शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

हिंस्र श्वापदांच्या भीतीने ४ वाजताच शाळांना सुटी

By admin | Updated: October 15, 2015 00:35 IST

निर्मनुष्य जंगलातून चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पायदळ मार्गक्रमण करीत शाळेत शिकायला जात आहेत.

पवनी वनपरिक्षेत्रातील प्रकार : वाघ, बिबट्यांनी केले पाळीव जनावरांना फस्तप्रशांत देसाई भंडारानिर्मनुष्य जंगलातून चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पायदळ मार्गक्रमण करीत शाळेत शिकायला जात आहेत. मात्र, हिंस्त्र श्वापदांचा धोका असल्याने विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा विचार करून जंगलव्याप्त परिसरातील शाळा दुपारी ४ वाजताच बंद करण्यात येत असल्याचे वास्तव पवनी वनपरिक्षेत्रातील काही गावात असल्याचे समोर आले आहे.पवनी तालुक्यातील व नागपूर जिल्ह्यातील काही भाग मिळून उमरेड-कऱ्हांडला हे अभयारण्य अस्तित्वात आले आहे. सोबतच पवनी वनपरिक्षेत्रातील काही भाग राखीव वनक्षेत्रात मोडतो. पवनी, भुयार, कन्हाळगाव व मांडवगोटा हा परिसर पवनी वनपरिक्षेत्रात येतो. या क्षेत्रांतर्गत ढोरप, शिवनाळा, कन्हाळगाव, नांदीखेळा, खातखेळा, गुडेगाव, शेळी (सोमनाळा), विलम, सावरला या गावांचा अंतर्भाव आहे. सध्या ‘जय’ नामक वाघाची परिसरातील गावात दहशत पसरली असून शेतीवर जाणारे मजूर, शेतकरी, पालक व विद्यार्थी भयभीत आहेत. ढोरप, शिवनाळा, खातखेळा, विलम, नांदीखेळा, शेळी (सोमनाळा) येथे इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत, कन्हाळगांव, गुडेगाव येथे पहिली ते सातवी तर सावरला येथे पदवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. ढोरप, शिवनाळा, खातखेळा, विलम, नांदीखेळा, शेळी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जंगलातून मार्गक्रमण करून बाहेरगावी जावे लागते. मागीलवर्षी बिबट्याने उच्छाद मांडला होता. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. मात्र, या बिबट्याने वनकर्मचाऱ्यांना आठवडाभर हुलकावणी दिली होती. यावर्षी ‘जय’ नामक वाघाची भीती पसरली आहे. पंधरवड्यात वाघाने परिसरातील ग्रामस्थांची पाळीव जनावरे फस्त केली आहे. आठ दिवसापासून ‘जय’मुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतावर जायचे असल्यास या परिसरातील शेतकरी जमावाने जातात. या परिसरात हिंस्त्र श्वापदांचा वावर वाढला आहे. त्यामुळे जीवाच्या भितीने परिसरतील शाळांना दुपारी चार वाजताच सुटी देण्यात येत आहे. हिवाळ्यात दिवस लहान असल्याने अंधार लवकर पडतो. त्यामुळे येत्या काही दिवसात सायंकाळच्या सुमारास जंगलातून मार्ग काढताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागणार आहे. याबाबत शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून ठराव घेऊन शाळा दुपारलाच बंद करण्याबाबत शिक्षण विभागाला कळविणार आहेत.जीव मुठीत घेऊन त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची साधन उपलब्ध नाही. या मार्गावर खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना प्रवासी मिळत नाही. त्यामुळे ही वाहनधारक या मार्गावर केवळ पवनी येथील आठवडी बाजाराच्या दिवशीच वाहने चालवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन सायकल किंवा पायदळ जंगलातून शाळेत जावे लागते. शेळी येथील विद्यार्थी सावरला येथे दररोज १४ किलोमीटर तर ढोरप, कन्हाळगांवचे विद्यार्थी पवनी येथे दररोज ३४ किलोमीटरचा प्रवास करतात. जंगलव्याप्त परिसरातील गावातील शाळा आहेत. या शाळांना संरक्षण भिंत नाही. त्यासोबत वीज पुरवठा व अन्य भौतिक सुविधा नाहीत. त्यामुळे शाळांमधील मुलांचा जीव टांगणीला असतो. सध्या हिंस्त्रप्राण्यांचा उच्छाद असल्याने शाळा लवकर बंद करावी लागते. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. - महेश गावंडेमुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, ढोरप.