शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

निम्न चुलबंद प्रकल्पाचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:43 IST

सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पाहात २३ वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या तालुक्यातील निम्न चुलबंद प्रकल्पाचा बुधवारी श्रीगणेशा झाला. या प्रकल्पातून अखेर तलावात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : साकोलीत पहिल्यांदाच सिंचनाची सोय

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पाहात २३ वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या तालुक्यातील निम्न चुलबंद प्रकल्पाचा बुधवारी श्रीगणेशा झाला. या प्रकल्पातून अखेर तलावात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. ६ हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे तालुक्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात सिंचन होणार आहे.साकोली तालुक्यातील चुलबंद नदीवर २३ वर्षापूर्वी प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. विविध कारणानी हा प्रकल्प रखडला होता. गत २३ वर्षांपासून शेतकरी या प्रकल्पाची प्रतीक्षा करीत होते. मात्र प्रकल्प पूर्णत्वास जात नव्हता. यामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये नाराजी पसरली होती. अखेर या प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागला. या प्रकल्पासाठी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार आदींनी प्रयत्न करून निधी खेचून आणला. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. बुधवारी उपविभागीय अभियंता अमोल चोपडे यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे पाणी कुंभली, खंडाळा आणि शिवणीबांध तलावात सोडण्यात आले. या प्रकल्पामुळे ६ हजार हेक्टर सिंचनाची सोय होणार आहे.उजवा आणि डावा कालवा या प्रकल्पात असून या प्रकल्पाचे पाणी तलावात व शेतीला जाण्यासाठी ही दोन्ही कालवे महत्वपूर्ण ठरणार आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे पाणी आधी तलावात सोडण्यात येणार आहे व त्यानंतर ते पाणी शेतीसाठी सोडले जाईल. सदर प्रकल्प दुर्गाबाई डोहाजवळ असून निसर्गरम्य परिसर आहे. या प्रकल्पापासून साकोली तालुक्यातील कुंभली, धर्मापुरी, सावरबांध, बोंडे, खंडाळा, वडद, सुकळी, महागाव, शिवणीबांध, सासरा, वटेटेकर, साखरा, न्याहारवाणी, कटंगधरा, विहिरगाव, गडकुंभली, सेंदूरवाफा, पाथरी, खैरलांजी, साकोली, जमनापूर, पिंडकेपार, बोदरा आदी गावातील शेतकºयांना सिंचनाची सोय होणार आहे. या तलावाला सात दरवाजे लावण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी अडवून कालव्याद्वारे तलावात सोडले जाईल.२३ वर्षात खर्च वाढलानिम्न चुलबंद प्रकल्पाला १९९५ साली सुरुवात झाली. पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु शेतकºयांना तब्बल २३ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. या काळात या प्रकल्पासाठीचा खर्च वाढत गेला. अखेर हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन शेतकºयांचे स्वप्न पूर्णत्वास आले.