शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांना मिळणार संरक्षण

By admin | Updated: July 4, 2016 00:31 IST

२८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार ज्या शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक पद अतिरिक्त ठरत होते.

शासन निर्णय : रामनाथ मोते यांच्या प्रयत्नांना यशपुरुषोत्तम डोमळे  सानगडी२८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार ज्या शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक पद अतिरिक्त ठरत होते. त्यांचे इतर व्यवस्थापनेच्या शाळांमध्ये समायोजन न करता सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत शाळेतच संरक्षण दिले जाईल, असा शासन निर्णय २ जुलै २०१६ ला शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. राज्यातील शेकडो मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांना संरक्षण मिळणार असल्याचे शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष डॉ.उल्हास फडके यांनी सांगितले.या आधीच्या निर्णयात अतिरिक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकाचे समायोजन इतर व्यवस्थापनाच्या रिक्त जागेवर करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे भविष्यात अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण झाले असते. याबाबत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन देऊन अतिरिक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक यांना सेवेत संरक्षण देण्याची मागणी केली होती. पूर्वीच्या निकषाप्रमाणे सेवा पूर्णपणे वाया जाणार होती. त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली असती. तसेच दुसऱ्या व्यवस्थापनाच्या शाळेत समायोजन केले असते तर त्या शाळेतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन कायदेशीर प्रश्न निर्माण झाले असते.या सर्व बाबीची कल्पना आमदार मोते तसेच डॉ.उल्हास फडके, अंगेश बेलपांडे यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व शिक्षण सचिवाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. अखेर याबाबत सुधारित आदेश आढून शिक्षण विभागाने राज्यातील शेकडो अतिरिक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांना दिलासा मिळाला. उपरोक्त निर्देश वगळता अन्य निर्देश संदर्भातील दि. २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयातील अन्य आदेश, निकष लागू राहतील.आरटीई कायदा व २०१४-१५ च्या संचमान्यतेनुसार २८ आॅगस्ट २०१५ च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या आदेशाने राज्यातील हजारो मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक, शिक्षक अतिरिक्त झाले. मुख्याध्यापकांना कार्यरत शाळेतच सेवासमाप्तीपर्यंत राहण्याचे आदेश शासनाने काढल्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला होता. परंतु उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांवर अन्याय झाला होता. अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सतत शिक्षणमंत्री यांचे अनेकदा पाठपुरावा केल्यामुळे अखेर उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांना कार्यरत शाळेतच सेवानिवृत्तीपर्यंत राहण्याचे आदेश शिक्षण विभागानी काढले तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इतर शाळेत करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे.- डॉ.उल्हास फडकेविभागीय अध्यक्ष,म.रा.शिक्षक परिषद