शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

वाहनांच्या धुरामुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: October 4, 2015 01:25 IST

वाहनांमध्ये होणाऱ्या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

वरठी : वाहनांमध्ये होणाऱ्या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातून शहराकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटोत रॉकेलचा सर्रास वापर होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील आॅटो चालक खेड्यातील विक्रेत्यांकडून जादा पैसे देऊन रॉकेलची खरेदी करतात. हे रॉकेल इंधन म्हणून आॅटोत वापरण्यात येते. या रॉकेलमुळे वाहनातून मोठ्या प्रमाणात धूर निघतो. या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने आता विविध वाहनांमध्ये इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर रॉकेलचा वापर होत आहे. ट्रक आणि आॅटो त्यात आघाडीवर आहेत. ग्रामीण भागात केरोसीन विक्रेते सामान्य जनतेला रॉकेल नाही म्हणून सांगतात. अनेकदा त्यांच्या वाट्याचे रॉकेल वाहनधारकांना विकतात. वाहनांतून निघणाऱ्या रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना दमा व श्वसनाच्या आजारांनी ग्रासले आहे.डिझेलचे दर वाढल्याने आॅटो चालकांनी रॉकेलकडे धाव घेतली आहे. कमी पैशात जादा उत्पन्न होत असल्याने आॅटो चालक रॉकेल विक्रेत्यांकडे वळत आहे.आॅटो चालकांना मात्र जादा पैशात रॉकेल उपलब्ध करून देत आहेत. (वार्ताहर)