शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

संतप्त नागरिकांनी जाळला गांजा विक्रीचा अड्डा

By admin | Updated: August 2, 2015 00:45 IST

जिल्ह्यात गांजासह अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. भंडारासारख्या शांत शहरात शाळकरी मुले अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळल्यामुळे आणि विघातक कृत्य वाढू लागली आहेत.

पोलिसांचे दुर्लक्ष : अड्डे बंद न झाल्यास आंदोलनभंडारा : जिल्ह्यात गांजासह अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. भंडारासारख्या शांत शहरात शाळकरी मुले अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळल्यामुळे आणि विघातक कृत्य वाढू लागली आहेत. गांजाच्या आहारी गेलेल्या विशीतील या तरुणांनी प्रीती पटेल या महिलेचा खून केला. त्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार यांच्या नेतृत्त्वात संतप्त नागरिकांनी तकीया वॉर्डातील गांजा विक्रीचा अड्डा जाळून खाक केला.यावेळी लांजेवार म्हणाले, शहरात गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून पोलीस मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहेत. आता पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. आम्ही पोलिसांना ज्या-ज्या ठिकाणी गांजाची विक्री होते, ते ठिकाण सांगण्यात येईल, पोलिसांनी हे अड्डे उध्वस्त केले नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल, असा निर्वाणीचा ईशाराही लांजेवार यांनी दिला. मागील दोन वर्षांपासून शहरात गांजा विकणारी टोळी सक्रीय झाली असून शाळकरी मुलांना त्याची मोफत सवय लावतात. नंतर सवयी लागल्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळतात. त्यानंतर ही टोळी गांजा पिणाऱ्यांना घरपोच सेवा देतात. त्यातच चोरीच्या वाम मार्गाला लागतात. पैसे मिळाले नाही तर हिंसक मार्गाकडे वळतात. ही मुले नशेच्या ईतकी आहारी गेलेली आहेत की त्यांना आपण कोण आहोत याचे भानही राहत नाही. त्यामुळे गांजा विक्रीच्या मुळावरच घाव घालण्याची मागणी प्रशांत लांजेवार यांनी केला आहे.सात दिवसाच्या आत गांजा विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा जीतू पटेल, दिनेश गजभिये, अत्थर बेग मिर्झा, बबलू खान, नितेश मोगरे, राजेश चंदेल, विकास निंबार्ते, छोटू रेहपाडे, कृष्णा गोखले, देवा कारेमोरे, राजेश चोपकर यांनी दिला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)