शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रोवणीसाठी शेतकऱ्यांना हवाय दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसरात शेतकरी बेपत्ता पावसाने संकटात सापडले असताना रिमझिम पावसाचे आगमन झाले. तापलेल्या ...

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसरात शेतकरी बेपत्ता पावसाने संकटात सापडले असताना रिमझिम पावसाचे आगमन झाले. तापलेल्या जमिनीला व पिकांना थंडावा मिळाला असला तरी रखडलेली रोवणी सुरू होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.

दोन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी चिंतातुर होते. परिसरात आतापर्यंत केवळ २० टक्के सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी झाली असून, ८० टक्के शेती पडीत आहे. कडक उन्हामुळे बोअरवेल्स व विहिरींची पाण्याची पातळी खालावली असून, परिसर दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. करडी परिसरात अजूनही ४,५०० हेक्टर हेक्टर शेती रोवणीविणा पडीत आहे. कडक उन्हाने जमीन तापलेली असून, रोवणीला भेगा पडल्या आहेत. अशा स्थितीत पऱ्हे वाचवायचे की, रोवणी झालेली पिके, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परिसरातील तलावांत पाण्याचा अत्यल्प साठा असून, लहान बोड्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. नाले व बंधारे कोरडी आहेत. करडी परिसरात ९० टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीवर आधारित जोडधंदे हेच आहेत. जोडधंद्यावर त्यांच्या कुटुंबाचा पालनपोषण होत आहे. शेतीच्या माध्यमातून धानाचे उत्पादन काढून घरातील परिवाराचा प्रपंच चालवून मुलाबाळांचे शिक्षण व अन्य खर्च केला जात असताना यावर्षी निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचे साधन नाही, अशा कोरडवाहू शेतकऱ्यांनी हलक्या धानाचे पऱ्हे घातले. त्यास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. पावसाअभावी रोवणी झालेली नसल्याने हलक्या धानाची मुदत संपत चालली आहे. लागवड उशिरा झाल्यास पाहिजे तेवढे उत्पादन हाती पडणार नाही, शेतीत खर्च केलेला पैसा निघणार किंवा नाही, याची शंका शेतकऱ्यांना आहे. सद्य:स्थितीत रासायनिक खते, मशागत, मजुरी आदींचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व उत्पादन कमी, अशी स्थिती निर्माण होण्याचा धास्ती शेतकऱ्यांत आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी २० हजार रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी करडी व पालोरा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बॉक्स

खतांची वाढली मागणी

पंधरा दिवसांनंतर रिमझिम पावसाचा आरंभ होताच शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे. पुन्हा रोवणीला सुरुवात करण्यासाठी खत विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढीस लागली आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिश्र खताची मागणी होत आहे; परंतु खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.