लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत आठवड्याभरापासून वातावरणातील बदलाने आजार बळावले असल्याने रुग्णांची आरोग्य केंद्रात गर्दी वाढत असताना आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा मिळेनासे झाले आहे. कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहणे बंधनकारक असताना देखील या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याने अनेक ठिकाणी कर्मचाºयांअभावी रुग्णांना शहराची वाट धरावी लागते.राष्ट्रीय महामार्गावरील होणाºया अपघातावेळी देखील भरदिवसा आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याने थेट जिल्हा रुग्णालयाकडे यावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांचा सुविधासह कर्मचाºयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज देण्याची गरज आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना विचारपूस करता जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर मिटिंग असल्याचे कारण सांगून दिवस ढकलण्याचे काम कर्मचारी करीत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरीही आजही अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालयांचाच आधार घ्यावा लागत आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात आरोग्य केंद्र वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST
राष्ट्रीय महामार्गावरील होणाºया अपघातावेळी देखील भरदिवसा आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याने थेट जिल्हा रुग्णालयाकडे यावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांचा सुविधासह कर्मचाºयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज देण्याची गरज आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना विचारपूस करता जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर मिटिंग असल्याचे कारण सांगून दिवस ढकलण्याचे काम कर्मचारी करीत आहेत
ग्रामीण भागात आरोग्य केंद्र वाऱ्यावर
ठळक मुद्देकारवाईची मागणी : आरोग्यसेवा विस्कळीत