भंडारा जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी वैनगंगा असून, यासाेबतच कन्हान सूर, बावनथडी आणि चूलबंद नदी वाहते. दरवर्षी या नद्यांच्या पुराचा फटका नदी तीरावरील गावांना बसताे. जिल्ह्यात १५४ गावे नदी तिरावर असून, जिल्ह्यात संजय सराेवर, सिरपूर, पुजारीटाेली, कालीसराड आणि इटियाडाेह प्रकल्पातून अतिरिक्त पाणी पावसाळ्यात साेडण्यात येत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण हाेते. यंदा प्रशासनाने पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणेला सज्ज केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. पुराचा फटका बसणाऱ्या गावांचा उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी दाैरा करून सद्यस्थितीची माहिती गाेळा करण्यात आली आहे. यासाेबतच फायरफायटर, अग्निशमन दल, बाेटी तयार ठेवण्यात आले आहे. गतवर्षी झालेल्या महापुरात अनेक गावांना फटका बसला हाेता. शेकडाे हेक्टर पीक महापुरात वाहून गेले हाेते. भंडारा शहरही जलमय झाले हाेते. यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
अग्निशमन दल सज्ज
भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन दलाची मदत घेतली जाते. भंडारा, तुमसर, साकाेली नगरपरिषदेच्या अग्निशमन दल मदतीला धावून येते. यासाेबतच आयुध निर्माण कारखान्याचे अग्निशमन दलही मदतीला असते.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून पूरपरिस्थितीत बचाव कशा करावा, याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. भंडारा येथील वैनगंगा नदीपात्रात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
टाकावू वस्तूपासून पूरपरिस्थितीत बचावासाठी कसा उपयाेग करावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याच्या रिकाम्या बाॅटलपासून लाइफ सेव्हिंग डिवाइस तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
शहरातील धाेकादायक इमारती, धाेकादायक झाडे
भंडारा नगरपरिषदेंतर्गत २१ धाेकादायक इमारती आहेत. या सर्व इमारतींना नगरपरिषदेच्या वतीने नाेटीस बजावण्यात आले आहे, तसेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदी तीरावरील गावांमध्येही अनेक घरे धाेकादायक स्थितीत आहेत. पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक गावांमध्ये अशी धाेकादायक गावे असून, त्यांनाही प्रशासनाने सतर्क केले आहे.
जिल्ह्यातील राज्य मार्गासह शहरात विविध ठिकाणी ब्रिटिशकालीन वृक्ष आहेत. जीर्ण झालेले हे वृक्ष पावसाळ्यात केव्हाही काेसळू शकतात. नगरपरिषदेच्या वतीने अशा वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात आले.
पूरबाधित क्षेत्र
भंडारा जिल्ह्यातील १५४ गावांना पुराचा फटका बसताे. त्यात भंडारा तालुक्यातील ३८, माेहाडी १७, तुमसर २४, पवनी ३३, साकाेली ०३, लाखांदूर २८ आणि लाखनी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. वैनगंगा नदीतीरावरील ९९, चूलबंद ३१, सूर ११, कन्हान ४ आणि बावनथडी नदीच्या तीरावर ९ गावे आहेत. भंडारा तालुक्यातील अर्जुनी, काेरंभी, पिंडकेपार, सुरेवाडा, माेहाडी तालुक्यातील मुंढरी, ढिवरवाडा, घाटकुराेडा, तुमसर तालुक्यातील तामसवाडी, परसवाडा, पवनी तालुक्यातील पवना, जुनाेना, सावरगाव या गावांचा संपर्क तुटताे.
गतवर्षी महापुराची स्थिती पाहता, या वर्षी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली. पुराचा फटका बसणाऱ्या गावांमध्ये विविध उपाययाेजना केल्या जात आहे, तसेच नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे.
- अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी