शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

रोवणीसाठी शेतकऱ्यांना हवाय दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसरात शेतकरी बेपत्ता पावसाने संकटात सापडले असताना रिमझिम पावसाचे आगमन झाले. तापलेल्या ...

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसरात शेतकरी बेपत्ता पावसाने संकटात सापडले असताना रिमझिम पावसाचे आगमन झाले. तापलेल्या जमिनीला व पिकांना थंडावा मिळाला असला तरी रखडलेली रोवणी सुरू होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.

दोन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी चिंतातुर होते. परिसरात आतापर्यंत केवळ २० टक्के सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी झाली असून, ८० टक्के शेती पडीत आहे. कडक उन्हामुळे बोअरवेल्स व विहिरींची पाण्याची पातळी खालावली असून, परिसर दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. करडी परिसरात अजूनही ४,५०० हेक्टर हेक्टर शेती रोवणीविणा पडीत आहे. कडक उन्हाने जमीन तापलेली असून, रोवणीला भेगा पडल्या आहेत. अशा स्थितीत पऱ्हे वाचवायचे की, रोवणी झालेली पिके, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परिसरातील तलावांत पाण्याचा अत्यल्प साठा असून, लहान बोड्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. नाले व बंधारे कोरडी आहेत. करडी परिसरात ९० टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीवर आधारित जोडधंदे हेच आहेत. जोडधंद्यावर त्यांच्या कुटुंबाचा पालनपोषण होत आहे. शेतीच्या माध्यमातून धानाचे उत्पादन काढून घरातील परिवाराचा प्रपंच चालवून मुलाबाळांचे शिक्षण व अन्य खर्च केला जात असताना यावर्षी निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचे साधन नाही, अशा कोरडवाहू शेतकऱ्यांनी हलक्या धानाचे पऱ्हे घातले. त्यास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. पावसाअभावी रोवणी झालेली नसल्याने हलक्या धानाची मुदत संपत चालली आहे. लागवड उशिरा झाल्यास पाहिजे तेवढे उत्पादन हाती पडणार नाही, शेतीत खर्च केलेला पैसा निघणार किंवा नाही, याची शंका शेतकऱ्यांना आहे. सद्य:स्थितीत रासायनिक खते, मशागत, मजुरी आदींचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व उत्पादन कमी, अशी स्थिती निर्माण होण्याचा धास्ती शेतकऱ्यांत आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी २० हजार रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी करडी व पालोरा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बॉक्स

खतांची वाढली मागणी

पंधरा दिवसांनंतर रिमझिम पावसाचा आरंभ होताच शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे. पुन्हा रोवणीला सुरुवात करण्यासाठी खत विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढीस लागली आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिश्र खताची मागणी होत आहे; परंतु खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.