शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

महामार्गावरील उड्डाणपूल ठरतोय जीवघेणा

By admin | Updated: August 6, 2014 23:39 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या मुजबी ते पारडी दरम्यान करण्यात आलेल्या विस्तारीकरणात शहापूर येथे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. हा उड्डाणपुल वाहतुकीला खुला करण्यात आल्यानंतर पहिल्याच

व्यथा राष्ट्रीय महामार्गाची : अर्धवट कामामुळे नागरिकांना सोसावा लागतोय त्रासदिनेश भुरे - शहापूरराष्ट्रीय महामार्गाच्या मुजबी ते पारडी दरम्यान करण्यात आलेल्या विस्तारीकरणात शहापूर येथे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. हा उड्डाणपुल वाहतुकीला खुला करण्यात आल्यानंतर पहिल्याच पावसात उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीखाली जीवघेणे भगदाड पडले आहेत. एखाद्या दिवशी मोठी प्राणहाणी घडल्यावर प्रशासनाला जाग येणार काय? असा प्रश्न नागरीक विचारीत आहेत. पुलाखालील माती, दगडाचे थर, पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नाल्या, मातीवर घालण्यात आलेली मॅटींग घसरल्याने अनेक ठिकाणी भगदाड पडले आहेत. पावसाचे पाणी उड्डाणपुलावरून निचरा होण्याकरिता तयार करण्यात आलेली प्रणाली पूर्णपणे निरुपयोगी ठरली आहे. पावसाचे पाणी वहन होण्याकरिता जी रचना उड्डाणपुलावर तयार करण्यात आली आहे ती सदोष असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या उड्डाणपुलावर वाहतुकीकरिता दुहेरी मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा मोठी भिंत उभी केली आहे. रस्त्याच्या मधोमध विभाजक तयार करण्यात आले आहे. भिंतीच्या बाजूला लोखंडी कठडे असून ओटी भिंत व कठड्याखालून उड्डाणपुलावरील पाणी वाहून जाण्याकरिता नालीसदृष्य पोकळी ठेवण्यात आली आहे. त्याखाली संरक्षक भिंतीला अर्धगोलाकार सिमेंट पायलीची नाली ‘सर्व्हीस रोड’च्या दिशेने तयार करण्यात आली आहे. नालीच्या दोन्ही बाजूस काळ्या दगडाचे चर लावण्यात आले आहेत. मात्र उड्डाणपुालवरील छोट्या भिंतीमधील पोकळी व संरक्षक भिंतीवर तयार करण्यात आलेल्या नालीचा ताळमेळ बसत नसल्याने पुलावरील पाणी या नाल्यामधून वाहून जात नाही. त्याचा परिणाम पावसाचे पाणी उड्डाणपुलावरच जमा होऊन महामार्गानेच उताराच्या दिशेने वाहून जाते. याचा फटका रहदारीला बसत असतो. पावसामध्ये वाहतूक सुरु असताना महामार्गावर पाण्याचे कारंजे बघावयास मिळतात.नाल्या घसरु लागल्याराष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाकरिता तयार करण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरील अर्धगोलाकार पायल्याच्या नाल्या सिमेंटचा वापर करून बंदिस्त करण्यात येवून शेजारी दगडाचे थर देण्यात आले. पावसामुळे त्याखालीची माती बसल्यामुळे व वाहून गेल्यामुळे संरक्षक दगडाचे चर जागचे हलले नाहीत. त्यामुळे तयार करण्यात आलेल्या बहुतांशी नाल्या सर्व्हीस रोडच्या दिशेने घसरल्या आहेत. या भागातून घसरलेली माती सर्व्हीस रोडच्या कडेला जमा झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाच्या कामाची गुणवत्ता उघड्यावर आली आहे.एकच बोगदाया उड्डाणपुलामुळे गावाचे दोन भागात विभाजन झाले असून जवळपास अर्धा कि.मी. लांब अंतर असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला आवागमनाकरीता फक्त एकच बोगदा देण्यात आला आहे. त्याचा फटका स्थानिक ग्रामस्थांसोबत परिसरातील नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथे तीन बोगदे देण्यात यायला पाहिजे होते. एक बौद्ध विहाराजवळ, दुसरा आहे तिथे व तिसरा बाजाराजवळ अशी आवश्यकता असताना बोगदा मात्र एकाच ठिकाणी देण्यात आला. जवळपास सव्वा किलोमीटर पर्यंत ग्रामस्थांची ससेहोलपट वाढली आहे. बोगद्याव्यतिरिक्त इकडून तिकडे जायचे असेल तर एम.आय.ई.टी. कॉलेज नंतर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या वळण रस्त्याचाच वापर नागरिकांना करावा लागत आहे.