शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

‘दिल्या घरी सुखी राहा’, बोलून घेतला जगाचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:11 IST

लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्यानंतर मुलीला दिल्या घरी सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन निरोप दिला आणि त्यानंतर मांडववाढणीच्या दिवशी वधूपित्याने जगाचा निरोप घेतल्याची हृदयदायक घटना रविवारला विरली बु. येथे घडली.

ठळक मुद्देविरली येथील घटना : मांडव वाढणीच्या दिवशी वधूपित्याचा मृत्यू, आनंदमय वातावरणावर काळाचा घाला

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्यानंतर मुलीला दिल्या घरी सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन निरोप दिला आणि त्यानंतर मांडववाढणीच्या दिवशी वधूपित्याने जगाचा निरोप घेतल्याची हृदयदायक घटना रविवारला विरली बु. येथे घडली. या घटनेमुळे लग्नसोहळ्याच्या आनंदावर काळाने विरजन घातले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेतील मृताचे नाव पुरूषोत्तम भिकाजी बन्सोड (४८) रा. विरली बु असे आहे. बन्सोड यांच्या प्राजक्ता नामक मुलीचे चकारा येथील कुणाल खोब्रागडे यांच्याशी शुक्रवारला शुभमंगल पार पडले. विवाहसोहळ्यानंतर बन्सोड यांनी मुलीला, ‘बेटा दिल्या घरी सुखी राहा’, असे बोलून तिला निरोप दिला होता.वराकडील स्वागत समारंभ सोहळा आटोपल्यानंतर रविवारला मांडव वाढणीसाठी नवदाम्पत्य विरली बु. येथे आले होते. वधूमंडपी लग्नसमारंभाच्या या समारोपीय कार्यक्रमाची लगबग सुरू असतानाच दुपारी वधूपित्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांच्यावर वाटेतच काळाने झडप घातली. त्यांचा मृत्यूमुळे वधूच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आनंददायी लग्नसोहळ्याचे वातावरण अचानक दु:खात परावर्तित झाले.कुणीही अशी कल्पनाही केली नसावी असा हा प्रसंग विरली वासीयांच्या स्मरणात कायम कोरला गेला.स्थानिक स्मशानभूमीत रविवारला सायंकाळी उशीरा बन्सोड यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नववधू प्राजक्ताचे अश्रू अनावर झाले होते. ‘बाबा सोडून गेले,’ हेच एकमेव वाक्य तिच्या मुखी होते. बन्सोड यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.