शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचारी वसाहत वाळवीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:00 IST

आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता ...

ठळक मुद्देगावपासूनचे अंतर पाहता एकही कर्मचारी राहावयास तयार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या निवासाची समस्या निकाली काढण्यासाठी लाखांदूर येथे बहुमजली इमारत उभारण्यात आली असली तरी तेथील समस्या आणि गावपासूनचे अंतर पाहता एकही कर्मचारी राहावयास तयार नाही. परिणामी ही इमारत धूळखात पडली असून वाळवीच्या भक्षस्थानी पडू लागली आहे.इमारतीच्या बांधकामावर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्चही पाण्यात गेला असून शासनाच्या तिजोरीवर अकारण भुर्दंड पडला आहे. भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागुन असलेल्या लाखांदूर या तालुकास्थळी पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. कालांतराने या रुग्णालयाचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात येऊन दर्जाही वाढविण्यात आला होता. लाखांदूर पासून काही अंतरावर तीन ते चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आरोग्य विभागातील कार्यरत कर्मचाºयांच्या निवासाची गंभीर समस्या लक्षात घेऊन ही बहुमजली इमारत शासनाने तयार करून दिली. मात्र तिथे एकही कर्मचारी राहत नसल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्यामुळे येथील सर्व महागड्या साहित्यांची चोरी झाली आहे. येथील कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असून काही बाहेरगाववरून येणे जाणे करतात.ही इमारत अंतरगावच्या हद्दीत असून लाखांदूरपासून ३ किमी अंतरावर आहे. इमारत गावाबाहेर असल्याने कर्मचारी या इमारतीत वास्तव्य करण्यास तयार नाही. या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून, दारे व खिडक्या चोरांनी लांबविल्या आहेत.आजघडीला गरिबांच्या घरांचा प्रश्न आहे आणि इकडे कोट्यवधी रुपयांची इमारत जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी प्रशासनाने एखाद्या गरीब कुटुंबाला आश्रय दिला तर वावगे ठरणार नाही मात्र शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे १६ वर्षांपुर्वी तयार झालेल्या इमारतीला भग्नावस्था आली असून असामाजिक तत्व आणि मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनलेल्या इमारतीच्या उभारणीवर खर्च झालेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याचे दिसून येते. या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन या इमारतीत गरिबांना तरी आश्रय देऊ करावे व इमारतीत जे कर्मचारी राहव्यास तयार नाही त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जनता करू लागली आहे .