शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

संतप्त नागरिकांनी जाळला गांजा विक्रीचा अड्डा

By admin | Updated: August 2, 2015 00:45 IST

जिल्ह्यात गांजासह अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. भंडारासारख्या शांत शहरात शाळकरी मुले अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळल्यामुळे आणि विघातक कृत्य वाढू लागली आहेत.

पोलिसांचे दुर्लक्ष : अड्डे बंद न झाल्यास आंदोलनभंडारा : जिल्ह्यात गांजासह अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. भंडारासारख्या शांत शहरात शाळकरी मुले अंमली पदार्थाच्या सेवनाकडे वळल्यामुळे आणि विघातक कृत्य वाढू लागली आहेत. गांजाच्या आहारी गेलेल्या विशीतील या तरुणांनी प्रीती पटेल या महिलेचा खून केला. त्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार यांच्या नेतृत्त्वात संतप्त नागरिकांनी तकीया वॉर्डातील गांजा विक्रीचा अड्डा जाळून खाक केला.यावेळी लांजेवार म्हणाले, शहरात गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून पोलीस मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहेत. आता पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. आम्ही पोलिसांना ज्या-ज्या ठिकाणी गांजाची विक्री होते, ते ठिकाण सांगण्यात येईल, पोलिसांनी हे अड्डे उध्वस्त केले नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल, असा निर्वाणीचा ईशाराही लांजेवार यांनी दिला. मागील दोन वर्षांपासून शहरात गांजा विकणारी टोळी सक्रीय झाली असून शाळकरी मुलांना त्याची मोफत सवय लावतात. नंतर सवयी लागल्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळतात. त्यानंतर ही टोळी गांजा पिणाऱ्यांना घरपोच सेवा देतात. त्यातच चोरीच्या वाम मार्गाला लागतात. पैसे मिळाले नाही तर हिंसक मार्गाकडे वळतात. ही मुले नशेच्या ईतकी आहारी गेलेली आहेत की त्यांना आपण कोण आहोत याचे भानही राहत नाही. त्यामुळे गांजा विक्रीच्या मुळावरच घाव घालण्याची मागणी प्रशांत लांजेवार यांनी केला आहे.सात दिवसाच्या आत गांजा विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा जीतू पटेल, दिनेश गजभिये, अत्थर बेग मिर्झा, बबलू खान, नितेश मोगरे, राजेश चंदेल, विकास निंबार्ते, छोटू रेहपाडे, कृष्णा गोखले, देवा कारेमोरे, राजेश चोपकर यांनी दिला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)