शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

घराघरांत ग्रामगीतेचे वाचन गरजेचे

By admin | Updated: November 29, 2014 23:15 IST

जीवन सुखमय व आनंदी करण्यासाठी कर्तव्यतत्परता आवश्यक आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांची विचारसरणीच जगाला तारू शकते.

पालांदुरात कार्यक्रम : सत्यपाल महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी पालांदूर (चौ.) : जीवन सुखमय व आनंदी करण्यासाठी कर्तव्यतत्परता आवश्यक आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांची विचारसरणीच जगाला तारू शकते. आपल्या आचरणात, विचारात अपेक्षित बदल घडण्याकरिता प्रत्येक घरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचे वाचन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सत्यपाल महाराज यांनी केले.पालांदूर येथे शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर खा. नाना पटोले, तारीक कुरैशी, जिल्हा परिषद सदस्य सविता ब्राम्हणकर, भरत खंडाईत, वैशाली खंडाईत, उत्तम नंदनवार, उद्योगपती चांदे उपस्थित होते. सत्यपाल महाराज म्हणाले, प्रत्येक घरात शौचालयाचा वापर करण्याची गरज आहे. गावात रोजगार शोधल्यास बेरोजगारी कमी होईल. आई वडिलांची सेवा हिच ईश्वरसेवा आहे. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुझ गावच नाही तिर्थ ही तुकडोजींची वाणी गात खान्देशाची ढोलकीचा ताल सप्तखंजेरीतून धरला. अत्यंत मनमोहक शैलीत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून चित्रपटांच्या गाण्यांच्या सोबतीने तीन तास प्रबोधन केले. सत्यपाल महाराजांना पेटीवादक गजानन चिंचोळकर, तबलावादक राहुल सोनवाने, सुनिलकुमार व सुखदेव चिंचोळकर यांनी साथ दिली. कार्यक्रम माला उपस्थितांचे आभार जि.प. सदस्य भरत खंडाईत यांनी मानले. (वार्ताहर)