शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांचे मानधन चार महिन्यांपासून थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:35 IST

शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कित्येक योजनांचा वेळेत लाभार्थींना उपयोग होत नाही. लोकप्रतिनिधी कर्तव्यतत्पर नसल्याने प्रशासनाच भोंगळ कारभार पुढे येत आहे. ...

शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कित्येक योजनांचा वेळेत लाभार्थींना उपयोग होत नाही. लोकप्रतिनिधी कर्तव्यतत्पर नसल्याने प्रशासनाच भोंगळ कारभार पुढे येत आहे. दरमहा मिळणारे हजार रुपये ज्येष्ठांना अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटच्या टोकाला सन्मानाने जगता यावे याकरिता शासनाने श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना अशा विविध योजना नावाखाली ज्येष्ठांचा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दरमहा नियमित मानधन ज्येष्ठांना मिळत नसल्याने योजनेचे गांभीर्य शासन प्रशासनाला नसल्याचे दिसत आहे.

वर्षभरात एकदाही लाभार्थींना दरमहा नियोजित निधी मिळत नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या समन्वयातून गरिबांना हजार रुपये मानधन दिला जातो; परंतु कधी केंद्राचे तर कधी राज्याचे मानधन थकीत राहते. त्यामुळे दरमहा नियोजित निधी मिळत नाही. तहसीलस्तरावर शासनस्तरावरून नियोजित निधी उपलब्ध होत नसल्याने लाभार्थींना त्याचा फटका सहन करावा लागतो. कित्येक परिवारातील सदस्यांना ज्येष्ठांच्या मानधनाची सुद्धा अपेक्षा असते. घरातील वृद्धांच्या मानधनाची प्रतीक्षा घरच्या प्रमुखाला असते. अशा कठीण प्रसंगी शासनाने ज्येष्ठांचा मानसन्मान जपत दरमहा नियोजित मानधन त्यांना पुरवावा, अशी रास्त अपेक्षा ज्येष्ठांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केलेली आहे.

सरकार बसून वर्ष लोटले; परंतु अजूनही लाखनी तालुक्यातील निराधार योजनेची बैठक झालेली नाही. त्यामुळे कित्येक गरजू निराधार योजनेपासून परावृत्त आहेत. योजना आहेत, पण कार्यान्वित नसल्याने योजनांचा उपयोग काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.

गोरगरिबांच्या सेवेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. म्हातारपणात शक्यतो प्रत्येकाने आधार द्यावा. ज्येष्ठांची सेवा ही ईश्वराची सेवा आहे. हे तत्त्वज्ञान सांगणारी आपली संस्कृती शासन मात्र जपताना दिसत नाही. शासनकर्त्यांना यांचे गांभीर्य लक्षात आले नाही हे विशेष!

चौकट

शेती नाही आणि वाळी नाही. म्हातारपणात राबणे जमत नाही. सरकारच्या, अन् देवाच्या भरवशावर जगतून जी. दर महिन्याला पैसे आले तर दवाईपाण्याला बरे होते जी. पण बँकेत गेलो होतो तर पैसे नाही म्हणते जी. अशी प्रतिक्रिया लाभार्थींकडून ऐकायला मिळते.