगार कार्यरत होते. कारखाना डबघाईस आल्यावर त्यांचे वेतन थकीत झाले. स्टेट को आॅपरेटीव्ह बँक मुंबई शाखा नागपूर यांनी या कारखान्याला टाळे लावून नंतर विक्रीस काढले. कारखाना विक्री करताना बँकेने कामगारांचे थकीत वेतन देण्याचे औद्योगिक न्यायालयात मान्य केले होते. मात्र अल्प मोबदला देत असल्याने कामगार औद्योगिक न्यायालयात गेले. औद्योगिक न्यायालयाने कामगारांचे संपूर्ण थकीत वेतन देण्याचा निकाल दिला. त्यामुळे बँकेने उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयानेही कामगारांच्या बाजूने निकाल देत बँकेला १३ कोटी ८९ लक्ष ८४ हजार ३३४ रुपये कामगारांना देण्याचा आदेश ३० आॅक्टोबर २०१५ रोजी दिला होता. मात्र स्टेट को आॅपरेटीव्ह बँक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपीलात गेली. बँकेला असे वाटले की साधारण कामगार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीला जाणार नाहीत, पण कामगार संघटनेकडून अ‍ॅड.सत्यजीत देसाई, अ‍ॅड.प्रकाश मेघे व लक्ष्मी मलेवार यांनी बाजू मांडण्याचे मान्य केले. सर्वोच्च न्यायालयात टेबल क्रमांक ११० वर प्रकरण क्रमांक ४३१४९/२००५ हे सुनावणीसाठी घेण्यात आले असून या प्रकरणावर सुनावणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता असल्याने व निकाल कामगारांच्याच बाजूने लागेल, अशी माहिती वकीलांनी दिल्याने कामगारात आनंदाचे वातावरण आहे.कारखान्याचे व बँकेशी हितगुज असलेले काही कर्मचारी व कामगार खोट्या बातम्या पसरवित असून कामगारांना तडजोड करण्यास सांगत आहेत. कामगारांना त्यांच्या घामाचा पूर्ण मोबदला मिळणार असून कामगारांनी खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये तसेच न्यायालयाच्या खर्चासाठी लागणारी वर्गणी मजदूर संघाच्या पदाधिकाºयांकडेच जमा करावी असे आवाहन करण्यात आले.मोहाडी येथे आयोजित पत्रपरिषदेला भोजराम पारधी, टी.आर. गायधने, रामदास साठवणे, पी.एफ. बावनकर, कृष्णराव बारापात्रे, मनोहर गायधने, एस.पी. सव्वालाखे, अरुण हुड, मधुसूदन पाहुणे, राजू कारेमोरे, आर.व्ही. बांते, पी.सी. गौतम, शिवशंकर पेठेकर, गोलकुदास हेडाऊ, मनोहर पटले, झिबल लाळे, दयाराम नखाते, धनराज काटेखाये, संजय भवसागर, सुभाष यादव उपस्थित होते.