शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हिंस्र श्वापदांच्या भीतीने ४ वाजताच शाळांना सुटी

By admin | Updated: October 15, 2015 00:35 IST

निर्मनुष्य जंगलातून चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पायदळ मार्गक्रमण करीत शाळेत शिकायला जात आहेत.

पवनी वनपरिक्षेत्रातील प्रकार : वाघ, बिबट्यांनी केले पाळीव जनावरांना फस्तप्रशांत देसाई भंडारानिर्मनुष्य जंगलातून चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पायदळ मार्गक्रमण करीत शाळेत शिकायला जात आहेत. मात्र, हिंस्त्र श्वापदांचा धोका असल्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा विचार करून जंगलव्याप्त परिसरातील शाळा दुपारी ४ वाजताच बंद करण्यात येत असल्याचे वास्तव पवनी वनपरिक्षेत्रातील काही गावात असल्याचे समोर आले आहे.पवनी तालुक्यातील व नागपूर जिल्ह्यातील काही भाग मिळून उमरेड-कऱ्हांडला हे अभयारण्य अस्तित्वात आले आहे. सोबतच पवनी वनपरिक्षेत्रातील काही भाग राखीव वनक्षेत्रात मोडतो. पवनी, भुयार, कन्हाळगाव व मांडवगोटा हा परिसर पवनी वनपरिक्षेत्रात येतो. या क्षेत्रांतर्गत ढोरप, शिवनाळा, कन्हाळगाव, नांदीखेळा, खातखेळा, गुडेगाव, शेळी (सोमनाळा), विलम, सावरला या गावांचा अंतर्भाव आहे. सध्या ‘जय’ नामक वाघाची परिसरातील गावात दहशत पसरली असून शेतीवर जाणारे मजूर, शेतकरी, पालक व विद्यार्थी भयभीत आहेत. ढोरप, शिवनाळा, खातखेळा, विलम, नांदीखेळा, शेळी (सोमनाळा) येथे इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत, कन्हाळगांव, गुडेगाव येथे पहिली ते सातवी तर सावरला येथे पदवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. ढोरप, शिवनाळा, खातखेळा, विलम, नांदीखेळा, शेळी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जंगलातून मार्गक्रमण करून बाहेरगावी जावे लागते. मागीलवर्षी बिबट्याने उच्छाद मांडला होता. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. मात्र, या बिबट्याने वनकर्मचाऱ्यांना आठवडाभर हुलकावणी दिली होती. यावर्षी ‘जय’ नामक वाघाची भीती पसरली आहे. पंधरवड्यात वाघाने परिसरातील ग्रामस्थांची पाळीव जनावरे फस्त केली आहे. आठ दिवसापासून ‘जय’मुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतावर जायचे असल्यास या परिसरातील शेतकरी जमावाने जातात. या परिसरात हिंस्त्र श्वापदांचा वावर वाढला आहे. त्यामुळे जीवाच्या भितीने परिसरतील शाळांना दुपारी चार वाजताच सुटी देण्यात येत आहे. हिवाळ्यात दिवस लहान असल्याने अंधार लवकर पडतो. त्यामुळे येत्या काही दिवसात सायंकाळच्या सुमारास जंगलातून मार्ग काढताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागणार आहे. याबाबत शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून ठराव घेऊन शाळा दुपारलाच बंद करण्याबाबत शिक्षण विभागाला कळविणार आहेत.जीव मुठीत घेऊन त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची साधन उपलब्ध नाही. या मार्गावर खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना प्रवासी मिळत नाही. त्यामुळे ही वाहनधारक या मार्गावर केवळ पवनी येथील आठवडी बाजाराच्या दिवशीच वाहने चालवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन सायकल किंवा पायदळ जंगलातून शाळेत जावे लागते. शेळी येथील विद्यार्थी सावरला येथे दररोज १४ किलोमीटर तर ढोरप, कन्हाळगांवचे विद्यार्थी पवनी येथे दररोज ३४ किलोमीटरचा प्रवास करतात. जंगलव्याप्त परिसरातील गावातील शाळा आहेत. या शाळांना संरक्षण भिंत नाही. त्यासोबत वीज पुरवठा व अन्य भौतिक सुविधा नाहीत. त्यामुळे शाळांमधील मुलांचा जीव टांगणीला असतो. सध्या हिंस्त्रप्राण्यांचा उच्छाद असल्याने शाळा लवकर बंद करावी लागते. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. - महेश गावंडेमुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, ढोरप.