शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांना मिळणार संरक्षण

By admin | Updated: July 4, 2016 00:31 IST

२८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार ज्या शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक पद अतिरिक्त ठरत होते.

शासन निर्णय : रामनाथ मोते यांच्या प्रयत्नांना यशपुरुषोत्तम डोमळे  सानगडी२८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार ज्या शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक पद अतिरिक्त ठरत होते. त्यांचे इतर व्यवस्थापनेच्या शाळांमध्ये समायोजन न करता सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत शाळेतच संरक्षण दिले जाईल, असा शासन निर्णय २ जुलै २०१६ ला शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. राज्यातील शेकडो मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांना संरक्षण मिळणार असल्याचे शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष डॉ.उल्हास फडके यांनी सांगितले.या आधीच्या निर्णयात अतिरिक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकाचे समायोजन इतर व्यवस्थापनाच्या रिक्त जागेवर करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे भविष्यात अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण झाले असते. याबाबत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन देऊन अतिरिक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक यांना सेवेत संरक्षण देण्याची मागणी केली होती. पूर्वीच्या निकषाप्रमाणे सेवा पूर्णपणे वाया जाणार होती. त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली असती. तसेच दुसऱ्या व्यवस्थापनाच्या शाळेत समायोजन केले असते तर त्या शाळेतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन कायदेशीर प्रश्न निर्माण झाले असते.या सर्व बाबीची कल्पना आमदार मोते तसेच डॉ.उल्हास फडके, अंगेश बेलपांडे यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व शिक्षण सचिवाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. अखेर याबाबत सुधारित आदेश आढून शिक्षण विभागाने राज्यातील शेकडो अतिरिक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांना दिलासा मिळाला. उपरोक्त निर्देश वगळता अन्य निर्देश संदर्भातील दि. २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयातील अन्य आदेश, निकष लागू राहतील.आरटीई कायदा व २०१४-१५ च्या संचमान्यतेनुसार २८ आॅगस्ट २०१५ च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या आदेशाने राज्यातील हजारो मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक, शिक्षक अतिरिक्त झाले. मुख्याध्यापकांना कार्यरत शाळेतच सेवासमाप्तीपर्यंत राहण्याचे आदेश शासनाने काढल्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला होता. परंतु उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांवर अन्याय झाला होता. अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सतत शिक्षणमंत्री यांचे अनेकदा पाठपुरावा केल्यामुळे अखेर उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांना कार्यरत शाळेतच सेवानिवृत्तीपर्यंत राहण्याचे आदेश शिक्षण विभागानी काढले तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इतर शाळेत करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे.- डॉ.उल्हास फडकेविभागीय अध्यक्ष,म.रा.शिक्षक परिषद