शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

ज्येष्ठांचे मानधन चार महिन्यांपासून थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:35 IST

शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कित्येक योजनांचा वेळेत लाभार्थींना उपयोग होत नाही. लोकप्रतिनिधी कर्तव्यतत्पर नसल्याने प्रशासनाच भोंगळ कारभार पुढे येत आहे. ...

शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कित्येक योजनांचा वेळेत लाभार्थींना उपयोग होत नाही. लोकप्रतिनिधी कर्तव्यतत्पर नसल्याने प्रशासनाच भोंगळ कारभार पुढे येत आहे. दरमहा मिळणारे हजार रुपये ज्येष्ठांना अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटच्या टोकाला सन्मानाने जगता यावे याकरिता शासनाने श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना अशा विविध योजना नावाखाली ज्येष्ठांचा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दरमहा नियमित मानधन ज्येष्ठांना मिळत नसल्याने योजनेचे गांभीर्य शासन प्रशासनाला नसल्याचे दिसत आहे.

वर्षभरात एकदाही लाभार्थींना दरमहा नियोजित निधी मिळत नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या समन्वयातून गरिबांना हजार रुपये मानधन दिला जातो; परंतु कधी केंद्राचे तर कधी राज्याचे मानधन थकीत राहते. त्यामुळे दरमहा नियोजित निधी मिळत नाही. तहसीलस्तरावर शासनस्तरावरून नियोजित निधी उपलब्ध होत नसल्याने लाभार्थींना त्याचा फटका सहन करावा लागतो. कित्येक परिवारातील सदस्यांना ज्येष्ठांच्या मानधनाची सुद्धा अपेक्षा असते. घरातील वृद्धांच्या मानधनाची प्रतीक्षा घरच्या प्रमुखाला असते. अशा कठीण प्रसंगी शासनाने ज्येष्ठांचा मानसन्मान जपत दरमहा नियोजित मानधन त्यांना पुरवावा, अशी रास्त अपेक्षा ज्येष्ठांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केलेली आहे.

सरकार बसून वर्ष लोटले; परंतु अजूनही लाखनी तालुक्यातील निराधार योजनेची बैठक झालेली नाही. त्यामुळे कित्येक गरजू निराधार योजनेपासून परावृत्त आहेत. योजना आहेत, पण कार्यान्वित नसल्याने योजनांचा उपयोग काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.

गोरगरिबांच्या सेवेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. म्हातारपणात शक्यतो प्रत्येकाने आधार द्यावा. ज्येष्ठांची सेवा ही ईश्वराची सेवा आहे. हे तत्त्वज्ञान सांगणारी आपली संस्कृती शासन मात्र जपताना दिसत नाही. शासनकर्त्यांना यांचे गांभीर्य लक्षात आले नाही हे विशेष!

चौकट

शेती नाही आणि वाळी नाही. म्हातारपणात राबणे जमत नाही. सरकारच्या, अन् देवाच्या भरवशावर जगतून जी. दर महिन्याला पैसे आले तर दवाईपाण्याला बरे होते जी. पण बँकेत गेलो होतो तर पैसे नाही म्हणते जी. अशी प्रतिक्रिया लाभार्थींकडून ऐकायला मिळते.