शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघात, स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

By admin | Updated: April 21, 2017 00:37 IST

सातत्याने वाढणारे तापमान व निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

आरोग्य उपसंचालक : औषध साठा उपलब्ध, आरोग्य यंत्रणा व आरोग्य संघटनांची बैठकभंडारा : सातत्याने वाढणारे तापमान व निर्माण होणारी उष्णतेची लाट पाहता येत्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही भागात स्वाईन फ्लूची साथ सुरु आहे. त्याचप्रमाणे राज्यातील काही भागात स्वाईन फ्लूची साथ सुरु आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात व स्वाईन फ्लूपासून स्वत:चा बचाव करावा असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल यांनी केले आहे. उष्माघात व स्वाईन फ्ल्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क असून उष्माघात व स्वाईन फ्ल्यूसाठी लागणारा औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज आरोग्य यंत्रणा व आरोग्य संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनीता बढे, डॉ.चाचरकर, डॉ.रवी कापगते, डॉ.श्रीकांत आंबेकर, रेडक्रॉस सोसायटी आयएमए, फॉग्सी, आयपीए, निमा, फुटपाथ युनियन, आॅटो रिक्षा चालक युनियनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये ‘इन्फ्यूएंझा एच १ एन १’ च्या रुग्णामध्ये वाढ झालेली असून या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यामध्ये इन्फ्यूएंझा प्रतिबंध व नियंत्रण करण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत. शासकीय तसेच खासगी रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वाईन फ्लू असेल या संशयाने तपासण्यात आवे व उपचार करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाकडे दोन विलगीकरण कक्ष असून एक सामान्य रुग्णालय येथे तर दुसरा तुमसर उपजिल्हा रुग्णालयात आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांमध्ये सदर आजाराची तपासणी व उपचार केले जातात. जिल्ह्यात एकुण ८ आयसीयु बेड व ७ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. या आजारावर उपचाराकरिता लागणारी ‘आॅसेलॅमीवीट’ औषधी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.संशयीत स्वाईन फ्लू रुग्णांची लक्षणे ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, प्रतिकारशक्ती कमी होणे अशी आहेत. उपरोक्त लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावेत असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे, पोष्टीक आहार, धुम्रपान टाळणे, पुरेशी विश्रांती व भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. उष्णतेचा जास्त संबंध आल्याने शरीराचे तापमान नियंत्रण प्रणालीत बिघाड होऊन उद्भवणारा जीवघेणा आजार म्हणजे उष्माघात होय. उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा मजुरीवर फार वेळ काम करणे, फार वेळ उन्हात फिरणे, कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे व घट्ट कपड्यांचा वापर या बाबी उष्माघातासाठी कारणीभूत ठरतात. दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान पाहता शासनाने उष्माघात कृती आराखडा वाढत जाणारे तापमान पाहता शासनाने उष्माघात कृती आराखडा राबविला असून अहमदाबादमध्ये याची प्रथम अंमलबजावणी करण्यात आली. एप्रिल, मे व जून या महिन्यात ४५ डिग्री पेक्षा जास्त तापमान असते. त्यामुळे या तीन महिन्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कामाशिवाय उन्हात जावू नये, १२ ते ५ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, पाणी भरपूर प्यावे, निंबूपाणी, नारळपाणी, ताक, आंब्याचे पन्हे आदी भरपूर प्रमाणात प्यावे, घर थंड ठेवण्यासाठी कुलर, फॅनचा वापर करावा, थंड पाण्याने आंघोळ करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे घालावेत आदी सुचना देण्यात आल्या. (प्रतिनिधी)