शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

रोवणीसाठी शेतकऱ्यांना हवाय दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसरात शेतकरी बेपत्ता पावसाने संकटात सापडले असताना रिमझिम पावसाचे आगमन झाले. तापलेल्या ...

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसरात शेतकरी बेपत्ता पावसाने संकटात सापडले असताना रिमझिम पावसाचे आगमन झाले. तापलेल्या जमिनीला व पिकांना थंडावा मिळाला असला तरी रखडलेली रोवणी सुरू होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.

दोन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी चिंतातुर होते. परिसरात आतापर्यंत केवळ २० टक्के सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी झाली असून, ८० टक्के शेती पडीत आहे. कडक उन्हामुळे बोअरवेल्स व विहिरींची पाण्याची पातळी खालावली असून, परिसर दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. करडी परिसरात अजूनही ४,५०० हेक्टर हेक्टर शेती रोवणीविणा पडीत आहे. कडक उन्हाने जमीन तापलेली असून, रोवणीला भेगा पडल्या आहेत. अशा स्थितीत पऱ्हे वाचवायचे की, रोवणी झालेली पिके, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परिसरातील तलावांत पाण्याचा अत्यल्प साठा असून, लहान बोड्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. नाले व बंधारे कोरडी आहेत. करडी परिसरात ९० टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीवर आधारित जोडधंदे हेच आहेत. जोडधंद्यावर त्यांच्या कुटुंबाचा पालनपोषण होत आहे. शेतीच्या माध्यमातून धानाचे उत्पादन काढून घरातील परिवाराचा प्रपंच चालवून मुलाबाळांचे शिक्षण व अन्य खर्च केला जात असताना यावर्षी निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचे साधन नाही, अशा कोरडवाहू शेतकऱ्यांनी हलक्या धानाचे पऱ्हे घातले. त्यास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. पावसाअभावी रोवणी झालेली नसल्याने हलक्या धानाची मुदत संपत चालली आहे. लागवड उशिरा झाल्यास पाहिजे तेवढे उत्पादन हाती पडणार नाही, शेतीत खर्च केलेला पैसा निघणार किंवा नाही, याची शंका शेतकऱ्यांना आहे. सद्य:स्थितीत रासायनिक खते, मशागत, मजुरी आदींचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व उत्पादन कमी, अशी स्थिती निर्माण होण्याचा धास्ती शेतकऱ्यांत आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी २० हजार रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी करडी व पालोरा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बॉक्स

खतांची वाढली मागणी

पंधरा दिवसांनंतर रिमझिम पावसाचा आरंभ होताच शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे. पुन्हा रोवणीला सुरुवात करण्यासाठी खत विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढीस लागली आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिश्र खताची मागणी होत आहे; परंतु खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.