शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

गृहभेट आपुलकीअंतर्गत ‘प्रशासन आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST

नवेगावबांध : विशेष साहाय्य योजनेंतर्गत जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या संकल्पनेतील गृहभेट आपुलकीची या योजनेंतर्गत संजय गांधी निराधार ...

नवेगावबांध : विशेष साहाय्य योजनेंतर्गत जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या संकल्पनेतील गृहभेट आपुलकीची या योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध योजनांचे लाभार्थ्यांचे अर्ज या मोहिमेंतर्गत भरून घेण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गकाळात प्रशासन लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचून माहिती देत आहे.

या उपक्रमांतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी अपंग निवृत्तिवेतन या योजनेचे पात्र लाभार्थी तालुक्यात बऱ्याच प्रमाणात आहेत; परंतु या योजनेविषयी माहिती नाही किंवा ते खूप गरीब आहेत. सध्या कोरोनाकाळात वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे लाभार्थी हे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा लाभार्थ्यांसाठी ‘प्रशासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलाठी कार्यालयांतर्गत तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये ३ ते ८ मे या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. नवेगावबांध येथे ३ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात गृहभेट आपुलकीची हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात संजय गांधी निराधार योजनेतील विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजता गावातील लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे ग्रामपंचायतीचे सरपंच अनिरुद्ध शहारे व तलाठी पुंडलिक कुंभरे यांनी कळविले आहे.

दवंडीच्या माध्यमातून माहिती

तालुक्यातील २९ ग्रामपंचायत कार्यालयांत ३ ते ८ मे पर्यंत गृहभेट आपुलकीची ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गावांतील लाभार्थ्यांना देण्यात यावी, यासाठी तलाठ्यांनी गावोगावी दवंडीद्वारे ही माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश अर्जुनी मोरगाव तहसीलदार विनोद मेश्राम यांनी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना दिले आहेत.

अधिकाऱ्यांचे तयार केले पथक

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तहसील कार्यालयातील तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार के. एन. वाढई, भानारकर, मुनेश्वर गेडाम, मनीषा देशमुख व अव्वल कारकून आशा तागडे, लुचे, रीता गजभिये यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक दिलेल्या निर्धारित तारखेला व वेळेला ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहणार आहे.

४३९ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

यापूर्वी जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान ही मोहीम तालुक्यात राबविण्यात आली होती. यावेळी लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन ४४९ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले होते. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध योजनांतील पात्र ४३० लाभार्थ्यांचे अर्ज तत्काळ मंजूर करण्यात येऊन त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.