शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

कापणीयोग्य धानपीक पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:54 IST

शेतकºयांनी कशी बशी रोवणी आटोपल्यानंतर ऐनवेळी वरूनराजाने दडी मारली. त्यामुळे कित्येक शेतकºयांचे उभे पिक वाळु लागेल होते.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शेतकºयांनी कशी बशी रोवणी आटोपल्यानंतर ऐनवेळी वरूनराजाने दडी मारली. त्यामुळे कित्येक शेतकºयांचे उभे पिक वाळु लागेल होते. वीजपुरवठा नियमित राहत नसल्याने अनेक शेतकरी बांधवांनी इजिन पंपाच्या साहाय्याने धान पिकाला वाढविले. आणि लष्करी अळी पडली, उसनवार घेऊन किंवा व्याजाने औषधे घेऊन फवारणी केली. परंतु आता तो मेटाकुटीला आला आहे.लष्कर अळी, भारनियमन, डोक्यावर असणारा कजार्चा डोंगर, सततची नापिकी यासारख्या अनेक समस्यांनी शेतकरी माय-बाप हवालदिल झालेला असताना. शेतातील उभे पिक वाळु लागल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. भूगभार्तील पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतकरी यांच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत. अनेक प्रकारच्या उपाययोजना आखून धान पिक जोमात आले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने हजेरी लावली असून, कापनीसाठी आलेल्या धानाला या पावसाचा फटका बसला आहे. लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकºयाच्या शेतातील कापनीसाठी आलेले उभे पिक जास्त पाण्यामुळे कुजले, तर काही ठिकाणी धानाच्या लोबाना अंकूर फुटले आहे. त्यामुळे हातात आलेले पिक, हातातून निसटून जाण्याच्या मार्गावर आहेत.जिल्ह्यातील ४० टक्के शेतकरी यांचे पिक कापणीला आली आहेत. मात्र तिन दिवसापासुन लागून पडलेल्या पावसामुळे धानाची कापनी करू शकत नाही. लाखांदूर तालुक्यातील मोहरणा परिसरातील टेभरी, खैरी/पट, विहीरगाव, गवराळा, खैरणा, दोनाड, डांभेविरली, सावरगाव, मादेड, कुडेगाव, रोहणी, किरमटी या गावातील अनेक शेतकºयाची धान पिके पाण्यामुळे कुजण्याच्या स्थितीत आहेत.कडपाला सडका वासपालांदूर : मागील तीन दिवसापासून पालांदूर परिसरात परतीच्या पावसाची हजेरी कायम असल्याने धानपिकाला सुमार नुकसान पोहचत आहे. कापलेल्या धानाच्या कडपांना सडका वास सुटला असून भुईसपाट धानसुद्धा सडण्याच्या मार्गावर असून साचलेले पाणी बांधणातून काढण्याचा प्रयत्न शेतकरी जीव ओतून करीत आहे. ही वास्तविकता हजारो हेक्टरात पालांदूर परिसरात अनुभवायला मिळत आहे.हातातोंडाशी आलेले धानपिक निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले असून शेतकरी पुरता हतबल झाला आहे. निसर्ग शेतकºयांच्या पाचविलाच पुजला असल्याने जगावे का मरावे अशी अवस्था झाली आहे. डोक्यावर कर्जाचे ओझे असह्य होत आहे.पिकविमा मिळणार का?अचानकपणे निसर्गाने अवकृपा करीत सुसाटवाºयासह जोरदार पाऊस झाला. यात पालांदूर परिसरातील हजारो हेक्टरमधील धानपिकाची नुकसान शक्य आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.