शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रू नागरिकांना स्वच्छतेचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:28 IST

फ्लॅट स्कीममध्ये राहणारे सुशिक्षित असतात असा समज बहुतांशांचा असतो. हे काही अंशी ते खरेही असेल.

ठळक मुद्देअपार्टमेंट परिसरातील नागरिक त्रस्त : उपाययोजना व कारवाई करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : फ्लॅट स्कीममध्ये राहणारे सुशिक्षित असतात असा समज बहुतांशांचा असतो. हे काही अंशी ते खरेही असेल. मात्र एकीकडे स्वच्छतेसाठी काही लोक जीवाचे रान करीत असताना सुशिक्षित म्हणविणाऱ्यांकडून अस्वच्छता पसरविली जात असेल तर अशा सुशिक्षितपणाचा उपयोग तरी काय, असा प्रश्न खोकरला येथील रजनीनगर परीसरातील नागरिकांना पडला आहे.खोकरला ग्रामपंचायतअंतर्गत रजनीनगरामध्ये असलेल्या एका अपार्टमेंटची पाच मजली इमारत आहे. या ठिकाणी राहत असलेले काही नागरिक वरील मजल्यावरूनच दररोजच कचरा व पाणी फेकतात. फेकण्यात आलेल्या कचºयावर डुक्करे व जनावरे ताव मारतात. यामुळे सदर कचरा परिसरत अस्ताव्यस्त होतो तसेच हवेद्वारे पसरतो. एवढेच नाहीतर कचऱ्याची दुर्गंधी सुटून परिसरात राहणाऱ्या इतर नागरिकांना त्रास होवून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.खोकरला परिसरातील अशा अनेक अपार्टमेंटखाली स्वच्छतेचे तीनतेरा होत असल्याने अनेक अपार्टमेंटखाली मोठया प्रमाणात पसरलेला कचरा याची साक्ष देतो आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने अशा इमारतीमध्ये राहणाऱ्याना कर्तव्याची जाणिव करून देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत प्रशासनाची कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा नसल्याने, नागरिकही स्वत:चे कर्तव्य विसरल्यागत वागत असल्याच्या प्रकार रजनीनगर व गंगानगर येथे राहत असलेल्या व त्रासाचा सामना करणाºया परिसरातील नागरिकांच्या तक्रारीतूनसमोर आला आहे.अपार्टमेंटमधील नागरिक घरात होणारा कचरा बाहेर नेऊन योग्य ठिकाणी न टाकता अनेकजण इमारतीवरून कचरा खाली फेकत असल्याने इमारत परिसर अस्वच्छ होतो. इमारत परिसरात पडून असलेल्या प्लास्टीक पिशव्या आणि इतर निरूपयोगी कचºयामुळे खाली राहणाऱ्या व आजुबाजूला परिसरात राहणाऱ्याना त्याचा त्रास सहन करावा लागतो. एकीकडे देशाचे प्रधानमंत्री स्वच्छ भारताचे स्वप्न पाहत आहेत. तर दुसरीकडे कर्तव्याची जाणीव न बाळगता टोलेजंग इमारतीमध्ये राहणारे नागरिक कचरा फेकून अस्वच्छता परिसरविण्याचे काम करीत असल्याने ते न समजण्यापलिकडचे आहे. अशावेळी त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी उपाययोजनेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.