शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शेतकऱ्यांना नवीन दराप्रमाणे मदत द्या

By admin | Updated: April 9, 2017 00:25 IST

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द, बावनथडी या प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावा,...

परिणय फुके : अधिवेशनात मांडला शेतकऱ्यांचा प्रश्नभंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द, बावनथडी या प्रकल्पांसह अन्य प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावा, अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ.परिणय फुके यांनी विधान परिषदेत शुक्रवारला तारांकित प्रश्नोत्तरात सभागृहात केली. निवडून आल्यानंतर त्यांचे विधान परिषदेतील हे पहिले अधिवेशन आहे. यावेळी आमदार फुके यांनी महसुल मंत्र्यांना प्रकल्पांकरीता संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. १ जानेवारी रोजी मुुल्यांकन तिथी ग्राह्य धरण्यासाठी सांगूनही राज्य शासनाने अजूनही केंद्र शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी केली नाही. राज्य शासनाने संपादित जमिनीकरीता १८९४ च्या कलम ४ नुसार बाजारभाव निश्चित करीत असल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणने खरे असल्याचे सांगितले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास राज्य शासनाने चौकशी केली का? चौकशीच्या अनुषंगाने १ जानोरी २०१४ रोजीचे नवीन मुल्यांकन तिथी लागू करून नुकसान झालेल्या प्रकल्पस्त शेतकऱ्यांना नवीन दराप्रमाणे फरकाची रक्कम देण्याबाबत कोणती कार्यवाही केली का? कार्यवाही न झाल्यास विलंबाची कोणती कारणे या आ.फुके यांच्या प्रश्नावर ना.चंद्रकांत पाटील म्हणाले, याप्रकरणी केंद्र शासनाने २६ नोव्हेंबर २०१५ च्या पत्रान्वये भूसंपादन अधिनियम, १८९४ नुसार कार्यवाहीस असलेल्या प्रकरणाबाबत केंद्र शासनाच्या अभिप्रायामध्ये विसंगती दिसून आली होती. त्यामुळे केंद्र शासनाकडे २७ एप्रिलच्या पत्रान्वये फेरमार्गदर्शन मागविले असल्याचे सांगितले. त्यानुसार केंद्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे माहितीसह संदर्भ करण्यात येत असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)