शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

घराघरांत ग्रामगीतेचे वाचन गरजेचे

By admin | Updated: November 29, 2014 23:15 IST

जीवन सुखमय व आनंदी करण्यासाठी कर्तव्यतत्परता आवश्यक आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांची विचारसरणीच जगाला तारू शकते.

पालांदुरात कार्यक्रम : सत्यपाल महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी पालांदूर (चौ.) : जीवन सुखमय व आनंदी करण्यासाठी कर्तव्यतत्परता आवश्यक आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांची विचारसरणीच जगाला तारू शकते. आपल्या आचरणात, विचारात अपेक्षित बदल घडण्याकरिता प्रत्येक घरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे वाचन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सत्यपाल महाराज यांनी केले.पालांदूर येथे शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर खा. नाना पटोले, तारीक कुरैशी, जिल्हा परिषद सदस्य सविता ब्राम्हणकर, भरत खंडाईत, वैशाली खंडाईत, उत्तम नंदनवार, उद्योगपती चांदे उपस्थित होते. सत्यपाल महाराज म्हणाले, प्रत्येक घरात शौचालयाचा वापर करण्याची गरज आहे. गावात रोजगार शोधल्यास बेरोजगारी कमी होईल. आई वडिलांची सेवा हिच ईश्वरसेवा आहे. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुझ गावच नाही तिर्थ ही तुकडोजींची वाणी गात खान्देशाची ढोलकीचा ताल सप्तखंजेरीतून धरला. अत्यंत मनमोहक शैलीत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून चित्रपटांच्या गाण्यांच्या सोबतीने तीन तास प्रबोधन केले. सत्यपाल महाराजांना पेटीवादक गजानन चिंचोळकर, तबलावादक राहुल सोनवाने, सुनिलकुमार व सुखदेव चिंचोळकर यांनी साथ दिली. कार्यक्रम माला उपस्थितांचे आभार जि.प. सदस्य भरत खंडाईत यांनी मानले. (वार्ताहर)