शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

आरोग्य कर्मचारी वसाहत वाळवीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:00 IST

आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता ...

ठळक मुद्देगावपासूनचे अंतर पाहता एकही कर्मचारी राहावयास तयार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता एकही कर्मचारी राहावयास तयार नाही. परिणामी ही इमारत धूळखात पडली असून वाळवीच्या भक्षस्थानी पडू लागली आहे.इमारतीच्या बांधकामावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्चही पाण्यात गेला असून शासनाच्या तिजोरीवर अकारण भुर्दंड पडला आहे. भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागुन असलेल्या लाखांदूर या तालुकास्थळी पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. कालांतराने या रुग्णालयाचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात येऊन दर्जाही वाढविण्यात आला होता. लाखांदूर पासून काही अंतरावर तीन ते चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आरोग्य विभागातील कार्यरत कर्मचाºयांच्या निवासाची गंभीर समस्या लक्षात घेऊन ही बहुमजली इमारत शासनाने तयार करून दिली. मात्र तिथे एकही कर्मचारी राहत नसल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्यामुळे येथील सर्व महागड्या साहित्यांची चोरी झाली आहे. येथील कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असून काही बाहेरगाववरून येणे जाणे करतात.ही इमारत अंतरगावच्या हद्दीत असून लाखांदूरपासून ३ किमी अंतरावर आहे. इमारत गावाबाहेर असल्याने कर्मचारी या इमारतीत वास्तव्य करण्यास तयार नाही. या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून, दारे व खिडक्या चोरांनी लांबविल्या आहेत.आजघडीला गरिबांच्या घरांचा प्रश्न आहे आणि इकडे कोट्यवधी रुपयांची इमारत जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी प्रशासनाने एखाद्या गरीब कुटुंबाला आश्रय दिला तर वावगे ठरणार नाही मात्र शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे १६ वर्षांपुर्वी तयार झालेल्या इमारतीला भग्नावस्था आली असून असामाजिक तत्व आणि मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनलेल्या इमारतीच्या उभारणीवर खर्च झालेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याचे दिसून येते. या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन या इमारतीत गरिबांना तरी आश्रय देऊ करावे व इमारतीत जे कर्मचारी राहव्यास तयार नाही त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जनता करू लागली आहे .