शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ऐतिहासिक सिध्दार्थ वसतिगृहाला आग

By admin | Updated: May 25, 2016 01:14 IST

दीडशे वर्षापूर्वीची कौलारु इमारत दूपारी ४.१५ वाजताचे दरम्यान लागलेल्या आगीत जळुन खाक झाली.

दीडशे वर्षांची इमारत : ५० लाखांचे नुकसान, नगरपालिकेचे अग्निशमन वाहन कुचकामी, नागरिकांनी दाखविली समयसुचकतापवनी : दीडशे वर्षापूर्वीची कौलारु इमारत दूपारी ४.१५ वाजताचे दरम्यान लागलेल्या आगीत जळुन खाक झाली. आग लागल्यानंतर नागरिकांनी समयसुचकता दाखवित आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत इमारत आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती.नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे पर्यत्न करून नगर पालिका, पोलीस स्टेशन व भंडारा पोलीस मुख्यालयाला तातडीने कळविले. परंतु पाण्याचे टँकर पोहचण्यापूर्वी आधिकाधिक इमारत जळुन खाक झालेली होती. प्रशिक्षि२त वाहनचालकाची नियुक्ती न झाल्याने पालिकेचे अग्नीशमन वाहन पंधरा दिवसात दुसऱ्यांदा कूचकामी ठरले.२२ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी स्वतंत्र्य संग्राम सैनिक दलीतमित्र मन्साराम राऊत यांनी स्वातंत्र्यपुर्व काळात वसतीगृह सुरु केले. तीच इमारत आगीत जळून खाक झाली. इमारतीमध्ये भारत सेवक सिध्दार्थ वसतीगृह, श्री संताजी वसतीगृह व धम्मचक्र कन्या वसतीगृह या तिनही वसतीगृहाचे रेकार्ड, तिनही वसतीगृहासाठी विद्यार्थी-विद्याथींच्या गाद्या, ग्रंथालयाची पुस्तके, टीव्ही, दोन कॉम्प्युटर, इन्व्हर्टर, बॅटरी व अन्य महत्वाच्या वस्तू तसेच विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणारे लाकडी बेंच अशा सर्व वस्तू जळून खाक झाल्या. वसतीगृह संस्थेचे सचिव विकास राऊत हे कुटूंबासह भंडारा येथे गेले होते. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष रजनी मोटघरे, उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, धर्मेंद्र नंदरधने, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, मोहन पंचभाई, जिल्हा मत्स्य व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, राम भेंडारकर, पोलीस निरीक्षक खोब्रागडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन गहादे व वॉर्डातील नागरिकांनी तात्काळ वसतीगृह परिसर गाठले. त्यांनी आगीवर नियंत्रणासाठी कसोसीने प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविले. सायंकाळी ६ वाजता भंडारा येथून अग्नीशमन वाहन पोहचले व वसतीगृह इमारतीची आग विझविण्याचे प्रयत्न झाले. नगरपरिषद, दुग्ध उत्पादक संघ व भंडाराचे अग्नीशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. परंतु सागवनी लाकूड असलेली इमारत व सर्व साहित्य असे साधारणत: ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्नीशमन वाहनासाठी चालक व अन्य कर्मचारी नियुक्तीचे अधिकार न दिल्याने पंधरवाड्यात दोन घरे जळुन खाक झाली. (तालुकाा प्रतिनिधी)