शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धूळ प्रदूषणाचा आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

रस्त्याचे काम करीत असतांना जेएमसी कंपनी धुळीवर नियंत्रण मिळू शकली नाही. अरुंद रस्त्याने होणारी जीवघेणी वाहतुकव धुळीला लाखनीवासीय कंटाळले आहेत. धुळीची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. सतत शिंका येणे, हातापायावर पुरळ येणे, डोळे लाल होणे, किंवा जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा तक्रारी लाखनीवासीयांमध्ये निर्माण झाल्या आहेत. वाहनांची वाढलेली संख्या व रस्त्यावरील खोदकाम यामुळे वातावरणात मिसळणारी धूळ यामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.

ठळक मुद्देबांधकाम कंपनीचे दुर्लक्ष : लाखनी येथील फ्लायओव्हरचे बांधकाम

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लाखनी शहर व मुरमाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणाऱ्या मार्गावर फ्लायओव्हरचे काम धडाक्यात सुरु आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रस्त्यावर फ्लायओव्हरचे पिल्लर तयार करण्याचे काम पूर्णत्वात आले आहे. दीड वर्षापासून फ्लायओव्हरचे काम सुरु आहे. सर्व्हिस रस्त्यावरील धुळीमुळे जनता त्रस्त झाली आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.रस्त्याचे काम करीत असतांना जेएमसी कंपनी धुळीवर नियंत्रण मिळू शकली नाही. अरुंद रस्त्याने होणारी जीवघेणी वाहतुकव धुळीला लाखनीवासीय कंटाळले आहेत. धुळीची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. सतत शिंका येणे, हातापायावर पुरळ येणे, डोळे लाल होणे, किंवा जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा तक्रारी लाखनीवासीयांमध्ये निर्माण झाल्या आहेत. वाहनांची वाढलेली संख्या व रस्त्यावरील खोदकाम यामुळे वातावरणात मिसळणारी धूळ यामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.सर्व्हिस रोड अवजड वाहतूकीमुळे उखडलेले आहेत. अवजड वाहन सर्व्हिस रोडवरुन चालत असल्याने इतर दुचाकीस्वारांना सावधतेने वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच धुळीमुळे रस्ता माखलेला असतो. त्याचा परिणाम अपघातावर होताना दिसतो आहे.अत्याधिक धुळीमुळे, धुळीचे कण फक्त काही वेळ सर्व्हिस रोडवर पाणी टाकले जाते. त्यातही मोठ्या प्रमाणात कुचराई केली जात असून फ्लायओव्हरच्या कामाला जनता कंटाळली आहे. लोकांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा विचार केला जात नाही.फ्लायओव्हरचे काम सुरु असल्याने मधला रस्ता बंद केला आहे. सर्व्हिस रोडवर वाहने ठेवली जातात. सर्व्हिस रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागतो आहे. जेएमसी कंपनीद्वारे रस्ता रुंदीकरण व नाल्या तयार करण्याची जबाबदारी आहे. अशोका बिल्डकॉन कंपनीने सहा सात वर्षांपूर्वी चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले. परंतु शहरातील मार्गावरुन अपघाताचे प्रमाण वाढलयाने फ्लायओव्हरचे काम मंजूर केले आहे.लाखनीतील चौक धोकादायकलाखनीतील मुरमाडी हद्दीतील कुमार पेट्रोल पंपसमोरील चौक सर्वाधिक धोकादायक आहे. येथील रुंदीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही, तहसील कार्यालयासमोरील चौक वर्दळीच्या असून शाळा कॉलेजात जाण्याचा मार्ग व तेथील प्रवासी निवारा यामुळे येथे सतत गजबज असते. बाजार रोड चौक लाखनीचे मध्यबिंदू आहे. चौकात काळीपिवळी ऑटो उभे असतात. सर्व्हिस रोडवर दुकाने थाटलेली आहेत. जयस्तंभ चौकातून सेलोटी, सिपेवाडा, लाखोरी येथे जाणारी रस्ते आहेत. यामुळे वाहतुक मोठ्या प्रमाणात असते, बसस्थानकाला समोरील चौकात काळीपिवळी ऑटो उभी असतात. या चौकात जेएमकंपनीचे वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी आहेत. परंतु ते प्रशिक्षीत नाही. सोबत रस्त्याची कामे सुरु असल्याने मधला रस्ता बंद करुन सर्व्हिस रोडवरुन वाहतुक सुरु करावी लागते. पोलीस विभागाचे वाहतुक कर्मचारी काही वेळ चौकात असतात. चौकाच्या सुरक्षिततेकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा