शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

अग्निकांडातून बचावलेल्या पाच बालकांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:32 IST

भंडारा : दहा दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात घडलेल्या अग्नितांडवात दहा बालके गतप्राण झाली होती. यातून बचावलेल्या सात बालकांपैकी पाच ...

भंडारा : दहा दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात घडलेल्या अग्नितांडवात दहा बालके गतप्राण झाली होती. यातून बचावलेल्या सात बालकांपैकी पाच बालकांना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहेत. यात गुरुवारी दोन, शुक्रवारी दोन तर रविवारी एका बालकाला डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे यापैकी एका बालकाला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे तर एक बालक उपचारार्थ भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात अतिदक्षता कक्षात ९ जानेवारी रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्याचवेळी सात बालकांना या अग्नितांडवातून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. या सातही बालकांवर जिल्हा रुग्णालयात असलेल्या कुटुंबकल्याण विभागात तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या कक्षात उपचार सुरू होते. त्यापैकी उपचारार्थ दाखल असलेल्या सातपैकी पाच बालकांना सुटी देण्यात आली आहे. एका बालकाला श्वास घेण्यात त्रास होत असल्याने व अन्य आजार उद्भवल्याने त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अग्नितांडवानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात भेट देत या घटनेतील बचावलेल्या बालकांची विचारपूस केली होती. या सात बालकांपैकी पाच बालकांना सुट्टी मिळाली असून ते सुखरूप आपल्या मातांच्या कुशीत पोहोचले आहेत .

बॉक्स

अहवालाची प्रतीक्षा कायम

दहा निष्पाप बालकांचा जीव गेल्यानंतर राज्य शासनाने चौकशीसाठी समिती नेमली होती. यात नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्याचे समजते. मात्र घटनेला दहा दिवसांचा कालावधी लोटला असला तरी हा अहवाल अजूनही राज्य शासनाला सुपुर्द करण्यात आलेला नाही. दरम्यान हा अहवाल लवकरच सुपुर्द केला जाणार, याबाबतही विविध कयास बांधले जात आहेत. हा अहवाल दोनशे ते अडीचशे पानांचा असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.