शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

उष्माघात, स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

By admin | Updated: April 21, 2017 00:37 IST

सातत्याने वाढणारे तापमान व निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

आरोग्य उपसंचालक : औषध साठा उपलब्ध, आरोग्य यंत्रणा व आरोग्य संघटनांची बैठकभंडारा : सातत्याने वाढणारे तापमान व निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही भागात स्वाईन फ्लूची साथ सुरु आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही भागात स्वाईन फ्लूची साथ सुरु आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात व स्वाईन फ्लूपासून स्वत:चा बचाव करावा असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल यांनी केले आहे. उष्माघात व स्वाईन फ्ल्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क असून उष्माघात व स्वाईन फ्ल्यूसाठी लागणारा औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज आरोग्य यंत्रणा व आरोग्य संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनीता बढे, डॉ.चाचरकर, डॉ.रवी कापगते, डॉ.श्रीकांत आंबेकर, रेडक्रॉस सोसायटी आयएमए, फॉग्सी, आयपीए, निमा, फुटपाथ युनियन, आॅटो रिक्षा चालक युनियनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये ‘इन्फ्यूएंझा एच १ एन १’ च्या रुग्णामध्ये वाढ झालेली असून या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यामध्ये इन्फ्यूएंझा प्रतिबंध व नियंत्रण करण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत. शासकीय तसेच खासगी रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वाईन फ्लू असेल या संशयाने तपासण्यात आवे व उपचार करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडे दोन विलगीकरण कक्ष असून एक सामान्य रुग्णालय येथे तर दुसरा तुमसर उपजिल्हा रुग्णालयात आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांमध्ये सदर आजाराची तपासणी व उपचार केले जातात. जिल्ह्यात एकुण ८ आयसीयु बेड व ७ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. या आजारावर उपचाराकरिता लागणारी ‘आॅसेलॅमीवीट’ औषधी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.संशयीत स्वाईन फ्लू रुग्णांची लक्षणे ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, प्रतिकारशक्ती कमी होणे अशी आहेत. उपरोक्त लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावेत असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे, पोष्टीक आहार, धुम्रपान टाळणे, पुरेशी विश्रांती व भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. उष्णतेचा जास्त संबंध आल्याने शरीराचे तापमान नियंत्रण प्रणालीत बिघाड होऊन उद्भवणारा जीवघेणा आजार म्हणजे उष्माघात होय. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा मजुरीवर फार वेळ काम करणे, फार वेळ उन्हात फिरणे, कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे व घट्ट कपड्यांचा वापर या बाबी उष्माघातासाठी कारणीभूत ठरतात. दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान पाहता शासनाने उष्माघात कृती आराखडा वाढत जाणारे तापमान पाहता शासनाने उष्माघात कृती आराखडा राबविला असून अहमदाबादमध्ये याची प्रथम अंमलबजावणी करण्यात आली. एप्रिल, मे व जून या महिन्यात ४५ डिग्री पेक्षा जास्त तापमान असते. त्यामुळे या तीन महिन्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कामाशिवाय उन्हात जावू नये, १२ ते ५ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पाणी भरपूर प्यावे, निंबूपाणी, नारळपाणी, ताक, आंब्याचे पन्हे आदी भरपूर प्रमाणात प्यावे, घर थंड ठेवण्यासाठी कुलर, फॅनचा वापर करावा, थंड पाण्याने आंघोळ करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे घालावेत आदी सुचना देण्यात आल्या. (प्रतिनिधी)