शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

आरोग्य कर्मचारी वसाहत वाळवीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:00 IST

आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता ...

ठळक मुद्देगावपासूनचे अंतर पाहता एकही कर्मचारी राहावयास तयार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता एकही कर्मचारी राहावयास तयार नाही. परिणामी ही इमारत धूळखात पडली असून वाळवीच्या भक्षस्थानी पडू लागली आहे.इमारतीच्या बांधकामावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्चही पाण्यात गेला असून शासनाच्या तिजोरीवर अकारण भुर्दंड पडला आहे. भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागुन असलेल्या लाखांदूर या तालुकास्थळी पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. कालांतराने या रुग्णालयाचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात येऊन दर्जाही वाढविण्यात आला होता. लाखांदूर पासून काही अंतरावर तीन ते चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आरोग्य विभागातील कार्यरत कर्मचाºयांच्या निवासाची गंभीर समस्या लक्षात घेऊन ही बहुमजली इमारत शासनाने तयार करून दिली. मात्र तिथे एकही कर्मचारी राहत नसल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्यामुळे येथील सर्व महागड्या साहित्यांची चोरी झाली आहे. येथील कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असून काही बाहेरगाववरून येणे जाणे करतात.ही इमारत अंतरगावच्या हद्दीत असून लाखांदूरपासून ३ किमी अंतरावर आहे. इमारत गावाबाहेर असल्याने कर्मचारी या इमारतीत वास्तव्य करण्यास तयार नाही. या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून, दारे व खिडक्या चोरांनी लांबविल्या आहेत.आजघडीला गरिबांच्या घरांचा प्रश्न आहे आणि इकडे कोट्यवधी रुपयांची इमारत जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी प्रशासनाने एखाद्या गरीब कुटुंबाला आश्रय दिला तर वावगे ठरणार नाही मात्र शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे १६ वर्षांपुर्वी तयार झालेल्या इमारतीला भग्नावस्था आली असून असामाजिक तत्व आणि मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनलेल्या इमारतीच्या उभारणीवर खर्च झालेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याचे दिसून येते. या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन या इमारतीत गरिबांना तरी आश्रय देऊ करावे व इमारतीत जे कर्मचारी राहव्यास तयार नाही त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जनता करू लागली आहे .