शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

गारपीट व वादळ वाऱ्याने नुकसानग्रस्त धान उत्पादकांना सरसकट मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:36 IST

पालांदूर : निसर्गाच्या दुष्टचक्राने लाखनी तालुक्यातील शेतकरी नुकसानास पात्र ठरलेले आहेत. गत १० व १६ मे रोजी अस्मानी संकटाने ...

पालांदूर

: निसर्गाच्या दुष्टचक्राने लाखनी तालुक्यातील शेतकरी नुकसानास पात्र ठरलेले आहेत. गत १० व १६ मे रोजी अस्मानी संकटाने धानाचे व भाजीपाला क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत गरजेची आहे. ३३ टक्के नुकसानीची अट शिथिल करीत नुकसानग्रस्तांना सरसकट मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती विनायक बुरडे यांनी केली आहे.

लाखनी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीने ६२ गावे प्रभावित झाली आहेत. ८३५.७० हेक्टर धानाचे गारपिटीने नुकसान झालेले आहे. यात ३३ टक्क्याच्या वर व ३३ टक्क्याच्या आत अशी वर्गवारी करून नुकसानभरपाईचा नजरअंदाज तयार करण्यात आलेला आहे. ३३ टक्क्यांची नुकसानभरपाई मोजणीचे माप प्रमाणित केले आहे काय, ३२ टक्के नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांचा वाली नाही काय, टक्केवारीत नुकसान दाखवून प्रभावित शेतकऱ्यांना न्याय मिळेल काय, आदी प्रश्नांची उत्तरे निश्चितच क्लिष्ट आहेत. शेतकऱ्यांची अगतिकता ओळखत त्यांच्या परिश्रमाची किंमत करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उत्पादित खर्च सारखाच लागलेला आहे. त्यामुळे ३३ टक्क्याची ही वर्गवारी निश्चितच चुकीची वाटत आहे. जेवणाळा, इसापूर, मचारना, गोंडेगाव, गुरढा, खुणारी खराशी, भूगाव, कवडसी आदींसह ६२ गावांतील शेतकरी बाधित झाले आहेत. तेव्हा निश्चितच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत अत्यावश्यक झाली आहे. गत खरिपातसुद्धा हातातोंडाशी आलेले पीक अस्मानी संकटाने शेवटच्या टोकात हिरावून घेतले. त्यावेळी अपेक्षित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. खरिपाची कसर उन्हाळी हंगामात निघेल, या आशेने उन्हाळी धान जोखीम पत्करत लावले. मात्र, निसर्गाच्या दुष्टचक्राने हिरावून नेले.