शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

‘दिल्या घरी सुखी राहा’, बोलून घेतला जगाचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:11 IST

लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्यानंतर मुलीला दिल्या घरी सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन निरोप दिला आणि त्यानंतर मांडववाढणीच्या दिवशी वधूपित्याने जगाचा निरोप घेतल्याची हृदयदायक घटना रविवारला विरली बु. येथे घडली.

ठळक मुद्देविरली येथील घटना : मांडव वाढणीच्या दिवशी वधूपित्याचा मृत्यू, आनंदमय वातावरणावर काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्यानंतर मुलीला दिल्या घरी सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन निरोप दिला आणि त्यानंतर मांडववाढणीच्या दिवशी वधूपित्याने जगाचा निरोप घेतल्याची हृदयदायक घटना रविवारला विरली बु. येथे घडली. या घटनेमुळे लग्नसोहळ्याच्या आनंदावर काळाने विरजन घातले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेतील मृताचे नाव पुरूषोत्तम भिकाजी बन्सोड (४८) रा. विरली बु असे आहे. बन्सोड यांच्या प्राजक्ता नामक मुलीचे चकारा येथील कुणाल खोब्रागडे यांच्याशी शुक्रवारला शुभमंगल पार पडले. विवाहसोहळ्यानंतर बन्सोड यांनी मुलीला, ‘बेटा दिल्या घरी सुखी राहा’, असे बोलून तिला निरोप दिला होता.वराकडील स्वागत समारंभ सोहळा आटोपल्यानंतर रविवारला मांडव वाढणीसाठी नवदाम्पत्य विरली बु. येथे आले होते. वधूमंडपी लग्नसमारंभाच्या या समारोपीय कार्यक्रमाची लगबग सुरू असतानाच दुपारी वधूपित्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांच्यावर वाटेतच काळाने झडप घातली. त्यांचा मृत्यूमुळे वधूच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आनंददायी लग्नसोहळ्याचे वातावरण अचानक दु:खात परावर्तित झाले.कुणीही अशी कल्पनाही केली नसावी असा हा प्रसंग विरली वासीयांच्या स्मरणात कायम कोरला गेला.स्थानिक स्मशानभूमीत रविवारला सायंकाळी उशीरा बन्सोड यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नववधू प्राजक्ताचे अश्रू अनावर झाले होते. ‘बाबा सोडून गेले,’ हेच एकमेव वाक्य तिच्या मुखी होते. बन्सोड यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.