शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रू नागरिकांना स्वच्छतेचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:28 IST

फ्लॅट स्कीममध्ये राहणारे सुशिक्षित असतात असा समज बहुतांशांचा असतो. हे काही अंशी ते खरेही असेल.

ठळक मुद्देअपार्टमेंट परिसरातील नागरिक त्रस्त : उपाययोजना व कारवाई करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतभंडारा : फ्लॅट स्कीममध्ये राहणारे सुशिक्षित असतात असा समज बहुतांशांचा असतो. हे काही अंशी ते खरेही असेल. मात्र एकीकडे स्वच्छतेसाठी काही लोक जीवाचे रान करीत असताना सुशिक्षित म्हणविणाऱ्यांकडून अस्वच्छता पसरविली जात असेल तर अशा सुशिक्षितपणाचा उपयोग तरी काय, असा प्रश्न खोकरला येथील रजनीनगर परीसरातील नागरिकांना पडला आहे.खोकरला ग्रामपंचायतअंतर्गत रजनीनगरामध्ये असलेल्या एका अपार्टमेंटची पाच मजली इमारत आहे. या ठिकाणी राहत असलेले काही नागरिक वरील मजल्यावरूनच दररोजच कचरा व पाणी फेकतात. फेकण्यात आलेल्या कचºयावर डुक्करे व जनावरे ताव मारतात. यामुळे सदर कचरा परिसरत अस्ताव्यस्त होतो तसेच हवेद्वारे पसरतो. एवढेच नाहीतर कचऱ्याची दुर्गंधी सुटून परिसरात राहणाऱ्या इतर नागरिकांना त्रास होवून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.खोकरला परिसरातील अशा अनेक अपार्टमेंटखाली स्वच्छतेचे तीनतेरा होत असल्याने अनेक अपार्टमेंटखाली मोठया प्रमाणात पसरलेला कचरा याची साक्ष देतो आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने अशा इमारतीमध्ये राहणाऱ्याना कर्तव्याची जाणिव करून देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत प्रशासनाची कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा नसल्याने, नागरिकही स्वत:चे कर्तव्य विसरल्यागत वागत असल्याच्या प्रकार रजनीनगर व गंगानगर येथे राहत असलेल्या व त्रासाचा सामना करणाºया परिसरातील नागरिकांच्या तक्रारीतूनसमोर आला आहे.अपार्टमेंटमधील नागरिक घरात होणारा कचरा बाहेर नेऊन योग्य ठिकाणी न टाकता अनेकजण इमारतीवरून कचरा खाली फेकत असल्याने इमारत परिसर अस्वच्छ होतो. इमारत परिसरात पडून असलेल्या प्लास्टीक पिशव्या आणि इतर निरूपयोगी कचºयामुळे खाली राहणाऱ्या व आजुबाजूला परिसरात राहणाऱ्याना त्याचा त्रास सहन करावा लागतो. एकीकडे देशाचे प्रधानमंत्री स्वच्छ भारताचे स्वप्न पाहत आहेत. तर दुसरीकडे कर्तव्याची जाणीव न बाळगता टोलेजंग इमारतीमध्ये राहणारे नागरिक कचरा फेकून अस्वच्छता परिसरविण्याचे काम करीत असल्याने ते न समजण्यापलिकडचे आहे. अशावेळी त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी उपाययोजनेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.