शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

उष्माघात, स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

By admin | Updated: April 21, 2017 00:37 IST

सातत्याने वाढणारे तापमान व निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

आरोग्य उपसंचालक : औषध साठा उपलब्ध, आरोग्य यंत्रणा व आरोग्य संघटनांची बैठकभंडारा : सातत्याने वाढणारे तापमान व निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही भागात स्वाईन फ्लूची साथ सुरु आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही भागात स्वाईन फ्लूची साथ सुरु आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात व स्वाईन फ्लूपासून स्वत:चा बचाव करावा असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल यांनी केले आहे. उष्माघात व स्वाईन फ्ल्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क असून उष्माघात व स्वाईन फ्ल्यूसाठी लागणारा औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज आरोग्य यंत्रणा व आरोग्य संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनीता बढे, डॉ.चाचरकर, डॉ.रवी कापगते, डॉ.श्रीकांत आंबेकर, रेडक्रॉस सोसायटी आयएमए, फॉग्सी, आयपीए, निमा, फुटपाथ युनियन, आॅटो रिक्षा चालक युनियनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये ‘इन्फ्यूएंझा एच १ एन १’ च्या रुग्णामध्ये वाढ झालेली असून या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यामध्ये इन्फ्यूएंझा प्रतिबंध व नियंत्रण करण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत. शासकीय तसेच खासगी रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वाईन फ्लू असेल या संशयाने तपासण्यात आवे व उपचार करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडे दोन विलगीकरण कक्ष असून एक सामान्य रुग्णालय येथे तर दुसरा तुमसर उपजिल्हा रुग्णालयात आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांमध्ये सदर आजाराची तपासणी व उपचार केले जातात. जिल्ह्यात एकुण ८ आयसीयु बेड व ७ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. या आजारावर उपचाराकरिता लागणारी ‘आॅसेलॅमीवीट’ औषधी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.संशयीत स्वाईन फ्लू रुग्णांची लक्षणे ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, प्रतिकारशक्ती कमी होणे अशी आहेत. उपरोक्त लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावेत असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे, पोष्टीक आहार, धुम्रपान टाळणे, पुरेशी विश्रांती व भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. उष्णतेचा जास्त संबंध आल्याने शरीराचे तापमान नियंत्रण प्रणालीत बिघाड होऊन उद्भवणारा जीवघेणा आजार म्हणजे उष्माघात होय. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा मजुरीवर फार वेळ काम करणे, फार वेळ उन्हात फिरणे, कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे व घट्ट कपड्यांचा वापर या बाबी उष्माघातासाठी कारणीभूत ठरतात. दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान पाहता शासनाने उष्माघात कृती आराखडा वाढत जाणारे तापमान पाहता शासनाने उष्माघात कृती आराखडा राबविला असून अहमदाबादमध्ये याची प्रथम अंमलबजावणी करण्यात आली. एप्रिल, मे व जून या महिन्यात ४५ डिग्री पेक्षा जास्त तापमान असते. त्यामुळे या तीन महिन्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कामाशिवाय उन्हात जावू नये, १२ ते ५ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पाणी भरपूर प्यावे, निंबूपाणी, नारळपाणी, ताक, आंब्याचे पन्हे आदी भरपूर प्रमाणात प्यावे, घर थंड ठेवण्यासाठी कुलर, फॅनचा वापर करावा, थंड पाण्याने आंघोळ करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे घालावेत आदी सुचना देण्यात आल्या. (प्रतिनिधी)